Tuesday, November 18, 2008

दर्शन भारत मातेचे (भाग २)

मुंबई-पुणे दृतगती मार्गावरुन पुण्याला वळसा घालून शिक्रापूर मार्गे अहमदनगर-बीड असा आमचा प्रवास सुरु झाला. अद्यापपर्यंत दृतगतीमार्गावर दोनवेळेला टोल भरला होता. पण वाचलेल्या वेळामुळे अन हा महामर्ग नसताना पूर्वीच्या मार्गावर अनेकदा तासन तास घालवल्याच्या आठवणी विसरलेल्या नसल्याने हा टोल भरताना काही वाटले नाही.

पुढे पुण्याच्या वळणरस्त्यावर असताना बंधू म्हणाला, "अण्णा, पुढच्या वळणावर काही तरी गडबड असणार आहे". मी चमकलोच.
"तुझा अध्यात्मातला अभ्यास चांगला आहे. पण तुला भविष्य कधिपासून कळायला लागले?" मी प्रश्न टाकला. तसे आम्ही त्या वळणापर्यंत पोचलो होतो. आणि काय आश्चर्य तेथे एक अपघात झालेला होता. वाईट वाटण्यापेक्षा मला खूप राग आला होता.

प्लेगच्या बातम्या पसरल्या होत्या तेव्हा शासनाने उंदीर मारण्यासाठी ठिकठिकाणी सापळे लावले असल्याचे ऐकून होतो. पण येथे तर सरकारी लोकांनी प्रत्यक्ष माणसांना मारण्यासाठीच सापळा लावला होता. रस्त्याच्या कडेला बांधकामासाठी एक खड्डा खोदलेला होता व बांधकामासाठी आणलेल्या वाळूचा भर हमरस्त्यात ढीग घातला होता. त्याच्या बाजूला अंधारात सूचना देण्यासाठी साधे पांढरे दगड सुद्धा टाकलेले नव्हते. रात्रीच्या प्रवासात समोरुन येणार्‍या गाड्यांच्या दिव्यांमुळे हा ढीग दिसने शक्यच नव्हते. बंधूला मघाशी काय म्हणायचे होते ते मला चांगलेच समजले होते. त्याचे ते भविष्य कोणा शेमड्या पोराने सुद्धा वर्तवले असते पण शासनाला दिसले नव्हते... पण राग आणून करणार काय? सुदैवाने बंधू काल रात्री यातून वाचला होता. मुंबईकडे येताना त्याच्या समोरची कार अचानक उजवीकडे वळून या ढिगार्‍याला वळसा घालून पुढे गेली व हे या ढिगार्‍यावर चढले म्हणे. गती कमी असल्याने हे वाचले. पण त्या अपघातात सापडलेले जे कोणी होते ते सुदैवी नव्हते बिचारे.

असो. आम्ही जीव मुठीत घेऊन, भगवंताचे नाव घेत पुढे निघालो.


अशा पद्धतीची रहदारी बघितली नाही असे नाही. पण मध्येच उगीच पोटात गोळा आल्यासारखे होत होते.

पुण्याहून जसजसे मराठवाड्याच्या जवळ जाऊ लागलो तसतसे उघडी-बोडकी शेतं जास्त दिसू लागली. जुलैचा महिना पण एप्रिल-मे प्रमाणं कोरडं वाटत होतं. नगर जिल्ह्यात हमरस्त्याच्या बाजूला शेतात एक वस्ती होती. तिथं ही मुलं क्रिकेट खेळताना दिसली म्हणून त्यांच्याशी थोड्या गप्पा केल्या. शेतीची उन्हाळ कामं पारंपारिक पद्धतीनं उरकलेली होती. आता पावसाची वाट पाहनं चालू होतं. अन काम नाही म्हणून दररोज दिवसभर क्रिकेट खेळतो असं त्यांचं म्हणनं होतं.



शेणापासून स्वयंपाकाचा गॅस तसेच विद्यूत बनवता येते हे त्या मुलांना सुद्धा ठाऊक होतं. तसे प्रयत्न सुद्धा तिथे केले गेले होते पण योग्य मर्गदर्शन नसल्याने ते फसले. काही लोकांनी तर म्हणे जमीनीत खड्डे न खणता शे-दोनशे खर्चून जमीनीवरच नकली बांधकाम करुन बायोगॅसच्या योजनेचे पैसे खाल्ले होते. त्या तरुणांना विचारले तुम्हाला कुणी खरोखर मार्गर्शन केले तर तुम्ही बायोगॅस यशस्वी कराल का तर ते सगळे फिदी-फिदी हसले. आम्ही समजायचे ते समजून पुढे निघालो.

नगरपासून पूर्वेला बीडकडे जाणार्‍या रस्त्यालगत काही किमी वर हा यादवकालीन बारव आहे. उत्सुकतेपोटी त्यात पाणी किती आहे हे पहायला गेलो आणि...


याच्या कडेला ती माणसं बसली आहेत ना, त्याखाली छोट्या-छोट्या खोल्या आहेत. त्या वाटसरुंच्या निवार्‍यासाठी बनवलेल्या आहेत. त्यांची आता वाट लागलेली आहे हा भाग अलहिदा. या बारवाच्या बाजूला एक मंदिर होते (बहुतेक महादेवाचे) जे मुसलमानी राजवटीत नष्ट झाले. त्याचे काही अवशेष या कोरड्या बारवात पहायला मिळाले. आता तिथे केवळ एक छोटेखानी मंदिर उरलेले आहे.
हे विदीर्ण करणारे चित्र पाहून पुढे निघालो पण तेवढ्यात ग्रिष्मातल्या सरी याव्यात तशी एक आनंदाची झुळूक मनाला स्पर्ष करुन गेली.

<दिंडी व्हिडीओ>

या दिंडीच्या जवळ जाताच आम्ही गाडी थांबवली व वारकरी होऊन विठ्ठल नामात क्षणभर मन मग्न झाले. दुर्दैवाने आमच्या वाटा वेगळ्या असल्यानं पुन्हा गाडीत येऊन बसलो अन बीडाकडं निघालो.

दहा वर्षापूर्वी होता तसाच दहा ठिकाणी हाडं दुखावणाराच होऊनही दहा ठिकाणी विनाकारण टोल दिल्यामुळं दहा पटीने महाग झालेला प्रवास संपवून शेवटी आम्ही आमच्या मौज या गावी पोचलो.



बालपणीच्या आमच्या सवंगड्याने सुरु केलेले आमच्या गावातले हे दुकान. अशी आणखी दोन दुकानं गावात आहेत.

अशी उदास, भकास चेहर्‍याची बक्कळ माणसं आमच्या दुष्काळी भागात दिसतात.

हा आमच्या गावचे पुढारी द्वारकादास डावकर यांचा वाडा. काँग्रेस व शेतकरी कामगार पक्षातून आत बाहेर उड्या मारण्यात, विधानसभा, पंचायत समित्या यांच्या निवडनुका लढण्यात अन मंत्री बनन्याची स्वप्नं बघण्यात हे साहेब एवढे मग्न असतात की वीज विकत घ्यायची असते हे माहित करुन घ्यायला त्यांना अद्याप वेळच मिळालेला नाही.

एकट्या बीड जिल्ह्यात विद्युत महामंडळाचे दर महिन्याला करोडो रुपयांचे नुकसान का होते त्याचे हे उत्तर.

----
क्रमशः

हा लेख मिसळपाव वर सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे. त्यावरचे प्रतिसाद वाचण्यासाठी येते टिचकी मारा (क्लिक करा).

Monday, November 17, 2008

कनकालेश्वर - ऐतिहासिक मानबिंदू

औरंग्याने महाराष्ट्रातल्या वास्तव्यात हजारो मंदिरे उध्वस्त केली. त्यातली बरीच मशिदींमध्ये बदलवली गेली, काही नामशेष झाली, काही आजही डगडुगीच्या/जिर्नोद्धाराच्या प्रतिक्षेत आहेत तर थोडी पुन्हा नव्याने उभारी घेऊन उभी राहिली. त्यापैकी एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे हे कनकालेश्वर...




बीड शहराच्या पूर्वेला बिंदूसरेच्या तिरावर असलेले हे महादेवाचे हजारो वर्षांपूर्वीचे मंदिर पुराणांमध्ये तसेच रामायणातही उल्लेखलेले आहे. काही पुराणांमध्ये परशुरामाने येथे महादेवाची स्थापना केली असा उल्लेख आहे. तर इतिहासकारांच्या मते हे किमान १००० ते १४०० वर्षे जुने असावे. याचे बांघकाम हेमाडपंथी स्वरुपातले आहे... केवळ दगडांवर दगड गुंफून हजारो वर्षे उभे असलेल्या या देवळाने केवळ ऊन, पाऊस, वारा यांचाच नव्हे तर मुसलमानी आक्रमकांच्या पहारी, हातोडे, तोफा, यांचाही सामना केला आहे.

या दुष्काळी/कोरड्या भागातही कोरडे न पडणार्‍या या तळ्याच्या मध्यभागी असलेल्या या देवळात जायला एक छोटा दगडी पूल आहे जो पावसाळ्यात पाण्याखाली असतो. त्यावरुन आत गेलो की हे प्रवेशद्वार दिसते.




अल्लाउद्दीन खिलजीचा मूळचा गुजराथ/राजस्थान या भागातला सेनापती महादेव कपूर ज्याचे धर्मांतर केल्यानंतर मलिक कपूर असे नामकरण करण्यात आले त्याने पहिल्यांदा या देवळावर आक्रमण केले. पुढे औरंग्याच्या कर्दनकाळी सैन्याने या मंदिरावर कमीत कमी २७ वेळा हल्ले केले. त्यात एकून एक सर्व मुर्ती भग्न केल्या गेल्या. हे मंदीर त्या नंतर बहुतेक वेळा हिंदूंसाठी बंदच होते. ते परत हिंदूंच्या हाती यायला १९४८ साल उजडावे लागले.

या देवळाच्या आत सर्व भिंतीवर देवदेवतांच्या सुबक व कोरीव भग्न मूर्ती त्या आक्रमकांच्या क्रौर्याची साक्ष आजही देतात.



गाभ्यार्‍याच्या छताचे मूळ कोरिवकाम सुदैवाने आजही सुरक्षित आहे. ते पाहताना मंत्रमुग्ध व्हायला होते. या देवळाला त्याच्या या श्रीमंतीमुळे/वैभवामुळे कनकालेश्वर हे नाव पडले. (कनक = सोने, सूवर्ण).



या मंदिराचे पुजारी कल्याण महाराज हे प्रसिद्ध समाजसेवक आहेत. त्यांच्या मते हे देऊळ स्वातंत्र्य मिळण्याच्या काळात जर हिंदूंनी मिळवले नसते तर याचेही बाबरी झाले असते. त्यांचे हे म्हणने किती वास्तववादी आहे याची प्रचिती याच शहरातील आणखी एक मंदीर (पद्मावती मंदीर) जे की आज एका विशाल मशिदीमध्ये रुपांतरीत झालेले आहे त्याकडे पाहून येते. तेथे मदरशे म्हणजे आतंकवादी तयार करण्याचे कारखाने मोठ्या प्रमाणात सुरू आहेत तर या कनकालेश्वर मंदिरात अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. जसे की या मागास भागातल्या ग्रामीण व गरीब कुटुंबातल्या लग्न कार्यांसाठी हे देऊळ अगदी वाजवी दराने दिले जाते, वगैरे.



येथे कर माझे दोन्ही जुळती.

जाता-जाता - दहावीच्या परिक्षेच्या काळात देवळाचा हा भाग माझी दिवसभराची अभ्यासाची खोली होता.

