Wednesday, August 19, 2009

एक पुलकित अनुभव

हाल ही में ह्यूस्टन में HSS की महिला कार्यकर्तांओ ने एक "केवल महिला ओवर-नाईट कॅम्प" का आयोजन किया था. कभी बेटी, कभी पत्नी तो कभी माता का दायित्व निभाने वाली स्त्री एक दिन भी आपने आपको नही दे पाती है. अगर परिवारिक कॅम्प को जाओ तो बच्चे उनके गुटों में और पुरुष उनके दोस्तों में दंग रहते हैं और महिलाये उनकी सेवा में. इसलिये इस कॅम्प में आनेवाली महिलाओंने अपने-अपने बच्चों को पती के साथ घर छोड के आना था. इस नियम के कारण जहा सौ दो सौ की अपेक्षा थी वहां दस-बारा महिलाओं का ही रिजर्वेशन हुआ. ये देखके मैने सोचा चलो देखते है अपने जान-पहेचान मे से कोई जाते है क्या? सो, न्योते देना शुरु किया. उसमें मैने एक ऐसे भगिनी को उस कॅम्प को जाने का सुझाव दिया था की जिनके परिवार में संघ के बारे में शायद कुछ अच्छा मत नही है. लेकिन वे तो जाने को तैयार भी हो गयी! हमने सोचा जो होगा देखा जायेगा.

कॅम्प हुआ और उसके दो दिन बाद मैने उनको फोन घुमाया. (दरअसल मुझे एक interview को जाना था और काफी समय था).

हाल हवाल पुछने के बाद मैने धिरे से पुछा, "तो बहेनाजी, आपका कॅम्प कैसा रहा?"
इस प्रश्न के बाद मैने मन ऐसा बनाया था की शायद सुनने को मिले, "भैय्या, पहली बार आपका सुनके कही गयी और विक-यन्ड बरबाद कर दिया. पर समझो यही आखरी बार भी था"...

लेकिन सुनने को क्या मिला पता है?

"अर्रे भैय्याSSS, बस पुछो मत, इतना मस्त रहा की मैने मालव को भी दो दिन फोन नही किया!", उनका यह जवाब सुनके अपने छोटे से दिमाग को कुछ समझा नही.
"अरे यार, मैने आपको वहा भेजके कुछ गलती तो नही ना की? गुरुजी से मार खानी पडेगी अब तो... वहा पर फोन का भी सिग्नल नही था क्या?", मेरे इस प्रश्न के बाद जो सुनने को मिला उन शब्दों में इतनी उर्जा थी की उसे भर कर हवाई जहाजों में भरते तो इयर-इंडिया को कभी इंधन के खरिदारी कि कभी जरुरत नही पडती...

ये रही उस संवाद में से कुछ पंक्तिया...

"भैया क्या बताऊ मैं आपको. इस संडे मेरे जिंदगी की सबसे मस्त सुबह हुई. वैसे जल्दी उठना तो मुझे कभी भी अच्छा नही लगता. लेकिन इस सुबह को बिल्कुल भी ऐसा नही लगा की जल्दी उठे हैं... और बताऊं, फ्रेश होने के लिये चाय की जरुरत जिंदगी में शायद पहली बार महसूस नही हुयी. सबेरे से ही माहौल ऐसा बना था की एकदम मस्ती कर रहें थे हम लोग... सारी दुनिया को भूलके!
कल तक एक दूसरे से अंजान आज हम एक दूसरे के साथ ऐसे घुल मिल गये थे जैसे बचपन की सहेलिया. कोई बीस साल की तो कोई साठ, लेकीन सब बच्चिया बन खेल रही थी, गा रही थी, झूम रही थी, योगा सीख रही थी, अनेकानेक विषयों पर बाते कर रही थी. और जो चर्चायें हुई, वो भी कितनी गहरी और दिल को छूने लाली थी की पूछो मत! कोई डॉक्टर साहेबा आयी थी. उनका सेशन तो इतना बेहतरीन था की क्या बताऊं. कितनी भी डिप्रेशन वाली महिला वहा रहती तो उसका डिप्रेशन इस तरह निकल जाता की जिंदगी भर वह खुश रहेना सीख जाती. सही में, वहा पर इतनी अच्छी-अच्छी बाते सुनने को और सिखने कि मिली की ऐसा लग रहा है की हमेशा खुश रहेने का कोई टॉनिक मिल गया हो... जब हम कॅम्प खतम कर निकल रहे थे तो ऐसा लग रहा था की मैके से बिदायीयां हो रही है.
भैय्या, I am very thankful to you की आपने मुझे वहा जाने का सुझाव दिया."

