Wednesday, December 26, 2007

Azim Premji reservation

I received this content in an email and I do not garuntee if it's true. But I one thing I can tell... It's not just fun but also an eye opener for the politicians

---------------------------------------------

Wipro Chairman Mr. Azim Premji's comment on reservation

I think we should have job reservations in all the fields. I completely support the PM and all the politicians for promoting this.

Let's start the reservation with our cricket team. We should have 10 percent reservation for Muslims. 30 percent for OBC, SC/ST like that.

Cricket rules should be modified accordingly...

The boundary circle should be reduced for an SC/ST player.

The four hit by an OBC player should be considered as a six and a six hit by an OBC player should be counted as 8 runs.

An OBC player scoring 60 runs should be declared as a century.

We should influence ICC and make rules so that the pace bowlers like Shoaib Akhtar should not bowl fast balls to our OBC player.

Bowlers should bowl maximum speed of 80 km/ hour to an OBC player. Any delivery above this speed should be made illegal.

Also we should have reservation in Olympics. In the 100 meters race, an OBC player should be given a gold medal if he runs 80 meters.

There can be reservation in Government jobs also. Let's recruit SC/ST and OBC pilots for aircrafts which are carrying the ministers and politicians (that can really help the country...).

Ensure that only SC/ST and OBC doctors do the operations for the ministers and other politicians. (Another way of saving the country...).

Let's be creative and think of ways and means to guide INDIA forward...

Let's show the world that INDIA is a GREAT country.
Let's be proud of being an INDIAN...
May the good breed of politicians like ARJUN SINGH long live...

Friday, December 21, 2007

राष्ट्रीय सुट्या व हिंदुंचा अनुशेष

भारताची राज्यघटना समान न्यायाच्या तत्वावर अधारलेली आहे असे रोज कुठे ना कुठे वाचायला, ऐकायला मिळत असते. त्याबरोबरच त्याच घटनेच्या आधाराने दररोज कुठे ना कुठे विषमतेने व्यवहार होतात. जात-पात मानू नका असे शाळेत शिकवायचे अन त्याच शाळेतल्या कार्यालयाने संस्कारक्षम कोवळ्या बालकांना त्यांच्या जाती विचारायच्या, जातीची प्रमाणपत्रे मागयाची/द्यायची असला भन्नाट प्रकार चाललेला असतो. जे जात मानत नाहीत त्यांना "अजात" या नव्या जातीखाली टाकण्याचे काम सुद्धा आपल्य घटनेतल्या त्रुटीनेच झाल्याचे सिद्धा झाले आहे. असो.

तर आजचा माझा मुद्दा जरा हटके आहे. मंडल, आरक्षणे वगैरे पेक्षा कदाचित हा मुद्दा कमी महत्वाचा मानला जाऊ शकतो. तो आहे शासनाच्या अधिकृत सुट्यांचा. केंद्र शासनाच्या एका संकेतस्थळावरच्या २००७ च्या सुट्यांचे हे विवरण:

धर्म - सुट्या (दिवस) - लोकसंख्येचे प्रमाण - सुट्यांचे प्रमाण
हिंदू - २ (दसरा, दिवाळी) - ८०.५% - २०% पेक्षा थोडे कमी
मुसलमान - ४ (बकरी ईद, मुहर्रम, पैगंबर जयंती, ईद-उल-फित्र) - १३.५% - ३०%
ख्रिस्ती - १ नाताळ - २.५% - १०% ला थोडे कमी
शिख - १ गुरुनानक जयंती - २% - १०% ला थोडे कमी
जैन - १ महावीर जयंती - ०.५% - १०% ला थोडे कमी
बौद्ध - १ बुद्ध पौर्णिमा - १.५% - १०% ला थोडे कमी
राष्ट्रीय सण - ३ (प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती, स्वातंत्र्य दिन) १००% - २०% पेक्षा थोडे कमी
एकून सुट्या - १३
टीप -
१. संकेतस्थळावर असलेल्या अमेरिकन सुट्यांना विचारात घेतलेले नाही
२. लोकसंख्येचे प्रमाण तसेच सुट्यांचे प्रमाण हे साधारण प्रमाण आहे. तंतोतंत नाही.