बहेर रणरणते ऊन असू देत पण येथे मात्र कसे थंड-थंड वाटे. बरेचदा अभ्यास सोडून मी या तळ्यातल्या रंगिबेरंगी माशांना पहात तर कधी कधी ते सुंदर कोरीव नक्षिकाम तासन तास न्यहाळत बसे.
कनकालेश्वराच्या या तळ्यात एक ते दोन फूट लांबीचे वेगवेगळ्या रंगाचे चमकदार मासे हे बच्चे कंपनीचे विषेश आकर्षण होते. पण या काही वर्षात ते मासे नष्ट झाल्याचे कळते. तसेच या तळ्यात गाळही खूप साचला आहे. लोक या तळ्यात गणपती विसर्जन करतात. तसेच निर्माल्यही फेकतात. ते थांबायला हवे नाहीतर हे तळेच नष्ट व्हायचे.

असे हे आमचे कनकालेश्वर मंदिर... आम्हा बीडकरांचे श्रद्धास्थान, आमच्या पूर्वजांच्या वैभवाचे, लढवय्येपणाचे प्रतिक... सध्या त्या वैभवशाली वारशाच्या वारसदारांकडून योग्य त्या काळजी अभावी एकटेच परिस्थितीशी झुंज देत उभे आहे.

या विषयावर मिसळपाव वर चर्चा चालू आहे. येथे क्लिक केल्यास वाचता येईल.

Tuesday, November 11, 2008

दर्शन भारत मातेचे

प्रत्येक वेळी भारतात जायचं म्हटलं की तो दिवस उजाडण्याची उक्तंठा लागून राहिलेली असते. विमानात बसल्यावर वाटतं की किती हळू हळू उडत आहे हा उडन खटारा! भारतात गेल्यावर काय काय करायचं याचे बेत मनात गर्दी करत असतात. घरी गेल्यावर दार कोण उघडेल. आई का भाऊ का वहिणी? आई-वडिलांच्या डोळ्यांच्या पानावलेल्या कडा, त्यांचे गोंजारणे, पाठीवरुन त्याच मायेने फिरणारा आजीच्या थरथरत्या हाताचा मायेचा स्पर्श, भावंडांच्या भेटीतला आनंद, मध्येच एखाद्या बहिनीचेही पानावलेले डोळे चोरुन पुसणे, "किती मोठी झाली आहे गं तू" असं आईचं तिच्या नातीला लाडानं बोलनं... मन अगदी अधीर होतं देशात पोहचण्यासाठी. तसच मागच्या भेटीतही झालं.

समोरच्या टिव्हीवरून हळू हळू युरोप पार करुन आखाताच्या पुढे सरकणारं विमान कधी एकदा मुंबईत पोचणार आणी कधी एकदा पवित्र मायभूमीचं दर्शन होणार असं झालं होतं. प्रवासात मनात अनेक विचार तरळत होते, आठवणी जाग्या होऊन जात होत्या. त्यापैकी एक डॉ. कलामांनी परदेशस्थित भारतीयांना उद्देशून केलेल्या भाषणाची. परदेशात असताना जसे काटेकोर नियमाचे पालन करता तसे भारतात आल्यावर सुध्दा का करत नाही या अब्दुल कलामांच्या प्रश्न वजा अवाहनाला यावेळी तंतोतंत पाळायचे असे अनाहुतपणे मनाने ठरवले. एरव्ही सुद्धा तसा मी नियमांचे पालन करतो पण यावेळी कटेकोर करायचे ठरवले.

शेवटी एकदाचं विमान मुंबईत उतरलं आणी आम्ही प्रवासी विमानतळात प्रवेश करु लागलो. दरवेळे प्रमाणे यावेळी सुद्धा नुतनीकरणाचं काम चालूच होतं. त्याचं ओंगळ प्रदर्शन व तिथला बुरसट वास आपण योग्य गावी आल्याची सुचना मेंदूपर्यंत पोचवून गेला. आम्ही सगळे दाटीवाटीनं बारीला लागलो. काही तासांपूर्वी युरोप-अमेरिकेतल्या विशाल व भव्य-दिव्य विमानतळात असणारे या चिमुकल्या विमानतळावर पोचलोच होतो तेवढ्यातच काहींच्या देशाच्या ओंगळपणाला लाखोल्या सुरु झाल्या. मला मात्र डोळ्यासमोर माझं घर, आई-वडिल, भावडं दिसत होती. काही तासांनी भाचे कंपनी "मामा मामा" करत आपल्या अंगा खांद्यावर उड्या मारत असतील या सुखाच्या कल्पनेत असलेल्या मनाला तेवढ्यात कोणाच्या तरी खेकसण्याने ताळ्यावर आणले. समोरच्या कुटुंबाचा खिडकीपाशी नंबर लागलेला होता.

"हे फॉर्म पासपोर्टात लावा अन मग द्या. शिकले सवरलेले आहेत म्हणे हे", त्या कुटुंबाचे सरकारी स्वागत कारकुनाने केले. त्या कुटुंबातल्या बापड्याने अज्ञेचे पालन करुन पुन्हा पारपत्रांचा गठ्ठा टेबलावर ठेवला. आपल्याला अत्यंत महत्वाचे वाटणारे पारपात्र म्हणजे या कारकुनांना किराणा दुकानातल्या रद्दीसमान आहे याची जाणीव आपल्याला व्हावी म्हणून की काय ठप्पा मारण्यापूर्वी त्याने ते पारपत्र अगोदर उलटे दुमडले व मग सरळ केले. एव्हाना पारपत्र धारकाचा जीव केविलवाना झालेला होता. तितक्यात दुसरे पारपत्र उघडून त्याने पुन्हा एक षटकार मारला.

"तुमची बायको अगोदरची का मुलगा?" कारकूनाचा प्रश्न न उमगलेला बाप्या म्हणाला, "म्हणजे?"
"अहो, बायकोचा पसपोर्ट मुलांच्या अगोदर लावायचा असतो. हॅ काय हे!" असे कुरकुरत कारकूनाने तो गठ्ठा परत त्या बाप्याकडे सरवला, "क्रमाने लाऊन द्या पुन्हा"... त्या बाप्याच्या चेहर्‍यावरचा संताप आता स्पष्ट दिसत असतो. ठप्पे लावण्यासाठी क्रमाची काय गरज? बरे उरलेली दोन पारपत्रे कोणाची आहेत हे समोरच्या कुटुंबाकडे पाहून शेंबड्या पोरानेही सांगितले असते. मग असा हेकटपणा का? माझ्यासारख्या बघ्यांना त्या कारकूनाच्या वागण्याने संभ्रमात टाकले. तसे मी आपले पारपत्र व कागदपत्रे व्यवस्थित क्रमाने लावलेली आहेत याची खात्री करुन घेतली. आम्हाला मात्र येथे नशिबाने साथ दिली व आम्ही त्या कारकूनाचे काही ऐकून न घेता आपले काम उरकते झालो.

आता पुढचा टप्पा. आपले सामान कुठे मिळणार म्हणून काही प्रवासी उगीच कुठे दिशादर्शक वा माहिती फलक आहेत का हे शोधत असल्यासारखे दिसत होते. तर काही जन "काय वेडे हे? अजून अमेरिकेतच आहोत का काय असं वाटतय वाटतं ह्यांना", अशा भावनांनी जमिनीवर उतरलेले असावेत असे वाटत होते. कारण ते बॅगा कुठे मिळणार याची देशी पद्धतीने चौकशी करत होते. दरम्यान गणवेशधारी विमानतळ कर्मचार्‍यांनी मला एव्हाना चार-पाच वेळा हटकले होते, "साठ डॉलर द्या, तुमच्या बॅगा काढून देतो. कितीही सामन आसू द्या साहेब... कॅमेरे, डिव्हिडी... आगदी बाहेर पोचवतो. बरं चला चाळीस द्या."

"अरे बाबा माझ्याकडं खरच काही नाहीये. तुम्ही सोडा मला", असे म्हणत मी माझे सामान घेऊन सगळे सोपस्कर करीत बाहेर आलो. सही सलामत बाहेर आल्यावर मनात उगीच विजयी भावना उत्पन्न झाल्या.

गाडीकडे जाताना मी काहीतरी शोधतो आहे हे आमच्या ड्रायवर ने हेरले. "साहेब, चहा शोधताय का मुतारी?" त्याने सरळ प्रश्न विचारल्यावर त्याला मी खिशातून चिंगमची रिकामी बेगडं काढून दाखवली. "मघाशी रांगेत असताना चिंगम चघळायला काढलं त्याची टरफरलं (बेगड) टाकण्यासाठी केव्हाची कचरापेटी शोधतोय पण सापडतच नाही", असे सांगितल्यावर मिश्किल हसत तो म्हणाला, "आना इकडं". अन क्षणार्धात त्याने तो कचरा माझ्या हातातून घेऊन रस्त्याच्या कडेला फेकला सुद्धा.

"कलाम सर, माफ करा. पहिली चूक. पुढच्या वेळी आम्ही कचरा कचरापेटीतच टाकू हो, पण ती आहे कुठं?" असा प्रश्न मनातल्या मनात कलाम साहेबांना विचारत गाडीपाशी पोचलो. दरम्यान गाडीत न बसल्याने एक मोठी बॅग गाडीच्या टपावर विराजमान झाली होती. आमची दिंडी गावाकडे निघाली.

तोच अंधेरी-कुर्ला मार्ग. उसाचा रस प्यायचो ती रसवंतीची जागा, ते वड्याचे गाडे, मित्राचा छोटेखानी कारखाना असलेली अरूंद बोळ अशा अनेक ओळखीच्या खुना न्यहाळत मुंबईच्या बाहेर पडलो.

"ये ती बॅग खाली काढून दाखव", नाक्यावरच्या हवालदाराने आमच्या ड्रायवरला फर्मान सोडले. बॅगा उघडून बघण्या अगोदर हवालदाराने मला विचारले, "ओ, काही सामान नसेल तर उगीच कशाला बॅगा उचकायला लावता?"
"तुमच्या कामात मी कशाला अडथळा आणू?" या माझ्या प्रश्नावर साहेबाची स्वारी जरा नाराज झालेली दिसली.
"मग सगळ्या बॅगा तिथं चौकीपशी घेऊन चला", हवालदारानं आदेश सोडला.
"भाऊंना फोन करु. म्हणजे इथं वेळ जाणार नाही", लहान बंधुने सल्ला दिला. पण कलाम सरांना दिलेल्या वचनामुळे मी त्या सल्ल्याला न बधता हवालदाराला सगळे सामान उचकटून टाकण्याची संधी दिली.
"या कंपूटरची पवती कुठं आहे?" काहीतरी सापडल्यामुळे त्याला आनंद झाला होता. पावती दाखवली.
"पावती तर ३ वर्षे जुनी आहे. याचीच कशावरून?", हवालदार त्याचे काम इमान ऐतबारे करत होता. म्हटलं संगणक बघून खात्री करुन घे. तर म्हणतो, "ते तपासायला तुमचा कंपूटर इथं जमा करुन घ्यावा लागेल."
म्हटलं हा काय कायदा आहे बुवा. तर तेच फिल्मी उत्तर मिळाले की आम्हाला कायद्याची भाषा शिकवू नका वगैरे. म्हटलं ठीक आहे. कोणत्या कायद्यानं जमा करायचा आहे ते पावतीवर लिहून द्या. मी तो न्यायला पुन्हा येईन. तर त्यावर हवालदार साहेब म्हणाले, "तुम्हाला ही तपासणी होईपर्यंत इथेच थांबावे लागेल".

