या विषयावर येथे चर्चा सुरु आहेमागच्या आठवड्यात आमच्या पुतणीला (वर्ग सहावी) राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कांस्यपदक मिळाले. या स्पर्धेत तिला व आमच्या बंधुंना (जे तिच्या सोबत अंतिम फेर्यांसाठी दिल्लीला स्पर्धेसाठी गेले होते) आलेले अनुभव ऐकून व्यथित होऊन आम्ही चाटच पडलो. कारण राष्ट्रीय स्पर्धा म्हटल्यावर चुरशीने होणार्या स्पर्धा तसेच स्पर्धकांव्यतिरिक्त आयोजक, पालक, स्नेही यांचा स्पर्धेतील उत्साह, उक्तंठा याची अपेक्षा होती. पण जे ऐकले ते असे...
१. महाराष्ट्रातून शालेय गटात केवळ एका मुलीसोबत तिचे पालक स्पर्धेला आले होते (अर्थात आमचे बंधु). बाकी मुलींच्या पालकांना एकतर या स्पर्धांचे महत्व नव्हते वा असूनही त्यांच्या अर्थिक परिस्थितीमुळे ते येऊ शकले नव्हते.
२. जवळपास सर्वच सहभागी मुली मध्यम वा गरीब घरातल्या होत्या. ... कदाचित सर्व श्रीमंत घरातील मुलींना डॉक्टर-इंजिनिअर बनायचे असेल??
३. बर्याच फेर्या खेळाडू अनुपस्थित राहिल्याने उपस्थित खेळाडूंना विजेते घोषित करून आटोपण्यात आल्या. एका सूवर्णपदक विजेत्या मुलीला शेवटच्या चार फेर्या खेळव्याच लागल्या नाहीत... तिच्या गटात स्पर्धकच नव्हते!
४. बहुतांश विजेत्या मुली "चला शासनाची नोकरी पक्की" या विचारानेच सुखावल्या होत्या.
आमच्या पुतणीला गेल्या वर्षी सुद्धा बर्याच स्पर्धांमध्ये हा अनुभव आला होता. कब्बडी, कुस्ती, लांब उडी, उंच उडी, मल्लखांब, दोर्यांवरच्या कसरती अशा अनेक खेळात जिल्हा पातळीवर एकदोन स्पर्ध येतात व विजयी होतात असे विदारक चित्र महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर पहायला मिळते.
काय चालले आहे हे? अशा पद्दतीने निवडल्या गेलेल्या खेळाडूंकडून आपण ऑलम्पिकमध्ये पदक आणण्याची आशा कशी करणार? आपण एक सुजान नागरीक म्हणून आपल्या आजूबाजूच्या मुलींना खेळांमध्ये या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी काय करु शकतो? खेळाने मुलांचा सर्वांगिण विकास होतो व अभ्यासाठी आवश्यक असणारे मनोबल, शारिरिक क्षमता निर्माण होते हे आपण पालकांना कसे पटवून देऊ शकतो?
मला वाटते मुलांच्या स्पर्धांमध्ये सुद्धा कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र असावे. मुलांमध्ये खेळाची आवड असणार्या व पालकांचा पाठिंबा असणार्यांचा कल सुद्धा जास्त करून क्रिकेट वा टेनिस, फुटबॉल अशा आजकाल पैसा/प्रसिद्धि देणार्या खेळांकडे असतो.
शासन दरबारी तर सगळा आनंदी आनंदच आहे. ऑलम्पिक समितीकडून कसलीही मदत न झालेल्या सूवर्णबिंद्राने स्वकष्टाने/स्वखर्चाने यशशिखर गाठले आणी आपल्या पुण्यात "भव्य" सत्कार झाला तो कलमाडींचा! का, तर कमिटीचे अध्यक्ष म्हणून!! यश मिळवलेल्या त्रिमुर्तींनी दोन्-तीन आठवडे प्रसारमाध्यमे गाजवली. त्यांच्यावर बक्षिसांची खैरात पण झाली. पण केवळ एक्-दोन महिन्यात आपली ही प्रसार माध्यमे, समाज व सरकार हे कदाचित या त्रिमुर्तींना विसरूनही गेले. येत्या काही वर्षात व पुढील पिढीत असे शेकडो अभिनव कसे तयार होतील याच्यावर कोणी काही केल्याचे ऐकीवात नाही. तेव्हा अशा या नाकर्त्या शासनाकडून काही अपेक्षा न ठेवलेल्याच बर्या.
पण मग खेळातला हा मुलींचाच नव्हे तर मुलांचा तसेच आपल्या देशाचा अनुशेष कसा भरून काढता येईल??