एकतर अधिच शासकीय कामे पटापट न झाल्याने जनतेला त्रास होत असतो. अन त्यात अशा अनेक सुट्यांची भर पडल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी सामान्यांची अवस्था होत असते. बहुतांशा धार्मिक सुट्या ह्या जनतेला धार्मिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी असतात. पण बहुंताश सुट्यांना बहुतांश जनता त्या-त्या दिवशीच्या धार्मिक उत्सवात सहभागी नसते. किती लोक नानक जयंती दिवशी गुरुद्वार्‍यात जातात? अन जे त्या दिवशी जातात ते इतर शीख-सणांना सुद्धा जातात. मग एकाच सणाला सुटी का?

जर धार्मिक/उत्सवांना सणांना सुट्या द्यायच्या आहेत तर मग त्या लोकसंख्येच्या आधारावर का नको? लोकशाहीत सगळे काही लोकसंख्येच्या बळावर असते मग सुट्याच का नको? दोन-तीन करोड लोकांच्या समुहासाठी सुटी द्यायची तर मग वर्षात किमान १०० सुट्या आणखी द्याव्या लागतील. आषाढी एकादशीला तीन-चार कोटी लोक धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतात ती सुद्धा त्यात आली. शक्य आहेत का १०० सुट्या? नाही ना. मग आमच्या मागण्या ऐका...

उपाय/मागण्या:
१. राष्ट्रीय सणांव्यतिरिक्त जास्तीत जास्त २-३ सार्वजनिक सुट्या ठेऊन बाकी सगळ्या सुट्या बंद कराव्यात.
२. ज्या २-३ सार्वजनिक सुट्या ठेवल्या जातील त्यात बहुतांश जनता साजरी करते अशाच उत्सव/सणांना सुट्या असाव्यात. असे सण म्हणजे दसरा व दिवाळी.
३. इतर धर्मियांच्या भावनांचा अदर ठेवण्यासाठी आणखी काही उपाय योजना कराव्यात. जसे, दिवाळी दिवशी न्यू यार्क शहरात पार्किंग फुकट होती. वगैरे.

-------

लेख - उपक्रमवर पूर्वप्रकाशित

Wednesday, December 19, 2007

केसाळलेले कुत्रे अन अकलेचे तारे

बरेच ठिकाणी काही catchy वाक्ये ऐकायला मिळतात. विषेशत: पुणेरी पाट्यांमध्ये ही वाक्ये दिलखेचक असतात. आज अचानक आमच्या केसाळलेल्या कुत्र्याकडून आम्हाला काही वाक्ये ऐकायला मिळाली....

जीवनातल्या त्रासाला वैतागलाय? खुश्शाल सासू-सासर्यांना शिव्या घाला, (मनातल्या मनात).

You are in trouble, call 911, not me.

खूप त्रास होतोय. स्वत:चा जीव द्या ना, माझा कशाला घेताय?


केसाळलेल्या काळ्या कुत्र्याबद्दल...
'काजळमाया' ला मिळालेले साहित्य अकादमीचे पारितोषिक, त्या निमित्ताने 'काजळमाया' त्या पारितोषिकाला पात्र आहे की नाही यावरुन निर्माण झालेला वाद, जी. एं. ना झालेला प्रचंड मनस्ताप, स्वाभिमानी जी.ए.कुलकर्णींनी ते पारितोषिक आणि त्याची रक्कम परत करण्याचा निर्णय यावरुन जयवंत दळवींनी जी.एं. नी खिजवणारे एक पत्र लिहिले होते. 'ते' पाच हजार रुपये अद्यापही तुमच्या खात्यात व्याज ओढत पडले आहेत, असे ऐकतो वगैरे. दळवी जी.एं.चे जुने मित्र. पण दळवींचा हा विनोद जी.एं. ना आवडला नाही. त्यांनी दळवीना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, "तुम्ही कधीही आलात तर तुमचे स्वागतच आहे, पण तुमचे ते घाणेरडे काळे केसाळ कुत्रे तुमच्याबरोबर कधीही आणू नका..."