मी पण मग निवांत उभा राहिलो. पुन्हा त्या हवालदाराला थोडा आनंद झाला. आता कॅमेरा सापडला होता. त्याचीही पावती दाखवली. पावत्यावरुन गिर्‍हाईक परदेशातून आलं आहे याची जाणिव साहेबाला झालेली होती. सामानात बाकी काही सापडले नाही. तसा पाच्-दहा मिनिटात दुसरा गणवेशात नसलेला त्याचा सहकारी म्हणाला, "काय साहेब, दोन्-चारशे द्यायचे. निघायचं. उगं कशाला टाइम पास करता फॉरेनवून आल्या आल्या". त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता मी तसाच उभा होतो. शेवटी त्यांनी कंटाळून आम्हाला तिथून निघण्यास सांगितले. तशी पडत्या फळाची अज्ञा समजून आम्ही पण निघालो. वाटले चला सगळे आडथळे पार पडले. आता सरळ गावी जाऊ.

पण कदाचित नशीब म्हणत होते. ये तो अभी शुरुवात है, आगे आगे देखो होता है क्या...

क्रमशः

वा लेखावर मिसळपाव वर भरपूर व गरमागरम चर्चा चालू आहे. ती पाहण्यासाठी येथे टिचकी मारा (क्लिक करा).

सेवाभावी (भाग १)

भाऊसाहेबांचा पंधरा वर्षाचा दबदबा मोडीत काढून अशातच मिसरुड फुटलेला तरणाबांड गोकूळ सरपंच झाला. चांगलं कमावलेलं शरीर, *सटीच्या जत्रात मागच्या पाच दहा वर्षात हमखास कुस्त्या मारलेल्या गोकूळचं बोलणं मोठं भारदस्त पण लाघवी. कुस्तिच्या आखाड्यात तसेच कबड्डीच्या संघात खास दोस्त बनलेले त्याचे मित्र ग्राम पंचायतीत उर्वरीत गटांमधून निवडून आणलेले. आठ पैकी सात जागा घेऊन पॅनलनं भाऊसाहेबाला चांगलाच लोळवला होता. आता गावालाही या तरण्या पोरांकडून चांगल्या अपेक्षा होत्या. तशी गावात ग्रामसभेची दंवंडी झाली.

"आरं शिवा, हे ग्रामसभा काय हाय रं?", तमाकू चोळत चोळत घरातून बाहेर पडत नानांनी ग्राम पंचायतीवर निवडून आलेल्या आपल्या लेकाला प्रश्न टाकला.
"नाना, गावातल्या सगळ्या लोकांनी मिळून ठरवायचं आपल्याला काय काय करायचं ते. आन मग आमी गोकूळसंग जाऊन तहसीलमधून त्या कामाच्या मंजूर्‍या आणायच्या," शिवाने उत्साहाने उत्तर दिले.

या नव्या आणी हव्या हव्या बदलाने सगळेच गावकरी आनंदले होते.

"खंडोबाच्या तसंच गावातल्या सगळ्या वडीलधार्‍या मंडळींच्या आशिर्वादानं आन संवगंड्यांच्या प्रयत्नानं आपण आज आपल्या गावात इतिहास घडवलाय", नवीन सरपंच गावाकर्‍यांना सांगत होता, "आजपर्यंत ह्या अशा ग्रामसभा झाल्याचं कुणी कधी बघितलय का? नाही. कारन ह्या सभा व्हायच्या त्या आपल्या भाऊसाहेबांच्या चमच्यांच्या दप्तरात. तर आता बोला मंडळी आपल्याला काय सुधारणा करायच्या आहेत येत्या वर्षात?"

सुरुवातीला संकोच कराणारे गाववाले एकाने सुरु करताच एका नंतर एक बोलू लागले. कोणी म्हणत होता आधी बोरेवेल घेऊन दोन्-चार हापशे बसवून पाण्याचा प्रश्न सोडवायला हवा तर कोणाला आपल्या घराच्या बाजूची हगणदारी हटवायची होती तर कोणाला पाटाच्या पाण्याच्या आळी-पाळीत आपल्या गावचा नंबर आधी लावायचा होता. पण पुन्हा सगळे शांत झाले ते शांताबाईच्या मागणीवर, "मपल्या धोंट्याचा बाप मपली रोजंदारी उचलून दररोज ढुंगण उताणा करुन बेंदाडात पडतोय. गोकूळा, बा आता तूच सोडव मला ह्याच्यातून. एक तर हातभट्टी बंद कर न्हायतर प्यानार्‍यायला उचलून कुटं तरी गाडून ये".
धोंड्याच्या बापाप्रमाणे पिण्याची सवय असणार्‍या सर्व जणांच्या चेहर्‍यांवरचा उत्साह येव्हाणा मावळला होता.

"शांता काकी म्हणती ते बराबर हाये पण तिचं ऐकलं तर समदे पिदडे आपल्या विरोधात जातेल", रमेश शिवाच्या कानात कुजबुजला.

"ठीकय मंडळी, आता हे सगळेच विषय घेऊन आमी सगळे सदस्य तहसीलात जातो. एक एक करुन सगळ्याच गोष्टी करु आपण. पण जरा धीर धरा", गोकूळने वेळ मारुन घेतली अन सभा पण आटोपती घेतली.

आता ग्राम पंचायतीच्या आठ पत्र्याच्या त्या उजाड कार्यालयात नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांव्यतिरिक्त भिंतीवर लटकलेले गांधी आणि नेहरु ते काय उरले होते. बाकी ग्रामस्थांनी आपापल्या शेताकडे, गुराढोरांकडे आपला मोर्चा वळवला होता.

"गोकूळ, आपल्यला सालाकाठ किती फंड मिळणार हाये? आन त्याच्यात हे सगळं कसं भागणारे? आन मर्दा, आपलं ते सेवाभावी संस्थेचं कधी सुरु करणार?" रमेशला काही केल्या हे प्रश्न पोटात ठेवणे भाग नव्हते.

"जरा चड्डीत र्‍हा ना भौ! बुळकांडी लागल्यागत यवढा कामून घायी करायला तू?" शिवानं त्याच्या भाषेत प्रेमाचा सल्ला दिला.

"आरं गड्या शिवा, रम्या मनतोय ते पन बराबर हाये. आपण आतापसून ठरविलं तरच हे जमणार हाये. नाईतर पाच वर्षे कसे निघून जातेन कळायचे बी न्हाईत," गोकूळने दूरवच्या पिंपळाच्या उंच शेंड्याकडे बघत शिवाला बुचकळ्यात टाकले.

"रम्या, तू एक काम कर. मी तुला गायकवाड सायबानी दिल्याले पॉम्प्लेट देतो. त्याच्यात सरकारी योजना आन त्याला मिळणारे फंड ह्यांची रितसर लिश्ट हाये. त्या योजना आपल्याला कशा महत्वाच्या हायेत हे तू एका कागदावर लिहून काड. आन मग आपण संस्था रजिस्टर करायचा फार्स उरकून घेऊ." रमेशला त्याच्या आवडीचे काम देऊन गोकूळ आता शिवाकडं वळला, "गड्या शिवा, तुला गावात लयी सज्जन मानत्येत. आन तू बी तसा हाईस. तवा तू कनाय हे हापशे, हाणदारी, दारु भट्टी असल्या गोष्टीत लक्ष घाल. उपसरंच हायेस लेका तू."

"मंजे तुमी सगळे गावचे काम करणारे सज्जन आन मी मंजे संस्था टाकून तिच्यात चरायला सोडल्याला कठाळ्या व्हय रं? मायला म्हंजे पुडच्या टायमाला माझा पत्ता कट करायचा हाय का काय तुमा दोघांना," रम्यानं बरोबर हेरलं होतं. तसा गोकूळ त्याच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला, "आरं पाच वर्षात तू संस्था टाकून दुसरा भाऊसाहेब झालास तर लोकं तुला निवडून थोडेच देणार हायेत. तवा तुझ्या एखाद्या भावाला तिकीट देऊ. आता रेंद्यात हात घालायचा मनल्यावर जरा लांब र्‍हावा लागन का न्हाई. पन मनून आपन सगळ्यांनी तेच केलं तर कसं जमायचं? आन तूच तर मनीत व्हतास की आपल्याला एक टर्म दिली तरी बास पण संस्था काढाय मिळाली मंजी झालं. काय बराबर का न्हाई?"


क्रमशः

टीप - ही कथा सत्य घटनेवर आधारित असली तरी काल्पनिक आहे.
*सट: चंपाषष्ठी. खंडोबची जत्रा असते या दिवशी.


टीप:
ही कथा येथे पूर्वप्रकाशित केलेली आहे.

खपली

रुतलेल्या सहस्त्र जखमा
मी सांभाळतो उराशी
रुदनाचे सोयर तुटले
मज खंत ना जराशी

आक्रोश ना कदापी
ना द्रोह जीवनाशी
अजुनी सजीव आहे
ना राग हा तुझ्याशी

गाऊ नको वॄथा तू
माझी मलाच गाणी
वांझोट्या स्वप्नांनीही
मानले रिक्त हे पाणी

जा सोड इथेच आता
चल मोह पाश तोडू
झेपेना स्पर्ष हताचा
खपली नकोस काढू

टीप : ही रचना येथे पूर्वप्रसिद्ध केलेली आहे.

Tuesday, November 4, 2008

फ्वॉरेन रिटर्नचा समाचार!!

भारतातल्या काही मित्रांकडून मागच्या ३-४ वर्षात बरेचदा एक अजब इमेल आलेला. म्हटलं एकदा त्याच्यावर काय ते वैयक्तिक मत येथे मांडून ठेवावे व आला इमेल की पाठव हा दुवा हा मार्ग अवलंबावा. कोणी तरी अमेरिकेतून भारतात गेला आणि त्याचे कोणीतरी निरिक्षण करुन २१ मुद्धे तयार केले. तो फ्वॉरेन रिटर्न अतिशयोक्तिने वागत होता की हे मुद्दे लिहिणारा हे ते दोघे वा साक्षात देवच जाणो. बरेच मुद्दे केवळ pure exaggeration आहेत. तर काही गंमतीशीर आहेत.

21. Tries to use Credit Card in road side Hotel.
च्या मारी, कोण रे तो श्याणा!

20. Drinks and carries Mineral Water and always speaks of Health. (proving to be very health conscious).
आम्ही तर बॉ रस्त्याच्या कडेला पावभाजी, पाणीपुर्‍या खाल्ल्या. पण या मुद्यात दम आहे बरं का मंडळी. अमेरिकेत बरेच दिवर राहुन भारतात गेल्यावर जाम अजारी पडणारी अनेक मुले मी पाहिले आहेत. माझ्या पोरीला सुद्धा किडणी इन्फेक्शन झाले होते. हो, तिला आम्ही मिनरल पाण्याच्या बाटल्या अथवा उकळवलेले पाणीच दिले तरीही. डॉक्टर म्हणाले की हवेत असणार्‍या प्रदुषित धुळीमुळे व त्याची मुलांना सवय नसल्याने हे होतेच होते. तेव्हा एखाद्याच्या तब्येतीला झेपत नसेल तर त्याला उगीच दाताड काढण्याचा मुर्खपणा आम्ही तरी टाळतो.

19. Sprays DEO such so that he doesn't need to take bath.
काही तरीच!!

18. Sneezes and says 'Excuse me'.
अमेरिकेत आल्यावर मला जाणवलेल्या शिष्टाचारातली ही एक गोष्ट. चालताना चुकुन समोरासमोर आल्यावर भारतात "च्यायला दिसत नाही का" हे ऐकणे जसे सामान्य आहे तसेच किंबहुना त्याहुनही जास्त सामान्य "उप्स, आय ऍम सॉर्री" अथवा "Excuse me" हे ऐकणे सामान्य आहे. आणि काही कालावधी नंतर समाजातून अशा सवयी आपल्यात नेहमीच येत असतात. ही सवय वाईट नाही व हिला समांतर असा शिष्टाचार मराठीत नाही. आम्ही शिंक आल्यावर "श्री राम" अथवा "विठ्ठला, पांडुरंगा" अथवा केवळ "देवा" असे म्हणतो.