कितनी ही देर ये बाते मैं सुना जा रहा था.

और देखते देखते अल्बनी आ गया. मैं सोच रहा था, "What can be a better booster than this talk before you appear for an interview in this drowsy market?"

और हा, अब मुझे ये बाते सुनके जो स्फूर्ती मिली थी उसके बाद कौन माई का लाल मेरा चयन किये बगैर मुझे interview से निकालने वाला था भला??

----------

Thanks to Monicaji... here is English translation of the above article....
----------

Recently mahila karyakartaas (women volunteers) of HSS Houston organized a "Women Only Overnight Camp". In fulfilling the responsibilities of being a daughter, a wife and a mother, a female is unable to take even a day out for herself. When family camps are organized then the children form their own groups and men have fun in theirs and women are found spending all their time in serving them. So in this camp, the participating ladies had to leave their kids home with their husbands. May be because of this rule, instead of the expected 100-200 participants we got only 10-12 reservations. Looking at this I thought

let me see if any of my acquaintances would go. So I started inviting them. Out of the invitees one was a lady in whose family perhaps there's not a very

good opinion of Sangh. And she agreed to go! I thought all right let's see what happens.

Then I called her two days after the camp (actually I had to go for an interview and I had some time before that).

After exchanging pleasantries I asked her "So behenji (sister) how did you find the camp?"

After asking this question I had prepared myself to perhaps hear something on the lines of 'Bhaiya, for the first time I took your suggestion and went somewhere and my whole weekend was spoiled. But consider this the last time...'

But do you know what I got to hear?

"Ohhhhh Bhiayaaa, just don't ask, it was so great that I didn't even call Malav (her husband) for two days!!"

This answer of hers I could not comprehend in my little brain.

"Oh dear! I hope I did not make a mistake in asking you to go there. Now I'll have to take a beating from guruji... did you not even have a phone signal there?"

The answer that I got to this question of mine was so full of energy that had it been filled in airplanes then Air India would never had to buy fuel again...!


Here are some lines from that dialogue.....


"Bhaiyya what can I tell you. This Sunday was the best morning of my life. Though I have never liked getting up early in the morning, but this morning it did not at all feel as if we have gotten up early... and perhaps this was the first time in my life that I did not feel the need for tea to refresh myself.

From the morning itself the ambience was such that we were all having fun, playing, doing yoga, kidding around... forgetting the whole world!

All of us, strangers to each other till yesterday, got along so well as if we were childhood friends. Someone 20 yrs old and another 60 but we were all playing like kids, singing, swinging, learning yoga, talking about various subjects. And ah the discussions... they were so deep and they really touched the heart. There was a lady doctor's session which was par excellence, had a woman with deep depression been there then this session would have got her out of it and taught her to be happy lifelong. Really, we heard and learnt such good stuff there that it feels like I have received a tonic to always be happy... when we were finishing the camp and leaving it felt very sad like when we leave our maternal home after getting married.

Bhaiya, I am very thankful to you for suggesting me to go to the camp.

For how long I was listening to these words....

And in these thoughts I reached Albany. I was thinking, "What can be a better booster than this talk before you appear for an interview in this drowsy market?"

And yes, after the boosting energy I had received after listening to these words, who could dare to let me out of the interview without selection?

Thursday, August 6, 2009

एक कर्मयोगी रामदास

बालवयापासून कौटुंबिक जबाबदार्‍या, काबाडकष्ट करून घेतलेले शिक्षण आणि पुढे नोकरी व एकत्रित कुटुंबासाठी वाहून घेतलेले जीवन हा आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबप्रमुखाच्या जीवनाचा लेखाजोखा. यात कितीतरी मूक यातना, क्षणोक्षणी उराशी बाळगलेली परंतू कधीही पूर्ण न झालेली स्वप्ने, समाजाबरोबरच आप्तस्वकियांकडून झालेला मानसिक त्रास असा प्रचंड गाळ साचलेला असतो. या गाळात रुतून धीर खचलेल्या मनाने व क्षीण बनलेल्या शरीराने मग हा मध्यमवर्गी कुटूंब प्रमूख काळाशी तडजोडी करत उत्तर आयुष्याला खंगलेल्या अवस्थेत सामोरा जातो. त्यातही काही शारीरिक व्याधींचा ससेमिरा लागलेला असेल तर विचारायलाच नको. त्यात समाजही टिपण्ण्या टाकायला लागतो... "खूप कष्ट केलेत हो, आता थकलेत ते", "आता काय राहिलय? मुलं-मुली आपापल्या संसारात लागलेत. यांचं काम यांनी केलंय, आता सगळं भगवंताच्या हाती". आणि या अशा तिन्हीसांजेला कोणाला सुद्धा या पिकल्या पाणाच्या मनात राहून गेलेल्या स्वप्नांच्या ठाव-ठिकाणांची कल्पनाही नसते.