ता.क. - केसाललेल्या काळ्या कुत्र्याचे वरील विधान आम्ही सन्जोप राव यांचे जसेच्या तसे ढापलेले आहे. त्यात आमच्या काळ्या कुत्र्याचा काही वाटा नाही.

शिंचे म्लेंच्छ अरब

सौदी राजाने बलाक्तारीत अबलेला शिक्षा माफ केल्याची बातमी

काय तर म्हणे ती बाहेर असताना तिच्या घरच्या कोणासोबत नव्हती... म्हणून तिच्यावर झालेल्या अत्यंत हीन प्रकारातल्या अन्यायाबद्दल तिलाच दोषी ठरवून तिलाचा जेलमध्ये टाकायचे अन परत वरतून फटकेही मारायचे! वाह रे वा, काय हा धर्म? अशा धर्माच्या नावाखाली मानवतेला ठार करणा-या या नराधमांनाच फोडून काढायला हवे.

राजाने सजा माफ केली म्हणे. पण त्या स्त्रीवर अन्याय झाला व त्या अन्याय करणा-यांनाच शिक्षा झाली पाहिजे असे मात्र हे राजे महाशय म्हणाले नाहीत. थू या असल्या शिंच्या राज्यांवर! यांच्या पेक्षा आमचा राजा कुत्रा जास्त मानसाळलेला आहे. अन हे मात्र मनसाच्या रुपातले कुत्रे...म्लेंच्छ!

Thursday, December 6, 2007

सैन्यातून आलेले नागरिक

आजतगायत मी अशा दोन सहका-यांसोबत काम केले आहे ज्यांना सैन्यात लढाईतला अनुभव आहे. माझा जीईतला अमेरिकन साहेब कोरियन युद्धात लढलेला. त्याने जीवनात बरेच उपद्व्याप केलेले व अजूनही करतच असतो. युद्दावरुन परत येऊन सैन्यदल सोडल्यावर या महाशयाने प्रोग्रामिंगचा अभ्यास केला. त्यात पारंगत झाल्यावर एक पुस्तकही लिहिले. पुढे जीईत आल्यावर संगणक क्षेत्रात काम केले आणि अजून तेथेच आहे. आमच्या चमूतल्या architect ला मुलगा झाला तेव्हा गंमत म्हणून डाटा मोडेलचे प्लॊटरवर प्रिंट काढून बाळाला भेट म्हणून घेऊन गेला. म्हणाला बापाने ज्या चुका केल्यात त्या तू करत जाऊ नको. एरव्ही कामात अगदी prodessional. वैयक्तिक असे एक वाक्य बोलणार नाही. सगळे त्याचा खूप आदर करत. असेच एका रात्री जेवणाला सोबत गेलो होतो तेव्हा मात्र मनातले बरेच काही सांगून गेला. त्याच्या पोराला राष्ट्राभिमान नाही, समाजाची चाड नाही, अशा गोष्टींची सल त्याच्या मनाला होती. एवढ्या मोठ्या पहाडी व्यक्तिमत्वाला सुद्धा आत ओलावा असलेले हृदय आहे हे त्याच्याशी गप्पा मारताना जाणवले.

दुसरा सहकारी बॊब (Robert McLaughlin). वय झाले आहे तरी कामातला उत्साह एखाद्य तरुणाला लाजवेल असा. नकळत मानेला बाक आला आहे तरी चालण्यातला रुबाब मात्र कामय. १९७० ला व्हियतनाम मध्ये संगणक प्रोग्रामर म्हणून होता. गुप्त माहितीची देवाण-घेवाण करणारे संगणक हाताळायचे काम याच्याकडे होते. त्याच्या दोन्ही बाजूला भाल्या मोठ्या बंदुका घेऊन चोवीस तास सैनिकांचा पहारा असे. एकदा चिवट व्हियतनामी लढवैयांनी यांच्यावर हल्ला केला तेव्हा सरळ संरक्षण मत्रालयाचा आदेश आला होता की वेळ पडली तर संगणके फोडून टाका. तो अणुभव सांगताना बॊब हळवा होतो. पण व्हियतनामी जनते बद्दल याला प्रचंड आदर आहे.