17. या सतराव्या मुद्यातील खाली दिलेल्यापैकी काही गोष्टि अतिशय सामान्य आहेत तर काहींमध्ये लक्ष देण्यासारखे आहे. (पुन्हा एकदा - ज्या अतिशयोक्ति आहेत त्यांना आम्ही फाट्यावर मारतो).

Says "Hey" instead of "Hi".
आम्ही हे दोन्हीही वापरत नाही. अमेरिकन लोकांशी वा कार्यालयीन कामांबद्दल बोलताना आम्ही लोकांना "हेलो" म्हणतो तर देशी बांधवांना "नमस्कार्"च म्हणतो. गंमत म्हणजे ज्या ज्या मित्रांनी हा इमेल मला पाठवला ते मात्र आवर्जुन "Hey" अथवा "Hi" म्हणतात असा अनुभव आहे. :)

Says "Yogurt" instead of "Curds".
अमेरिकेत सहसा योगर्टच मिळते. त्याला कर्ड म्हणने चूक आहे. तसेच भारतात योगर्ट म्हणने हा शुद्ध गाढवपणा आहे. अशा गाढवांच्या ढुंगणावर लाता माराव्यात ;)

Says "Cab" instead of "Taxi".
हे दोन्ही शब्द भारतात तसेच अमेरिकेत आलटून पालटून वापरले जातान मी पाहिले आहेत. तेव्हा या मुद्द्यांमध्ये याचा उल्लेख करणाराच गाढव म्हणावा लागेल.

Says "Candy" instead of "Chocolate".
उलट भारतातच गोळीला सुद्धा चॉकलेट म्हणताना पाहिले आहे. कँडी आणी चॉकलेट यांचा वापर विशिष्ट पदार्थांसाठी होतो ही माहिती हे मुद्दे लिहिणार्‍या आडाण्याला नसावी असे दिसते. स्वतःचे ज्ञान पाजळायचे अन दुसरे काय?

Says "Oh" instead of "Zero", (for 704, says Seven Oh Four Instead of Seven Zero Four)
Says "Cookie" instead of "Biscuit".
पुन्हा तेच. वरील दोन्ही मुद्द्यांशी समांतर.

Says "Free Way" instead of "Highway".
अमेरिकेत हायवे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. बहुसंख्य हायवे हे फ्रिवे प्रकारातले असतात ज्यांवर सिग्नल नसतो तसेच काही कर द्यावा लागत नाही. बाकी टोलवे, बेल्टवे (रिंग रोड) , वगैरे असतात. फ्रीवे शन्दाचा वापर हा सवयीचा परिणाम असावा. अर्थात आमच्या बाबतीत तसे होत नाही. भारतातले बरेच हायवे हे फ्रि वे प्रकारातले आहेत. मुंबई-पुणे हायवे चा उल्लेख मात्र एक्सप्रेसवे असा होतो. त्यात अक्षेप घेण्यासारखे ते काय?

Says "Got To Go" instead of "Have To Go".
पुन्हा लेखकाच्या बौद्धिक दिवाळखोरिचा नमुना.

16. Doesn't forget to crib about air pollution. Keeps cribbing every time he steps out.
भारतीय माणूस अंमळ बडबडा आहे. त्याच्या मनात जास्त काही रहात नाही. भारतात रहातात ते काय प्रदुषनाबद्दल ओरडत नाहीत? भारता पेक्षा कितीतरी पटीने जास्त पेट्रोलियम पदार्थ, प्लास्टिक, अशा प्रदुषणकारी वस्तू वापरुनही अमेरिकेत प्रथमदर्शनी कोठेच प्रदुषण दिसत नाही. तेव्हा आपल्या भावना जास्त प्रकर्षाने प्रकट होतात असे वाटते. अर्थात काही महानग स्वतः काही करुन दाखवण्यापेक्षा आपल्या देशाचा नावाने बोंबा मारण्यातच धन्यता मानतात हे सुद्धा मन्य.

15. Says all the distances in Miles (Not in KiloMeters), and counts in Millions.(Not in Lakhs)
अमेरिकेत आल्यावर काही दिवस मैलांचा वापर कसासा वाटतो. पण नंतर सवय पडून जाते. अर्थात हीच सवय पुढे भारतात गेल्यावर सुरु ठेवण्याची गरज नाही. काही सवंग लोक जर मुद्धामहुन तसे करत असतील त्यांची कीव करावी. काय म्हणता?

14. Tries to figure all the prices in Dollars as far as possible (but deep down the heart multiplies by 43 times).
हे मात्र काहितरीच. मला तरी भारत भेटीत रुपये वापरताना डॉलरचा विचारही डोक्यात येत नाही. हो मात्र अमेरिकेत बरेचदा रुपयांचा विचार येतो. जर हे कोणी मान्य करत नसेल तर पुन्हा त्याच्या सवंगपणाची कीव करावी.

13. Tries to see the % of fat on the cover of a milk pocket.
अमेरिकेत बरेच वर्षे राहिल्यावर या बाबतीत थोडाफार फरक होणारच म्हणा. जर तुम्ही डोळस असाल तर टिव्हीवरच्या जाहिराती वा दुकानात आकर्षक पद्धतीने ठेवलेले व त्यातल्या फॅट मधील प्रमाणानुसार वेगवेगळे केलेले पदार्थ तुम्ही नजरेआड करु शकता काय? आता हेच पहा, तुम्हाला दूध आणायचे आहे. दुकानात विटॅमिन डी वाले होल दूध, एक टक्का, दोन टक्का वा अगदीच फॅट नसलेले दूध पुन्हा ते ही साधारण वा ओर्गॅनिक असे विभागून ठेवलेले असते. अमेरिकेत प्रत्येक खाद्य पदार्थावर त्यात काय आहे व ते कशापासून बनवलेले आहे हे लिहिलेले असने आवश्यक असते. आम्ही सुद्धा आता सगळ्या पदार्थांवरची ही माहिती वाचून मगच खरेदी करतो. काय सांगा पुजेच्या प्रसादासाठी आणलेल्या एखाद्या पदार्थात मांस असेल तर! असो. अशा वातावरणात काही वर्षे राहिल्यावर सहजच ही सवय लागून जाते. पण भारतात गेल्यावर आम्ही आपसूकच भारतातल्या पद्धती नुसार खरेदी करतो.
जे परिस्थिनुरुप रहात नाहीत त्यांच्यात व बिजिंगला बर्फ पडल्यावर कोलकत्यात कोट घालुन बसणार्‍या लाल भाईंमध्ये मला तरी काही फरक वाटत नाही.

12. When need to say Z (zed), never says Z (Zed), repeats "Zee" several times, if the other person unable to get, then says X, Y, Zee (but never says Zed).
पुन्हा हे काहितरीच सवंग. आम्ही अशा वागणार्‍यांना फाट्यावर मारतो.

11. Writes date as MM/DD/YYYY & on watching traditional DD/MM/YYYY, says "Oh! British Style!!!!"
यातला अर्धा भाग सत्य आहे. अमेरिकेत आल्यावर मी सवयी नुसार सुरुवातीला बरेचदा DD/MM/YYYY मध्ये तारखा लिहिल्या आहेत. भारतात गेल्यावर बरेचदा याच्या उलट्या चुका होतात. पण "Oh! British Style!!!!" हे म्हणजे काहितरीच... अतिशयोक्ती!!

10. Makes fun of Indian Standard Time and Indian Road Conditions.
च्यायला म्हणजे अमेरिकेत जसे घड्याळाच्या काट्यावरच राहतात हे. इतक्या वर्षात एकाही भारतीय (वैयक्तिक वा सामाजिक) कार्यक्रमात सगळे वेळेवर आलेले मी तरी पाहिले नाहीत. आपला भारतीय प्रमाणवेळेचा प्रकार येथे पण चालू असतो. जर कोणी अशा शानपट्ट्या मारल्या तर त्याला फाट्यावर मारावे.
रस्त्यांबद्दल बोलायचे तर भारतात राहणारे काय कमी बोंबलतात? रस्ते अंमळ खराब आहेतच देशात.

9. Even after 2 months, complaints about "Jet Lag".
8. Avoids eating more chili (hot) stuff.
च्यायला. काय पण काय? निव्वळ फालतू अतिशयोक्ती आहेत या.

7. Tries to drink "Diet Coke", instead of Normal Coke.
आम्ही तर बॉ पाणिच पितो.

6. Tries to complain about any thing in India as if he is experiencing it for the first time.
लय वैतागलेला दिसतोय बॉ. पण हे मुद्दे लिहिणार्‍या शान्याला म्हणाव येकदा मला येऊन भेट.

5. Pronounces "schedule" as "skejule", and "module" as "Mojule".
आम्ही आपले मर्‍हाटीतूनच बोलतो. कसं? आन जर विंग्रजी फंडे मारायचे असले तरी आपल्य शिवराळ टोन मध्येच घेतो लपेटुन.

4. Looks suspiciously towards Hotel/Dhaba food.
आम्ही आशांना फाट्यावर मारतो. अन ढाब्यावर मस्तपैकी बुक्कीने कांदा फोडून जेवतो व वरती लस्सी मारुन निवांत ढेकर काढतो. ज्यांना याची लाज वाटते त्यांना त्यांच्या आय्-बापाची बी वाटत आसल.

3. From the luggage bag, does not remove the stickers of Airways by which he traveled back to India, even after 4 months of arrival.
ज्यांना आपला ओला टॉवेल खुर्चीवरून दोन्-दोन दिवस उचलायचा कळत नाही अशा आळशी माणसांना त्यांच्या बॅगवर लोंबळणारा तो टॅग काढायचा समजला तर सूर्य पश्चिमेला नाही का उगवणार? आळशी लोकांचा गुण तो. सगळ्यांना का चिटकवता हा टॅग?

2. Takes the cabin luggage bag to short visits in India, tries to roll the bag on Indian Roads.
हा हा हा... हे मात्र अतिच. अंमळ मजा आली वाचुन.

1. Tries to begin conversation with "In US ...." or "When I was in US..."
इच्छा असुनही पुन्हा युयस ला जायला जमणार नसेल तर त्या आठवणीवर जीवन काढाव्या लागणार्‍या अतृप्त आत्म्याचे लक्षण आहे हे. अथवा अमेरिकेत जाऊन आलो म्हणजे फार बाजीराव झालो असे समजून आर्ध्या हळकुंडात पिवळे होणार्‍यांचे.

बाकी वाचुन अंमळ मजा आली. ज्याने कोणी हे मुद्दे लिहिले त्याची मळमळ पोचली. त्याच्या अशांत आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थणा! ;)

Thursday, October 23, 2008

Fall colors on the way

या लेखाची मूळ मराठी प्रत पाहण्यासाठी
येथे टिचकी मारा (क्लिक करा).

Every season is a festival. But the most I like in New England is foliage. As the month of September comes close to end, lavish green nature starts changing colors to fluorescent yellow and red and you just keep watching while it is all colorful around you. Many people flock in to this area, specially New Hampshire. But this fall, I decided to appreciate local fall colors in Connecticut. These are some of the pictures I took on the way and back from my work to home.

As we head out from home, we are greeted by these beautiful colors around our home in the morning...


On the freeway, one feels as if these trees on either side are competing in a beauty contest...


And what could be the better reward than this to see the street names at an intersection?


Would you feel tired of driving on such a beautiful way? Never!


You are signal? No worries, just look beside and you would be pleased...


Such red bushy trees attract you the most!


By the way, we have come down Talcot mountain now and here it is on our left...


Now we are entering our parking...


And this small tree standing in front of my car parking makes me realize the fineness of The Creator.