मात्र काही अपवाद असतात जे केवळ नातवंडासाठीच नव्हे तर पूर्ण समाजासाठीही आदर्श बनून जातात. थकलेल्या पंखात केवळ गरूडभरारी घेण्याची ताकदच नव्हे तर मनातही उमेद आहे हे ते सिद्ध करून दाखवतात. अशाच एका फिनिक्सला पाहण्याचे भाग्य मला लाभलेय, नव्हे त्यांच्या आशिर्वादाचा हातही माझ्या पाठीवरुन फिरला आहे. अशा या चिरतरुणाबद्दल लिहिणे हा सुद्धा माझे अहोभाग्यच.

दहा-पंधरा वर्षांपासून असंख्य व्याधिंनी त्रस्त असताना अन शरीर घराबाहेर पाऊल टाकायला साथ देत नसताना एखाद्या तरूण संशोधकाला सुद्धा थक्क करायला लावेल असे काही या व्यक्तिने केलय. या ऋषितुल्य व्यक्तिचं नाव उमाकंत रामदासी; आपल्या संस्कृतीनुसार माझ्यासाठी पितृतुल्य, माझे सासरे.

साधारण दहा-बारा वर्षापूर्वी मृत्यूशी झूंज देऊनही हा पठ्ठ्या सहिसलामत बाहेर आला. अजाराने शरीराकडून मुघली कर वसूल केला होता. शरीरात त्राण नसलं तरी मन मात्र अजूनही तरूणच होते. हे तरूण मन समाजासाठी काहीतरी करण्यासाठी जिद्दीने पेटून उठलेले होते. ज्या मातीत धर्म-संस्कृतीच्या रक्षणासाठी रामदास-शिवरायांपासून ते सावरकरांपर्यंत महान विभूती जन्माला आल्या त्या मातीत जन्माला येऊन किड्या-मुंगीसारखे जीवन जगणे या तरूण मनाला मान्य नव्हते. धर्म संस्कृतीसाठी काय करता येईल याच्या शोधात असताना त्यांना एक गोष्ट सापडली. बीड शहराच्या मध्यभागी बिंदूसरेच्या कडेवर एका मोठ्या उकीरड्यात आपल्या संस्कृतीचा एक मोठा वारसा नष्ट होत आहे हे लक्षात आले आणि तन-मन कामाला लागले.

From Misc_Photos


साधारण एक हजार वर्षापूर्वीच्या काही समाध्या, त्यावरील शिलालेख यांचा अभ्यास होऊ लागला. जवळपासच्या शहरातील इतिहासतज्ञ, अभ्यासक, पत्रकार तसेच शहरातील मदत करु शकतील अश्या व्यक्तिंना श्री. उमाकांतराव रामदासींचे फोन यायला लागले. पुरातन पुस्तकांची पाने चाळली जाऊ लागली. बघता बघता एका ऐतिहासिक वारशाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी समाजधुरिणांची एक फौज कामाला लागली.

दाहाव्या व अकराव्या शतकात बीड शहरात एक महान ज्ञानी योगी रहात असत. ते दुसरे तिसरे कोणी नसून संत ज्ञानेश्वरांचे, मुक्ताबाईंचे अजोबा होत. त्यांची समाधी त्या उकीरड्याखाली सापडली. तिचे हे छायाचित्र.

From Misc_Photos


या संशोधनाला पुढे सरकार दरबारी मान्यता मिळाली. या चळवळीतले कार्यकर्ते, नेते व हौशा-नौशांनी मिळून या समाधिस्थळाला शहरातील इतर महान ऐतिहासिक स्थळांच्या पंक्तिमध्ये बसवण्यासाठी कार्यक्रमांची रीघ लावली.

From Misc_Photos


आता तेथे मुक्ताईंची पालखी पण त्यांच्या आजोबांच्या दर्शनासाठी थांबून जाऊ लागली आहे.

From Misc_Photos


आणि हे कार्य सफल झाल्याच्या आनंदात हा फिनिक्स आता नवीन भरारी घेण्याच्या विचारात आहे.
From Misc_Photos


------------------

या लेखावर अधिक प्रतिक्रिया मिसळपाव या संकेतस्थळावर आल्या आहेत. त्या वाचण्यासाठी येथे टिचकी मारा.