या दोन्ही सहका-यांसोबत काम करताना जाणवले की भारतात सैन्यातून आलेले लोक अशा नोक-या करताना मला का कधि दिसले नाही? भारतात तसेही एक-दोन वर्षांसाठी सैन्यात जाणारे तरुण नसतातच. जे जातात ते दहा-पंधरा वर्षे तेथेच राहतात. कारण नोकरी सोडल्यावर पुढे काय असा एक प्रश्न त्यांच्यासमोर असावा.

मला वाटतं सैनिकांना नंतर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायला संधी दिल्या पाहिजेत. त्यांच्या शिस्तबद्ध कामांमुळे इंतर क्षेत्रात त्यांच्या सहका-यांना त्यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही असते. यावर भारत सरकार काही विचार का करत नाही? आपल्याकडे एन.सी.सी. च्या पुढे जाऊन प्रत्येक तरुणाला/तरुणीला एक-दोने वर्षे सैन्याचा अनुभव घेण्याचा पर्याय का नसतो?जर मोठ्या प्रमाणावर तरुण सैन्यातला अनुभव घेऊन मग समाजात परतू लागले तर समाज शिस्तबद्ध व्हायला मदत नाही का होणार? तशी गरज आपल्या समाजाला खूप जास्त आहे असे नाही का वाटत आपल्याला?

Wednesday, December 5, 2007

गावरान (देशी) बाजरी नष्ट झाली

पूर्वप्रसिद्ध: उपक्रम...
http://mr.upakram.org/node/895

बाजरीच्या एका कणसात शेकडो फुले असतात. त्या फुलांवरील परागकण (नाव बरोबर आहे ना?) दुसर्‍या फुलांवर पडले की बाजरीच्या दाण्यांची वाढ सुरु होते. हे परागकणांचे वहन वार्‍याने होत असते. एका शेतातल्या बाजरींचे परागकण दहा-पंधरा किलोमिटरपर्यंत दूर असणार्‍या दुसर्‍या शेतात सहजपणे वापरले जातात. असे घडणे हे नित्याचे आहे. सुगीच्या काळात असे वेगवेगळ्या पिकांवरचे, तणांवरचे करोडो परागकण आपल्या आवती भोवती आपल्या नकळत दरवळत असतात. त्यांच्या या दरवळण्याने वातावरणात एक प्रकारचे चैतन्य, आल्हाददायकता असते. पण या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असताना बाजरीच्या बाबतीत एक फार वाईट घटना घडत गेली आहे. परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापिठात तसेच राजस्थानातल्या कृषी विद्यापीठात यावर संशोधन चालू आहे.

हरितक्रांतीच्या पर्वात उत्पन्न वाढवण्याच्या सपाट्यात शेतकर्‍यांनी संकरीत (हायब्रीड) बियानांचा सर्रास वापर सुरु केला. त्यात पूर्वापार चालत आलेले नैसर्गिक बियाणे वापरणे बंद होऊ लागले. पण या संकरीत बाजरीची चव थोडीशी कडवट असल्याने काही शेतकरी तरीही त्यांच्याजवळचे पारंपारिक बियाणे वापरुन स्वतःला खाण्यापुरती बाजरी पिकवत. आम्ही पण त्यातलेच. संकरीत बियाणांमुळे दहा मनाच्या ऐवजी आमच्या शेतात साठ-सत्तर मन बाजरी व्हायला लागली होती. त्यात इतर नवीन पिके तर वेगळीच. या वाढलेल्या उत्पन्नामुळे आम्ही शेतकरी आनंदी होतो. पण...