The Lord has blessed all. Look at this small bush...


And just before we enter the building, these litchi like small trees wish us a good day!


Hushhhh... the day is over and it's getting dark. But look at this mountain. The shade of the golden sunlight!


These trees just outside our work saying good night...


And this is the view of the Talcot mountain from other side... over the lake... do you see that tower?


Whether it's uphill on the way to home or life, just cheer the colors we are blessed with and you would always win... I guess that's what these trees are saying.


And two more pics from taken from our parking lot.




You may see the feedback from others to this article at ...
misalpav.com

Tuesday, October 21, 2008

उत्सव - वाटेवरील रंग

Click here for English version of this article

सहा ऋतुंचे सहा सोहळे. पण मला बुवा या न्यु इंग्लंडातली पानगळती (फॉलियेज/फॉल) फार आवडते. उन्हाळा संपून गुलाबी थंडी सुरु होते तसा हिरवा गर्द असणारा निसर्ग रंग पलटू लागतो. उंच-उंच झांडांचे शेंडे पिवळे-लाल पडू लागतात व बघता बघता सगळा परिसर पिवळा धमक व लाल भडक मखमलीने सजून गेलेला असतो.

वरमाँट, न्यू हँप्मशरला तर सगळेच जातात. पण दररोज आनंद देणार्‍या कामावर जाताना दिसणार्‍या आजूबाजूंचा झाडांचे कौतुकही करावे म्हणून मी विषेश चित्रे काढली. पहा तुम्हाला भावतात का....

या गर्द झाडीने आमच्या घराच्या परिसराला खुलवलेले आहे...


पुढे हमरस्त्याला लागल्यावर दोहोबाजूंच्या सौंदर्याची जणू स्पर्धाच चाललेली असते.



चौकात रस्त्यांची नावे पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला निसर्गा येवढे बक्षीस कोण बरे देऊ शकेल?



हा सुंदर रस्ता संपावा असे कोणाला बरे वाटेल!!


सिग्नल लागलेला आहे?... जरा बाजूला पहा... जराही कंटाळवाने होणार नाही!


अशी लालबुंद झाडे गावच्या गुलमोहराची आठवण करुन देतात, नाही का?


असा सजला आहे हा टॅलकॉट डोंगर...


चला आता आम्ही कार्यालयाच्या वाहनतळात वळत आहोत. स्वागताला हे ताम्र-तरु सज्ज आहेत... धन्यवाद मित्रांनो!


हा छोटासा वृक्ष उगाच मला हिनवत असतो, "तुम्ही मानव करु शकता का अशी सुंदर निर्मिती?".. . नाही बा, आम्ही नतमस्तक आहोत तुझ्या सौंदर्यासमोर अन आपल्या त्या विधात्या समोर!


त्या विधात्याने सर्वांना वाटून दिलं आहे. अगदी या खुरट्या झुडुपाला सुद्धा किती मनमोहक बनवलं आहे पहा ना...


आणी ही लिची सदृश्य झाडे पहा ना... टपोरी लाल-लाल फळे कशी खुलून दिसताहेत.


चला आता कामावर जातो...

संध्याकाळी परतताना...

मावळतीच्या उन्हात न्हाऊन निघालेला हा टॅल्कॉट डोंगर व त्याच्यावर असणारा मनोरा... खुनावतो आहे. गड्य येतो तुला भेटायला शनि-रविवारी.


कार्यालयातून बाहेर पडताना... गड्यांनो दिवसाचा सगळा शीन घालवलात.


तोच टॅलकॉट डोंगर विरुद्ध बाजूने... तळ्यामागे...


"चढन रस्त्याचे असो वा जीवनाचे... उगवत्या सुर्याच्या तेजातले वा मावळतीच्या मंद पोक्तीचे... रंगीबेरंगी असल्याने चढताना दम लागत नाही हेच खरे... फक्त डोळे अन मन उघडे हवे"... हेच तर सांगत नाहीत ना या चढनावरची ही झाडे?



जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे दोन्ही जुळती.




या छायाचित्रांवरील प्रतिसाद येथे पाहता येतील.
misalpav.com

Wednesday, October 1, 2008

Letter to my college and govt of Maharashtra

TO,
Resp. Principle,
M S Bidve Engineering College,
Latur, Maharshtra

AND

The Government authorities,
Education Dept,
Latur, Maharashtra

AND
The state Government of Maharashtra,

Reference: Letter from M. S. Bidve Engineering College, Latur.


Dear Sir,

My dad handed over this letter to me during my last Bharat visit in July 2008. The letter says that a tuition fee waiver of Rs. 4,000 has been approved and ready for me to take it… but for year 1998-99.

After looking at this letter, I recalled all those unfortunate moments from my memory which this money could have helped me avoid had it been received on time, ten years ago. It was worst financial time for my parents who were funding my education. It would have served me a good food for a whole semester… I remember a semester when I had to take my meals in a “zunka-bhakar Kendra” in Shivaji Chauk… and sometimes I couldn’t even afford enough of zunka-bhakari as I had no money in pocket. This money would also have saved a lot of time that I wasted in waiting for a lift to college as I could not afford auto rickshaw or even bus sometimes. Or it could have given my parents little comfort to buy enough grocery and edible oil or a pair of chappals which they could not afford at times.

From the years of 1995-96 through 1998-99, without fail, I applied for these fee waivers under the scheme of primary school teachers’ children education program. Only one of those waivers was received while I was studying. And this is second one… where are other two?

By the grace of good lord, now this letter has no physical importance in my life. But I still want to dig it down so that no other eligible student would face financial humiliation because of unreasonable college and government staff.

Regards,
Bhaskar Kende

Friday, September 19, 2008

पाऊस - बालगीत

मागच्या जुलै महिन्यात इयत्ता सहावीच्या माझ्या भाचीला भेटायला गेलो होतो. तेव्हा त्या भेटीदरम्यात तिने एक छोटीशी मुक्त छंदातली कविता माझ्यासाठी लिहून दिली. ती अशी...

सर सर सर वारा सुटला
काळ्या ढगांना घेऊन आला||

रिमझिम रिमझिम पाऊस आला
इंद्रधनुष्य खुलवू लागला ||

वीज कडाडली कड कड कड
थेंबे बरसली टप टप टप||

झाडे वेली फुलपाखरे
आनंदली पशु पाखरे ||

धरतीचा हा सुगंध आला
आसमंती दरवळू लागला ||

धरती माता आनंदली
खुदू खुदू हसू लागली ||

--कु. प्राजक्ता वांजरखेडकर, अंबाजोगाई, इयत्ता ६वी

Wednesday, September 17, 2008

मुलींचा अनुशेष

या विषयावर येथे चर्चा सुरु आहे


मागच्या आठवड्यात आमच्या पुतणीला (वर्ग सहावी) राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कांस्यपदक मिळाले. या स्पर्धेत तिला व आमच्या बंधुंना (जे तिच्या सोबत अंतिम फेर्‍यांसाठी दिल्लीला स्पर्धेसाठी गेले होते) आलेले अनुभव ऐकून व्यथित होऊन आम्ही चाटच पडलो. कारण राष्ट्रीय स्पर्धा म्हटल्यावर चुरशीने होणार्‍या स्पर्धा तसेच स्पर्धकांव्यतिरिक्त आयोजक, पालक, स्नेही यांचा स्पर्धेतील उत्साह, उक्तंठा याची अपेक्षा होती. पण जे ऐकले ते असे...
१. महाराष्ट्रातून शालेय गटात केवळ एका मुलीसोबत तिचे पालक स्पर्धेला आले होते (अर्थात आमचे बंधु). बाकी मुलींच्या पालकांना एकतर या स्पर्धांचे महत्व नव्हते वा असूनही त्यांच्या अर्थिक परिस्थितीमुळे ते येऊ शकले नव्हते.
२. जवळपास सर्वच सहभागी मुली मध्यम वा गरीब घरातल्या होत्या. ... कदाचित सर्व श्रीमंत घरातील मुलींना डॉक्टर-इंजिनिअर बनायचे असेल??
३. बर्‍याच फेर्‍या खेळाडू अनुपस्थित राहिल्याने उपस्थित खेळाडूंना विजेते घोषित करून आटोपण्यात आल्या. एका सूवर्णपदक विजेत्या मुलीला शेवटच्या चार फेर्‍या खेळव्याच लागल्या नाहीत... तिच्या गटात स्पर्धकच नव्हते!
४. बहुतांश विजेत्या मुली "चला शासनाची नोकरी पक्की" या विचारानेच सुखावल्या होत्या.

आमच्या पुतणीला गेल्या वर्षी सुद्धा बर्‍याच स्पर्धांमध्ये हा अनुभव आला होता. कब्बडी, कुस्ती, लांब उडी, उंच उडी, मल्लखांब, दोर्‍यांवरच्या कसरती अशा अनेक खेळात जिल्हा पातळीवर एकदोन स्पर्ध येतात व विजयी होतात असे विदारक चित्र महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर पहायला मिळते.

काय चालले आहे हे? अशा पद्दतीने निवडल्या गेलेल्या खेळाडूंकडून आपण ऑलम्पिकमध्ये पदक आणण्याची आशा कशी करणार? आपण एक सुजान नागरीक म्हणून आपल्या आजूबाजूच्या मुलींना खेळांमध्ये या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी काय करु शकतो? खेळाने मुलांचा सर्वांगिण विकास होतो व अभ्यासाठी आवश्यक असणारे मनोबल, शारिरिक क्षमता निर्माण होते हे आपण पालकांना कसे पटवून देऊ शकतो?

मला वाटते मुलांच्या स्पर्धांमध्ये सुद्धा कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र असावे. मुलांमध्ये खेळाची आवड असणार्‍या व पालकांचा पाठिंबा असणार्‍यांचा कल सुद्धा जास्त करून क्रिकेट वा टेनिस, फुटबॉल अशा आजकाल पैसा/प्रसिद्धि देणार्‍या खेळांकडे असतो.

शासन दरबारी तर सगळा आनंदी आनंदच आहे. ऑलम्पिक समितीकडून कसलीही मदत न झालेल्या सूवर्णबिंद्राने स्वकष्टाने/स्वखर्चाने यशशिखर गाठले आणी आपल्या पुण्यात "भव्य" सत्कार झाला तो कलमाडींचा! का, तर कमिटीचे अध्यक्ष म्हणून!! यश मिळवलेल्या त्रिमुर्तींनी दोन्-तीन आठवडे प्रसारमाध्यमे गाजवली. त्यांच्यावर बक्षिसांची खैरात पण झाली. पण केवळ एक्-दोन महिन्यात आपली ही प्रसार माध्यमे, समाज व सरकार हे कदाचित या त्रिमुर्तींना विसरूनही गेले. येत्या काही वर्षात व पुढील पिढीत असे शेकडो अभिनव कसे तयार होतील याच्यावर कोणी काही केल्याचे ऐकीवात नाही. तेव्हा अशा या नाकर्त्या शासनाकडून काही अपेक्षा न ठेवलेल्याच बर्‍या.

पण मग खेळातला हा मुलींचाच नव्हे तर मुलांचा तसेच आपल्या देशाचा अनुशेष कसा भरून काढता येईल??

तिथींचा महिमा

आमच्या आजोबांनी लहानपणी शिकवलेले...


गुढी पाडवा एकाचा
तुकाराम बीज दोनाचा
अक्षय तृतीया तिनाचा
गणेश चतुर्थी चाराचा
नागपंचमी पाचाचा
चंपा षष्ठी सहाचा
रथसप्तमी साताचा
कालाष्टमी आठाचा
राम नवमी नवाचा
विजया दशमी दहाचा
आषाढी एकादशी आकराचा
कार्तिकी द्वादशी बाराचा
धनत्रयोदशी तेराचा
नरक चतूर्थी चौदाचा
हनुमान जयंती पंधराचा


आकड्यांचा महिमा चर्चा येथे सुरू आहे. त्यातून...