Wednesday, July 15, 2009

मनिष कुलकर्णी - २३ एप्रिल १९९९

Today I received an email from Manish which took me back by a decade. Here it is...

परवा नगरला गेलो होतो तेव्हा जुनी डायरी वाचत होतो. एका पानावर थांबलो. त्या पानावरचा मजकूर जसाच्या तसा देतोय. नवीन विरोधीनाम संवत्सराच्या अनंत शुभेच्छा!

"... स्नेहसंमेलनाचे वारे वाहू लागले. महाविद्यालयाची स्मरणिका काढायची असा भास्करने चंग बांधला होता. हो-नाही मनस्थितीत होतो कारण परिषदेचे (अभाविप) 'perspective' काढले तेव्हा खूप त्रास झाला होता. पण भास्करची इच्छा असल्याने मी त्रास घ्यायचे ठरवले. हळूहळू तयारी सुरु झाली. एखाद्या मोठ्या साहित्यिकाची मुलाखत असावी म्हणून आम्ही परिषदेमार्फत दमांशी (द. मा. मिरासदार) संपर्क केला. नशीब चांगले त्यांनी होकार पण दिला. मग काय, आनंदी आनंद गडे. गुढी पाडव्याच्या अदल्या दिवशी बुके सरांच्या कृपेने कॉलेजचे अडीच गांधीजी @ घेऊन आम्ही पुण्याला निघालो.
येताना आधी मौजला आलो. टिपिकल ग्रामिण मराठवाडी गाव. त्या वातावरणाला शोभेल असाच वाडा. अर्थात केन्डे गुरुजींचा वाडा म्हणून प्रसिद्ध. रात्रीचे जेवण छान अंगणात केले. आजी बरोबर मस्त गप्पा मारल्या. त्यांच्या लग्नात आमरसाचा बेत होता अन अंब्याचा रस करायला मोठा हौद तयार केला होता, आणि रस करण्याकरिता काही माणसे त्यात उतरली होती... या कल्पनेने मी तर उडालोच.** रात्री खूप वेळ गप्पा मारुन आम्ही झोपलो. तसे रात्रीच्या गप्पा ह्या मला आणि भास्करला काही नव्या नव्हत्या. 'प्रकाशगड', लक्ष्मी कॉलनी $$ ची गच्ची याची साक्षीदार आहे. अनेक रात्री आम्ही तिथे जागल्या, बहुतेक सर्व विषयांवर चर्चा करताना घालवल्या आहेत. असो.
सकाळी उठून आम्ही 'होल वावर इज आवर' उरकून आलो. येताना लिंबाचा डोहाळा आणला. केन्डे वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे न्हाणीघर... बहुतेक जगातील सर्वांत मोठे बाथरुम हेच असावे. मी आजपर्यंत येवढ्या मोठ्या खोलीवजा बाथरुम मध्ये अंघोळ केली नव्हती. त्यामुळे अंघोळ न ठरता नव वर्षाचे पहिले शाही स्नान ठरले. मस्त आवरून आणि नाष्ता करुन आम्ही विवेकच्या लुनावरुन बीडला गेलो. येताना कनकालेश्वर, खंडेश्वरीच्या दीपमाळा... त्याही उंचीवर गप्पा मारल्या... शेवटी साईट पाहून आम्ही जेवायला घरी आलो. छानपैकी पुरणपोळ्यांचा अस्वाद घेतला. पुरणपोळ्या म्हणजे आमचा वीक-पॉईंट. यथेच्च भोजन करुन झाडाखाली अंगणात वामकुक्षी घेतली. नवहिंदूवर्षाच्या पहिल्या दिवशी मौजला मजा करुन अनंत आठवणी सोबत घेऊन संध्याकाळी आम्ही भास्करच्या आवडत्या गाडीने (ट्रक) नगरला निघालो....."
२३ एप्रिल १९९९

धन्यवाद!
मनिष मधुकरराव कुलकर्णी
---------------------
टीपः
@ (म्हणजे गांधीजींच्या प्रतिमेवाल्या नोटा)
** मनिष, एक सुधारणा... ही घटना त्या आजींच्या लग्नातली नव्हे तर त्यांच्या व्याह्यांच्या म्हणजे माझ्या अजोळच्या आजी अजोबांच्या लग्नातली आहे जी मौजच्या आजींनी सांगितली.
$$ प्रकाशगड म्हणजे अभाविपचे कार्यालय जेथे आम्ही रहायचो व जे श्री प्रकाश पाठक यांच्या कर्यकाळात बांधले गेले... त्याचे नामकरण आम्ही प्रकाशगड केले होते हे त्यांना कळाले असते तर आम्ही कदाचित फटके खाल्ले असते. असो.. प्रकाशभैय्यांची आठवण झाली की आजही भिती वाटायला लागते...

Tuesday, July 14, 2009

My Great Eye Opener!

God doesnt give what we want; He gives what we need!

Just three days back my mother, who brought me to this world, who was my whole world for more than a decade, who did everything to give me best possible education and upbringing, who put hundreds and hundreds of hours telling me stories of great heros, who wanted me to follow their path, was begging me one thing. She wanted to see me at least once a year as I had promised her before leaving for the US. That mother, who never asked me anything, was asking much much less than what she desevred from so called successful son.

And here I was having equations of my career through this bad times. I needed this project where we are working cut throat. I was thinking what would I do if I lose project in such bad times. This is the project I have got by sacrificing so many things. I am working so hard to make it go longer that I am swiching off my cell phone, too. What would happen if I ask for a leave! No no, I couldn't afford the project loss.

And there was He, laughing from the heavens.

Today my superviser called me for a meeting and gave me what I needed, not what I wanted. Among her words were, "dont pull yourself in a dark hole. You are best performer here. But just your timings are wrong. You came in and your project was put in for re-consideration...."

Now I am so greatful to the great Lord! I dont have to beg for leave now to go and meet my parents.

I dont know about other fellows who got the same message with me but I know what I am going to do... Aai, I am coming for you with no burden of joining date!

Monday, January 26, 2009

अमेरिकेत तीन आठवड्यात दहा लाख सूर्य नमस्कार!

अमेरिकेत मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी मर्यंत दहा लाख सूर्यनमस्कार घालण्यत येणार आहेत. न्यूयार्क सारख्या मोठमोठ्या शहरांत तसेच काही राज्यांत या दरम्यान योग-दिन साजरे होत आहेत. निमित्त आहे हिंदू स्वंयसेवक संघा या स्वंयसेवी संस्थेने आयोजित केलेल्या सूर्यनमस्कार यज्ञाचे.

हिंदू संस्कृतीने जगाला दिलेल्या अनेक मौल्यवान योगदानांपैकी एक महत्वाचे म्हणजे योग साधना. निरोगी शरीर व मनासाठी योगाभ्यासाला तोड नाही. अमेरिकेत सुद्धा योग साधनेबद्दल प्रचंड आकर्षण आहे व ते वाढतच आहे. तिथल्या प्रत्येक शहरांत योगा क्लासेसच्या नावावर अनेक संस्था भरभक्कम पैसा लाटत आहेत. हिंदू स्वयंसेवक संघ ही संस्था मात्र योगाचा लोकांना मोफत लाभ व्हावा म्हणून या सूर्यनमस्कार यज्ञाच्या रुपाने या वर्षी सलग तिसर्‍यांदा देशभर योगाचा प्रसार करत आहे. त्यात त्यांनी अमेरिकेतील इतरही अनेक संस्थांना सहभागी करून घेतले आहे. हिंदू जिथे जिथे जतो तिथे तिथे तो आपल्या ज्ञानाचा फायदा स्थानिक लोकांना करुन देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करतो हे त्याचे एक उदाहरणच मानायला हवे.

सूर्यनमस्कारात पायाच्या बोटापासून ते मानेपर्यंत सर्व स्नायूंचा तसेच फुफ्फुसांचा व शरिरातील इतर आंतर्गत अवयवांचा व्यायाम होतो. अशा या योग पद्धतीचे महत्व पटवून देण्यासाठी या संस्थेने त्यांच्या स्वयंसेवकांच्या पुढाकाराने गावोवागी मंच स्थापन केले आहेत. दररोज अगदी दहा मिनिटांत सूर्यनमस्कार कसे करावेत, त्याचे फायदे काय हे समजाऊन देऊन लोकांना प्रव्रूत्त केले जात आहे. या अंतर्गत आयोजित केलेल्या योग मॅरेथॉन, सूर्यनमस्कार मॅरेथॉन यांना सुद्धा प्रत्येक स्तरातून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी मार्गदर्शनपर माहितीपत्रके, व्हिडीओ, यांचीही मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. ही माहिती त्यांच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. प्रत्येक राज्यात गावोगावी लोकांनी वैयक्तिक वा सांघिक पद्धतीने सूर्यनमस्कार घालून त्याची नोंदणी संकेतस्थळावर करायची आहे.

अधिक माहितीसाठी www.hssus.org/sny या संकेतस्थळाला भेट द्या अथवा या sny@hssus.org विरोप (इमेल) पत्यावर संपर्क करा.