Thursday, September 11, 2008

अवडंबर

कथा काल्पनिक आहे. एखाद्या व्यक्ति वा परिस्थितीशी साम्य वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
वार्‍याची हळुवार आलेली झुळूक जशी मावळत्या उन्हात लांबच लांब कललेल्या झाडांच्या सावल्यांना झाडाच्या फांद्यांपेक्षा जास्तच हलवत होती तशीच ती लक्ष्मीच्या तगमगत्या देहावर हळूच गारव्याचा भासही देत होती. नेहमीच वक्तशीर असणारी लक्ष्मी आज उशीर होऊ नये म्हणून धडपडत होती. 'कशाला मी त्या जुनाट ट्रंकेतून या सगळ्या आठवणींच्या गाठोड्याला काढत बसले?' असे स्वगत विचारत ती एकएक वस्तू पुन्हा तीत ठेऊन देत होती. लग्नात माहेरुन आलेला बाळकृष्ण कितीतरी दिवसांनी पाहताना तिला अंमळ चुकल्यासारखे वाटत होते. पेटारा बंद केला पण बाळकृष्णाचा हाताला झालेला स्पर्श बर्‍याच आठवणींना जागा करून गेला होता.

काळोख दाटून येऊ लागला तसे लक्ष्मीनं दिवाणखान्यातले व माडीतल्या प्रशस्त खोल्यांचे मंद दिवे लावले. तशी आज तिच्याकडे लोकांची वर्दळही नव्हती.
- - - - -

लक्ष्मी जीवनात आली अन कालपर्यंतच्या गोरक्याला गाव हळूहळू गोरख म्हणू लागले . आई-बापाची, बायकोची काळजी घेणारा गोरख कष्टाळू होता. बहिनीच्या लग्नातले कर्ज या सालात मोकळे करुन पुढच्या पाडव्याला एखादी बैलजोडी घ्यायच्या जिद्दीनं रानात राब-राब राबत होता. बायको पण पदर कमरेला खोऊन साथ देत होती. म्हातारे आई-बाप होईल तेवढं जनवार-ढोर, खुरपनी, राखनी करायचे. सगळ कसं सुखात चाललं होतं. पण नदीला महापूर काय आला आणी सगळं होत्याचं नव्हतं झालं. आई-बापाला वाचवायला गोरख्यानं पुरात उडी मारली आणी सगळ्यांवरच काळानं झडप घातली.

पण मागे उरलेल्या लक्ष्मीला काम मिळालं ते बरं झालं. पोटचा अंकूर रोपटं बनू शकला. पुरग्रस्तांना मदत करायला परदेशातून पैसे आणलेल्या संस्थेने दवाखाना काढला. त्यात लक्ष्मीला काम मिळालं.

डॉक्टरच्या हाताखाली काम करता करता, पुढं नर्स झाली. जिल्ह्याच्या ठिकाणी त्याच संस्थेचा मोठा दवाखाना झाला. तिथं बढती मिळाली. दवाखान्यात व्यवस्थापनाची तसेच धर्मप्रचाराची धुरा मोठ्या नेटाने पुढे चालविली. पुढे संस्थेचा व्याप वाढला. संस्थेनं मोठी शाळा सुरु केली. तिथल्या बर्‍याच जबाबदर्‍या आल्या. पोर सुद्धा मोठं होत गेलं. संस्थेने पुढं त्याला विदेशात शिक्षणासाठी पाठवलं. चार गावात नाव झालं.

हे सगळं मिळवताना लक्ष्मीला काय कमी कष्ट पडले? पण आता हा कष्टाचा रगाडा ओढवत नव्हता. तसेही आजूबाजूच्या गावातल्या अनेक लक्ष्म्यांना पोटापाण्याची भ्रांत होती. त्यातली एक मालन. तिची गरज, तिची गुणवत्ता, हे सगळं बघता ती यापुढे आपली कामे यशस्वी रित्या करील अशी लक्ष्मीची खात्री होती. म्हणूनचा आज तिला लक्ष्मीनं खास बोलावून घेतलं होतं. लेकरांना चांगलं शि़क्षण, रहायला संस्थेची जागा, नोकरी, हे सगळं मिळणार म्हणून मोठ्या आशेनं आलेली मालन दारात वाट पहात उभी होती. ती दिसली तशी लक्ष्मी तिला सामोरी गेली. मालनला नोकरी, पगार, कामे हे सगळं समजाऊन सांगितलेलं होतच. बर्‍याच वर्षापूर्वी त्या पूरग्रस्त गावात तिच्याही जीवनाला अशीच नवी दिशा देणारा असा दिवस उगवला होता. त्यावेळीही असेच या संस्थेत मान असलेले, फादर रोड्रीग्ज कलकत्याहून पूरग्रस्त गावात आले होते. त्यांच्याशी ओळख करुन देऊन झाली. एवढा दीर्घ अनुभव पाठीशी असूनही त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सतत नवनवीन उपक्रम राबत राहणे ही त्यांची खासीयत होती. अशाच एका नवीन पर्वाची सुरुवात करण्यासाठी फादर तयार झाले.

कथेवरील प्रतिसाद व चर्चा येथे पहा

आख्खे काश्मीर भारतात!!

आज बीबीसी वाल्यांनी आमचा दिवस आनंदी करायला मदत केली बॉ.... चक्क पाक व्याप्त काश्मीर भारताच्या अख्त्यारीत दाखवून. हे पहा...

From Kashmir on BBC


नाहीतर नेहमी ते काश्मीरचा भूभाग हा असा दाखवतात ज्यात पाकव्याप्त काश्मीराला पाकीस्तान कंन्ट्रोल्ड काश्मीर उल्लेखले जाते.
From Kashmir on BBC


या विषयावर अधिक चर्चा येथे पहा

आपला,
(अखंड-भारतवादी) भास्कर

Wednesday, September 10, 2008

तुरुंग फोडायचा आहे

रोज आठ तास आम्ही तुरुंगात असतो. ५ बाय ५ च्या चौकटीत बसून बाहेरचे तापमान किती आहे ते संगणकावर पाहतो. बायकोचा फोन आला की लेकरांचा आवाज अस्पष्ट ऐकतो. आई-वडिल गावी कसे असतील याचा विचार करतो. किमान पुढच्या वर्षीची दिवाळी तरी भावंडासोबत घालवायची हा विचार करत ५ चा ठोका किती वेळाने पडणार असे म्हणत देवाने दिलेले सुंदर आयुष्य चार दमडीसाठी सडवतो.

हा तुरुंग फोडायचाय. ३६५ पैकी ३६५ दिवस शेतात उघड्या छातीने घाम गाळायचाय पण .... पोराबाळांच्या मुखात दोन घास जातील याची खात्री करून (मराठवाड्यातल्या शेतकर्‍याचे स्वप्न शेवटी!).

एक नाटक बसवायचय... दिनानाथ मध्ये चालवालया नाही पण संध्याकाळी गावच्या चावडीत दाखवायला.

आणी पंतप्रधान बनायचय.... समान नागरी कायदा करायला.

आपला,
(कैदी) भास्कर

http://www.misalpav.com/node/3391#comment-48221

Wednesday, August 27, 2008

ओरिसा - पोप महाशयांचे दु:ख

सध्या ओरीसात जे काही चालले आहे त्याने प्रत्येक भारतीयाला दु:खच होत आहे. तसेच आज पोप महाशयांनी सुद्धा या विषयाबद्दल त्यांची चिंता व्यक्त केली. मला बुवा त्यांची कमाल वाटते.

काही आठवड्यांपूर्वी याच पोप महाशयांनी ऑस्ट्रेलियात जाऊन तेथील मूळ वंशजांची माफी मागितली होती. त्यात त्यांनी "मूळ वंशजांची संस्कृती, धर्म व भाषा यांचा ख्रिश्चनांनी नाश केला" याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. या अगोदर पोप महाशयांनी अशा प्रकारच्या माफी अमेरिकेत व इतरत्र सुद्धा मागितल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला याबद्दल त्यांचा आदरच वाटणार. जर शांतीदूत म्हणजे जर कोणी असेल तर केवळ हेच अशी अनेकांची यामुळे समजूत होणे शक्य आहे!

पण जरा खोलात जाऊन बघितल्यास आपल्या लक्षात येईल की त्यांनी ज्यांची माफी मागितली ते आता ख्रिश्चन धर्मात जवळपास संपूर्णपणे मिसळून गेलेले आहेत. त्यांना त्यांचे धर्म, संस्कृती वा भाषांचे पुनरुज्जीवन करणे केवळ आशक्य आहे. जर पोप यांना खरेच पश्चताप होत असेल तर त्यांनी येथून पुढे असे होऊ नये याची काळजी घेतल्यास जगातले बरेच प्रश्न कमी होतील.

भारतापुरते बोलायचे झाल्यास पोप महाशयांनी खालील गोष्टी कराव्यात जेणे करून त्यांना आजच्या सारखा शोकसंदेश पुन्हा द्यायची वेळ येणार नाही.

१. भारतात मिशनर्‍यांनी धर्मांतरे पूर्ण बंद करावीत जेणेकरून स्थानिक लोकांची त्यांच्या धर्म/संस्कृती पासून नाळ तुटणार नाही.
२. मिशनरी शाळांतून सक्ती असणारे हे नियम पुर्णतः रद्द करावेत जेणेकरुन मुलांची त्यांच्या संस्कृतीशी नाळ ढिली होणार नाही...
मुलींनी टिकली न लावणे, सणावारंना सुटी न घेणे, सक्तीने ख्रिस्मस साजरा करायला लावने, बळजवरीने बायबलवरील "प्रोजेक्ट" करुन घेणे (न केल्यास खूप कमी मार्क देणे वा नापास करणे), डब्यात भारतीय जेवन आणन्यास मज्जाव करणे, वगैरे.
३. सेवाभावी मिशनरी दवाखाण्यातून कसल्याही धार्मिक शपथा वगैरे न घ्यायला लावता रुग्णांची सेवा करणे. (येशु महाराजांची आरती न म्हणनार्‍यास इलाज लागू होत नाही अशा तद्दन फोटारड्या गोष्टी सांगून आदिवासींना न फसवने).
४. भुकंप/पूर वगैरे नैसर्गिक आपत्तींच्या वेळी कोणाच्याही नावात बदल न करता मदत करने.
(सर्वांत महत्वाचे) - ५. आतापर्यंत धर्मांतरीत झालेल्या भारतीयांना त्यांच्या मूळ संस्कृती/धर्मा नुसार पुन्हा जगणे शक्य आहे. त्यांची माफी मागून त्यांना परत आपल्या मूळ धर्मात जायला सांगावे.

वरील मुद्दे २,३,४ सारख्या अनेक बाबी आहेत ज्या स्थानिक हिंदूंना ख्रिश्चनांच्या विरुद्ध भडकवतात. त्यांनी या टाळल्या तरच या दोन धर्मांमध्ये सलोखा निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतू मिशनर्‍यांचे डाव वेगळे आहेत. पुर्वांचलात ख्रिस्ती धर्म मोठा करुन आल्पसंख्यांक हिंदूंना आपल्या इशार्‍यावर नाचवायला सुरु केल्यावर त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी अदिवासी/वनवासी भागातील भारतीयांना आपले "टार्गेट" बनवून धर्मांतरांचा सपाटा चालवला आहे व या मार्गात कोणी स्वामी लक्ष्मानंद सरस्वतीसारखा आलाच तर त्यांचा काटा काढून बाकीच्यांना दहशत बसवून आपले काम फत्ते करण्याचा त्यांचा मानस दिसतो आहे.

आपल्याला पोप यांच्या भुमिकेबद्द्ल काय वाटते?

Tuesday, August 19, 2008

६१ वा स्वातंत्र्यदिन की ६२ वा?

मंडळी, हा आपला ६१ वा स्वातंत्र्यदिन की ६२ वा?

काही वॄत्तपत्रे म्हणतात एक्सष्टावा तर काही बासष्टावा. माझे मत... एकसष्टावा. का?
१५ ऑग. १९४७ ला पहिला स्वातंत्र्यदिन.
१५ ऑग. १९४८ ला दुसरा.
१५ ऑग. १९५८ ला बारावा.
१५ ऑग. १९६८ ला बावीसावा.
.
.
.
१५ ऑग. २००८ ला बासष्टावा.

मग ६१ च घोळ का? समजा आमचा बब्या एक वर्षाचा झाला... तर तो त्याचा पहिला वाढदिवस. दोन वर्षाचा झाला तर दुसरा. मात्र आपला देश ६१ वर्षाचा झाला तर तो त्याचा ६२ वा स्वातंत्र्यदिन, नव्हे का?

Friday, August 15, 2008

रशियाचा धडा

मागच्या आठवड्यात रशियाने एका धडाक्यात जवळ जवळ अख्खा जॉर्जिया पदक्रांत केला. कारण काय तर दक्षिण-ओसेटिया या जॉर्जियाच्या फुटीर भागात जॉर्जियाने पुन्हा आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली होती. त्यात जॉर्जिया पडला अमेरिकेचा मित्रदेश! त्यांचा प्रभाव आपल्या परसदारात वाढू देणे रशियाच्या पचणी पडणारे थोडेच होते! मग काय... शेकडो रशियन रणगाडे निघाले. एक-दोन दिवसात दक्षिण-ओसेटिया व अब्खाजिया हे फुटीर प्रांत रशियाच्या ताब्यात घेऊन जॉर्जियाची राजधानी त्बिलीसीच्या आवारात जाऊन उभे राहिले.

आता पुढे काय?

  • दक्षिण-ओसेटिया व अब्खाजिया हे फुटीर प्रांत रशियाशी जोडले जातील वा स्वतंत्र देश बनतील.

  • जॉर्जियाने नाटो सदस्यत्व घेऊ नये असे बंधन त्यांच्यावर घातले जाऊ शकते.

  • रशियन सैन्यावर केवळ जॉर्जियाच नव्हे तर इतर शेजार राष्ट्रे सुद्धा हल्ला करण्याचा केवळ विचारही करणार नाहीत.


आता श्रीलंकेचे उदाहरण...
श्रीलंकेन सैन्याने तमिळ वाघांच्या बिमोडासाठी निकराची चढाई केली आहे. अगोदर हवाई हल्ला करून नगरीकांना हुसकावने व तमिळ वाघांचा सफाया करत गाव्/शहर कबिज करने हा त्यांचा धडाका चालू आहे.

आणि आता कश्मिर...
कर्फ्यूच्या काळात लाखो लोक (त्यात खरे कश्मिरी किती व पाकचे भाडेकरू किती हा प्रश्न निराळा) पकिस्तानी झेंडे हातात घेऊन ताबारेषा ओलांडून मुजफ्फराबादला निघतात व त्यांना आडवता आडवता पोलिसांना/सैन्याला गोळ्या चालवाव्या लागतात... काही तासाच्या आत भारताने मुस्लिमांचे रक्त सांडले अशा आशयाच्या सचित्र बातम्या बीबीसी, सिएनएन सारख्या आघाडीच्या वृत्तवाहिन्यांवर झळकतात व खुलेआम भारताची बदनामी करतात.

तात्पर्यः
आपल्या नेतृत्वात हा प्रश्न सोडवन्याची इच्छाशक्ती संपली आहे का की ती कधीच नव्हती? जगातल्या दुसर्‍या क्रमांने मोठ्या सैन्याला कश्मिरप्रश्न हाताळता येत नाही यावर कोणाचाच विश्वास बसू शकत नाही.

वेळोवेळी जगातल्या मुत्सद्दी राज्यकर्त्यांनी त्यांचे प्रश्न तत्पुरता राजकीय तोटा सहन करून मोठ्या हिमतीने सोडवले आहेत. रशिया त्यांच्या शेजार देशातील गडबडीला तर श्रीलंका त्यांच्या फुटिरवाद्यांना तसेच हिमतीने हताळत आहेत. हेही तसेच एक उदाहरण. त्यातून भारताचे नेते/मुत्सद्दी (कोणी असतील तर) काही शिकतील का? आपले मिळमिळीत धोरण हा प्रश्न सोडवू शकेल का?

Thursday, January 10, 2008

सूर्यनमस्कार यज्ञ, शक्तिची उपासना

या वर्षी दुसर्‍यांदा अमेरिकेत हिंदू स्वयंसेवक संघ या संस्थेने सूर्यनमस्कार यज्ञ आयोजित केला आहे. या यज्ञ कालावधित वेगवेगळ्या ठिकाणी सर्व सहभागी लोकांनी मिळून कमित कमी दहा लाख सूर्यनमस्कार करायचे असा या यज्ञाचा निर्धार आहे. दररोज केवळ सात-आठ मिनिटे देऊन सुद्धा आपण सूर्यनमस्काराच्या माध्यमातून निरोगी राहू शकतो याची जाणीव लोकांना व्हावी तसेच व्यायामाची, योगासनांची गोडी निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा हेतू. आम्ही गेल्या वर्षी या कार्यक्रमात सहकुटुंब सहभागी झालो होतो. त्यासाठी आम्ही या संकेतस्थळावरुन चलतचित्रफित उअरवून घेतली होती व त्यासोबतच आम्ही सूर्यनमस्कार करत असू. यज्ञाच्या २१ दिवसाच्या कालावधित सूर्यनमस्काराची जी सवय लागली ती अद्याप अखंडपणे चालू आहे. अगदी भारतभेटीला गेल्यावर तिथे सुद्धा नातेवाईकांसमवेत आम्ही सूर्यनमस्कार करत असू.

या उपक्रमात या संस्थेव्यतिरिक्त अनेक स्थानिक संस्था, नगरपालिका, महानगरपालिका, मंदिरे, वगैरे सुद्धा सहभागी होत आहेत. गेल्या वर्षी तर एका राज्याने तर इतर काही शहरांनी या यज्ञा दरम्यान योग-दिन जाहीर केला होता. आपल्या संस्कृतीचा असा जागतीक प्रसार होताना पाहुन मनाला आनंद तर होतोच शिवाय त्यामुळे इतरांचेही कल्याण होते आहे हे पाहून आत्मिक समाधानही मिळते.

आपण सुद्धा या उपक्रमात सहभागी होऊन स्वतःचा फायदा का करुन घेत नाही?

----
या लेखावर येथे चर्चा चालू आहे.

Friday, January 4, 2008

दंत (कथा नव्हे) अनुभव

आरोग्य पत्रिकात सगळे विद्वान सांगत असतात की तुम्ही कितीही पैलवान असाल पण जर दाताच्या आरोग्याकडे तुमचे लक्ष नसेल तर तुमच्या अरोग्याला तुम्ही सुरुंग लावलेत असे समजा. दात खराब असतील म्हणजे किडलेले असतील वा साफ केलेले नसतील तर तुम्ही खात/पीत असलेल्या प्रत्येक घासा सोबत/घोटासोबत तुम्ही त्या अन्नाचे मारेकरी पोटात पाठवत आहात. अन्नाची वाट लाऊन हे जीवजंतू स्वस्थ बसतीलच असे नाही तर तुमच्या पचन संस्थेवर तसेच पुढे शरीरात शिरुन आतल्या अनेक संस्थांवर ते हल्ले करत राहतात.

म्हणजेच निरोगी रहायचे असेल तर दातांना सुद्धा निरोगी ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य बनते. सुदैवाने वा दुर्दैवाने आम्हाला पाश्चात्य जीवनाबरोबरच भारतीय ग्रमीण तसेच शहरी जीवन सुद्धा चांगलेच अनुभवायला मिळाले आहे. या तिन्ही जीवनपद्धतीत आमच्या दंत आरोग्यावर वेगवेगळे परिणाम झाले. त्यांना येथे उतरवत आहोत.

ग्रामीण जीवन :
आमच्या परस बागेत तसेच गावात कडुलिंबांची संख्या भरपूर असल्याने कडुलिंबाची काडी हे आमचे दात साफ करण्याचे (केवळ घासन्याचे नव्हे) मुख्य साधन असे. कधी कधी बदल म्हणून मोगला, उंबर (औदुंबर), सुबाभूळ, वगैरे झाडांच्या काड्या सुद्धा आम्ही वापरत असू. फार कोवळी वा फार मजबूत नसलेली एक वीतभर काडी एका टोकाला आडकित्त्याने व्यवस्थित तोडून नंतर तिला हळू-हळू चावत चावत एका टोकाला एक इंचभर लांबीचा ब्रश बनवायचा. मग त्या मऊ पडलेल्या ब्रशने दातांच्या मधून तसेच हिरड्यांची सफाई करायची. ब्रशचे धागे नैसर्गिक रित्या तयार झालेले असल्याने त्यांत लहान मोठे तसेच मजबूत व मऊ असे सगळ्या प्रकारचे धागे असत. ब्रश तयार करताना दाढींचे पृष्ठभाग साफ व्हायचे तर नंतरच्या ब्रशमुळे दातांच्या मधले अन्नकण पूर्णपणे निघून जात. कडुलिंबाच्या औषधी गुणांमुळे घशातले जीवजंतूही मरुन जात व दिवसभर श्वास कसा मस्त तजेलदार रहात असे.

शहरी जीवन :
आमच्या दातांना थोडेफार ग्रहण लागले ते शहरात रहायला लागल्यावर. कडुलिंब न मिळाल्याने नाईलाजाने आम्हाला ब्रश-पेस्टचा सहारा घ्यावा लागला. आपल्याकडे अजूनही खूप चांगल्या प्रकारचे ब्रश वापरणे सामान्यांच्या आवाक्यातले नाही (किमती हजार रुपयांच्या पुढे आहेत). साधारण ब्रशने दांतांच्या मधले किटाणू जात नाहीत तसेच हिरड्यांची सुद्धा झीज होते. एकंदरीत शहरी पद्धतीने (ग्रामीण भागात सुद्धा) राहणार्‍या सर्वांच्या दांचे आयुर्मान प्रचंड कमी असते. पन्नाशीत बत्तीशी पूर्णपणे गमावलेले अनेक लोक आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. काही म्हणतात की ही आपल्या समाजाची संक्रमण अवस्था आहे. पण त्यासाठी काय दोन-तीन पिढ्यांनी आपले बलिदान द्यायचे? मी केवळ दातांचेच नाही तर त्यांच्या आयुष्याचे म्हणतोय. कारण निरोगी दात असतील तरच निरोगी आरोग्य.
बरे आपल्याकडचे डेंटिस्ट तरी काय मजेशीर. मी मुंबईतल्या एका चांगल्या डेंटिस्ट कडे सहामाई दंतसफाई साठी गेलो होतो. त्याने माझे दात साफ करायचे सोडून सल्ला दिला की तुझे दात साफ करायची काही गरज नाही कारण दात-हिरड्या फार व्यवस्थीत दिसत आहेत. आणि नेहमी-नेहमी अशी सफाई केल्याने तुझ्या हिरड्यांची झीज होईल (व्यवस्थित सफाई केल्यास हिरड्यांना इजा पोचत नाही हे मी त्याला शिकवायाची गरज पडावी?). मी म्हटलो की मला कधी-कधी दुर्गंधी आल्यासारखी वाटते. तर म्हणाला की तुझ्या दाताला शक्यच नाही! काय बोलणार, कप्पाळ!


पाश्चात्य जीवन :
इकडे अमेरिकेत जवळपास सर्व जनता दर सहा महिन्याला दंत-सफाई करुन घेते. प्रत्येक दाताचे हिरडीसोबतचे आंतर मोजले जाते. जर हिरडी घट्ट नसेल तर त्यावर उपाययोजना केली जाते. आणि जर एखाद्यच्या हिरड्यातून रक्त येत असेल वा त्यात किटाणू मर्यादेपेक्षा जास्त असतील तर त्याची हिरड्यांच्या शल्यचिकित्सकाकडून सखोल सफाई केली जाते (मला वाटते ०.००१ मिमि पर्यंत). येथे डेंटिस्ट विद्युत घारणी असलेला ब्रशच सर्वांना वापरायला सांगतात. तसेच ब्रश सकाळ संध्याकाळ करायला सांगतात. त्याच बरोबर ब्रशने दातांच्या सांधींमधून तसेच खोल हिरड्यांमधून अन्नकण निघत नसल्याने फ्लॉस वापरणे अनिवार्य असल्याचे सांगतात. भारतात फ्लॉस काय भानगड असते ते कित्येक औषध विक्रेत्यांना सुद्धा माहित नसते. मग प्रश्न पडतो की आपण पाश्चात्यांप्रमाणे ब्रश वापरण्याचे सुद्धा अंधानुकरणच करत नाही का?

दंत शस्त्रक्रिये विषयी :
भारतात सर्वसाधारणपणे रुट कॅनाल केलेल्या दाताच्या मुळाला काही वर्षात पुन्हा किटाणू संसर्ग होतो व बहुतेक वेळेला तो दात गमावण्याची पाळी आपल्यावर येते. त्याचे कारण समजावून घेताना असे लक्षात आले की अद्ययावत यंत्रसामग्रीच्या अभवाने भारतातल्या बहुसंख्य रुट कॅनाल शस्त्रक्रियेत दात साफ करताना त्याच्या मुळाशी जाणे शक्य होत नाही. तो भाग खूपच चिंचोळा असतो व तेथे खूप कमी किटाणू मावू शकतात. ते किटाणू त्रास देण्याच्या संख्ये येवढे वाढेपर्यंत अनेक वर्षे गेलेले असतात. पण या दीर्घ काळा नंतर आपल्यावर दात गमावण्याची वेळ आलेली असते.
हीच बाब दताला टोपी (कॅप) बसवताना वा पूल (ब्रीज) बसवताना सुद्धा प्रकर्षाने जाणवते. आमच्या सौ.च्या दातांवर भारतात बसवलेल्या चार टोप्या व एक पूल दोन-तीन वर्षात उध्वस्त झाले. कारणे काय तर पुन्हा अद्ययावत यंत्रसामग्री व योग्य धातूमिश्रण यांचा अभाव. त्यामुळे बसवलेल्या टोप्यांची कडा दताच्या आवरणाशी एकजीव होऊन न बसल्याने वा जेथे तो धातू संपून दाताचा पृष्ठभाग सुरु होतो तेथे खाच निर्माण होते. हीच खाच किटाणूंचे घर बनते व कालांतराने टोपी वा पूल उध्वस्त होतो.

यावर जाणकार अधिक व शास्त्रीय दृष्टीकोणातून योग्य माहिती देऊ शकतील. आम्ही आमच्या अल्प बुद्धिला जेवढे समजले तेवढे लिहिले. पण एक मात्र खरे की जर आमच्या पुरते बोलायचे तर ग्रामीण जीवना नंतर गमावलेले दंत आरोग्य पुन्हा मिळवले आहे म्हणून आम्ही आनंदी आहोत.

----
या लेखावर येथे चर्चा चालू आहे.

Wednesday, January 2, 2008

घसरगुंडीची शाळा - २

पहिल्या दिवशीचा अनुभव पाठीशी घेऊन आम्ही दुसर्‍या दिवशी स्कीच्या टेकट्यांकडे निघालो. आमचे कालचे साथिदार आज गायब होते. त्यांना केवळ अनुभव म्हणून एकदा स्कीईंग करुन बघायचे होते ते त्यांनी साध्य केले होते. शिवाय आज त्यांची येण्याची स्थिती सुद्धा नव्हती. कोणाचा गुडघा, कोणाचा खांदा तर कोणाची पाठ दुखत होती. माझेही अंग जरा जड वाटत होते पण दुखापत नसल्याने तसेच उत्साह फुरफुरत असल्याने आम्ही निघालो.

पहिल्या दिवशी थंडी कमी असल्याने (४ ते ७ डि.से.) कान टोपीची वगैरे गरज भासली नव्हती. आज मात्र थंडी चांगलीच असल्याने कानाला हुड लावावे लागत होते. आम्ही अस्त्र-शस्त्रे लेऊन सज्ज झालो. स्कीईंग साठी तीन आवश्यक तर चार-पाच ऐच्छीक साहित्य लागते. आवश्यक सामान या प्रमाणे...

बूट: हे बूट स्नो-बूट प्रमाणेच नडगी बरोबर उंचीचे असातात. त्यात पायाच्या पंजाला तसेच पिंडरी-नडगीला पक्के करण्यासाठी यंत्रना असते. ही यंत्रना दोन-तीन वेगवेगळ्या प्रकारची असते. आम्ही हे असे बूट वापरत आहोत.



स्कीज (घसर पट्टी) : स्कीज तुमच्या बुटाच्या मापाच्या असाव्या लागतात. त्यांतली बुटाला आवळणारी पकड लांबीला थोडीशी कमी-जास्त करता येते. बुटांना स्कीमध्ये आडकवण्यासाठी त्यात बुटासह असलेला पाय घालून दाब द्यावा लागतो. तर बूट बाहेर काढण्यासाठी त्याला एक कळ असते. ही कळ हाताने तसेच पोलने दाबायची असते. अवजड बुटांमुळे बरेच वेळा स्की पर्यंत हात पोहचत नाहीत म्हणून पोलचाच उपयोग करावा लागतो.



पोल (छड्या) - स्कीईंग करताना बहुतेक खेळाडू दोन्ही हातात पोल पकडतात. पोल पकडताना त्याचा पट्टा हातच्या नाडीला समांतर घेऊन मुठीत आला पाहीजे व त्याला पोल सोबतच पकडले पाहिजे. अन्यथा आंगठा दुखावला जाण्याची शक्यता असते.



याशिवाय शिरस्त्रान, गॉगल्स, सुद्धा खेळाडुंनी बाळगायला हव्यात याची प्रचिती आम्हाला दुसर्‍या दिवशी आली.

सुरुवातीला वार्म अप म्हणून मी कालच्याच प्रकारे दोरीला पकडून छोट्या टेकडीवरुन एकदा घसरगुंडी केली. काल आम्हाला शिकवायला असणारे दोन्ही प्रशिक्षक आज दिसत नव्हते. आजही आमच्याकडे शिकाऊ तिकीट असल्याने आम्ही आमच्या शंका तिथे उपस्थित असणार्‍या प्रशिक्षकांना विचारू शकत होतो. पण तशी गरज वाटली नाही. आजचे ध्येय म्हणजे गती न वाढवता अगोदर वळायला शिकणे, त्यानंतर थोडी गती वाढवने जेणे करून एक दोन दिवसानंतर प्राथमिक गटातून वरच्या गटात (मॉडरेट लेवल) जाता येईल.

आणि आम्ही थोड्या मोठ्या टेकडीवर निघालो. वर जाताना कोणत्या मार्गाने यायचे याची आखणी करत होतो. काल त्या छोट्या टेकडीवर आमच्या अशा आखण्यांची वाट लावायला अम्हाला मार्गात हाटकून कोणीतरी धडकत असे (म्हणजे ते समोर आल्यावर आम्हाला वळता न आल्याने आम्ही त्यांना धडकत असू). त्यावर उपाय म्हणून अगदी उतारावर सुद्धा गती पूर्ण थांबवता येण्याची कला आम्ही आज आवगत केली होती (हे आज पर्यंत आमच्या कोणाही मित्राला न जमलेले कसब आल्याने विश्वास वाढला होता).



दोरावरुन वरती जाताना पायात किती जास्त ओझे आहे हे जाणवत होते. नेहमी ओझ्याखाली दबलेल्या पायांना हे बुटाचे-पट्ट्यांचे ओझे ताणून लोंबकळत होते. त्याच बरोबर खाली घरगुंडी करत असणार्‍यांकडून बरेच शिकायलाही मिळत होते. नेमके काय केल्याने हमखास पडणार व काय केल्याने नाही याचे आकलन करता करता आम्ही टेकडीवर पोचलो सुद्धा. आरे बापरे! आता या पाळण्यातून खाली उतरताना सावरायचे कसे? आठवले, पिझ्झा! पिझ्झा (उलटे इंग्रजी अक्षर व्ही) केल्याने गती कमी होते. पण तो पर्यंत मागच्या पाळण्यातले लोक पाठीवर येऊन आदळले तर? ठरले, छोटा पिझ्झा!

जमले रे बॉ! चला पहिली पायरी तर झाली. पण हे काय, सगळी टेकडी बंद! मला जाता येण्यायेवढा मार्गच शिल्लक राहिला नव्हता. सगळीकडे पडलेले लोक. एव्हाना आमच्या स्कीने गती पकडलेली. पायांनो वळा, वाळा... राम, राम, राम... आठवले "डावीकाडे वळायला उजव्या पायवर भर द्या अन उजवी कडे वळायला डाव्या पायावर" आमच्या प्रशिक्षकाचे हे वाक्य काय ऐनवेळी आठवले हो!

आणि चक्क पहिल्याच चकरीत मी टेकडीच्या पायथ्यापाशी. चला, सौंच्या हजेरीत पडापडी नाही झाली. त्यातही जर एखादी बाई येऊन आदळली असती तर उद्यापासून स्कीइंग बंद होण्याचा धोका होता... टळला एकदाचा!

दुसर्‍या फेरीत पाळण्यामध्ये एक मित्र झाला. त्याचे नाव ल्यूक, वय केवळ चार वर्ष पण मोठ्यांना लाजवेल अशी त्याची गती, वळणावरचे नियंत्रन. त्या पोराने मला एक ध्येय दिलं. मी शक्य तितक्या लवकर माझ्या मुलीला स्कीईंग शिकवायला आणणार! पण "कोणाला पोहायला शिकवायचं तर दुसर्‍याचा जीव वाचवता येईल येवढं चांगलं पोहता आलं पाहिजे" हा नियम ईथे सुद्धा वापरायचा होता. आता स्वतःची साधन सामग्री विकत घ्यायचीच!

बघता बघता चार तास कसे गेले कळलेच नाही. प्रत्येक चकरी सोबत गतीवरचं तसच वळनांवरचं नियंत्रण जास्त चांगलं जमत होतं. आता त्या मोठ्या टेकड्या/डोंगर खुणावत होते. तितक्यात मस्त हिमवर्षाव सुरु झाला. पाळण्यातून समोर दिसणारे डोंगर, खाली पांढर्‍या शुभ्र बर्फाचे गालीचे अन त्यात हे अलगद झोकावत-झोकावत खाली येणारे हे कापसा सारखे बर्फाचे पुंजके... किती विहंगम दृष्य ते! पण हे काय, घरगुंडी सुरु झाल्यावर गती घेऊन खेळताना ते सुंदर बर्फाचे इवले-इवले दिसणारे पुंजके सुयांप्रमाने डोळ्यात घुसत होते. उद्याला गॉगल पाहिजे हे खरं पण बंद डोळ्याने खालपर्यंत पोचायला तर हवं!

----
या लेखावर येथे चर्चा चालू आहे.