गावरान (देशी) बाजरीच्या अरुंद पाट्यालगत दूरदूर पर्यंत संकरीत बाजरीची पिके जोमाणे घेतली जात होती. त्यांच्या परागकणांनी देशी बाजरी संकरीत होत होती. पाहता पाहता देशी बाजरी साधारणतः २००१-२००२ पर्यंत नामषेश झाली होती. :(

काय गमावले:
१. गावरान बाजरीचे तोंडाला पाणि सोडणारे आता ते रुचकर पदार्थ इतिहासात जमा.
२. आयुर्वेदात सांगितलेले बाजरीचे गुणधर्म बदलेले असल्याने आयुर्वेदिक उपचार पद्धतीतून बाजरी बाद होण्याची भिती. बाजरी सोबत या गटात अनेक भाज्या, फळे, कडधान्ये असू शकतात. उदा. केळी पित्तनाशक असते. पण पुण्याच्या एका आयुर्वेदाचार्यांच्या रुग्णांच्या तक्रारीनंतर त्यांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले की खते, किटकणाशके, वगैरे रसायणे वापरल्याने पुण्यात मिळणारी बहुतांश केळी पित्तवर्धक आहे. (त्या आयुर्वेदाचार्यांचे नाव विसरलो.)

शेणाचा वास

खालील उतारा मी उपक्रमवरील या चर्चेत लिहिला होता...

http://mr.upakram.org/node/892

आमच्या बालपणी आम्ही शेणाचा सडा-सारवणासाठी, गोव-यासाठी, खतासाठी, वगैरे सर्रास वापर करीत असू. तेव्हा शेणाबद्दल विषेश अशी घाण वाटायची नाही. आता मात्रा शेणाची दुर्गंधी आल्यासारखी वाटते. शहरात राहून शेणाचा वास घेण्याची सवय मोडल्याने जाणवणारा हा फरक नक्कीच नाही. म्हणून माझ्या बालपणी गुरांच्या शेणाचा येणारा वास आणि आता गुरांच्या शेणाचा येणारा वास याविषयी मी आमच्या गावातल्या गुरांच्या डॊक्टरांशी बोललो. त्यांनी सांगितले की या पंधरा वर्षांत गाजर गवत (कॊंग्रेस गवत) तसेच बेशरम अशा विषारी तणांचा प्रश्न फारच भयानक झाला आहे. गुरे आजकाल सर्रास गाजर गवत खातात. ते विषारी असते. तसेच गुरांना मिळणारा चारा हा सुद्धा खते, किटक नाशके वगैरे सारख्या रसायनाने प्रदुषित झालेल्या शेतांतला असतो. त्यामुळे त्यातही रसायणे असतात. गुरांच्या या सगळ्या बदललेल्या आहारामुळे त्यांच्या पचनसंस्थेवर भयंकर परिणाम होत आहेत. परिणाम म्हणून शेणाचा सुद्धा घाण वास येत आहे. यातही भयंकर बाब म्हणजे छोट्या-मोठ्या शहरात कचर्यावर जगणा-या गुरांच्या शेणाचा मानवाच्या विष्ठेसारखा वास येतो.

आपला,
(गुराखी) भास्कर

Monday, December 3, 2007

सच्चर नामे मच्छर!

सच्चर नावाचा कोणी देशद्रोही मच्छर फुटीरतेची साथ सरवत असतानाच त्याच्या थोबाडीत मारुन त्याला जागे करण्याचा प्रयत्न करणारी काही संकेतस्थळे सापडली....

http://desicritics.org/2006/12/14/022456.php

http://www.slashindia.org/sachhar_committee_report_aploy_to_weaken_india_further


एक तो मंडल आयोग कामी पडला होता की काय म्हणून हा दुसरा एक फोडाफोडीचा प्रकार या "सेक्यूलरवाद्यांनी" शोधून काढला आहे. डोक्याला ताप देणारे हे काही नमुने...
http://www.hindu.com/thehindu/holnus/001200611301510.htm
http://www.altmuslim.com/a/a/a/2424/

टेडी बेअर ते एम एफ हुसेन

आत्ताच ही बातमी वाचली.

मुहम्मदाचे कार्टून काढले की जग पेटते, खेळण्याला मुहम्मदाचे नाव दिले की जेलमध्ये जावे लागते. अशा घटना जगभरात घडत असताना आपल्याकडे मात्र बहुसंख्यांक नागरिकांच्या धार्मिक भावनांना कोणीही अन कसाही नाचवायचा प्रयत्न करतो. संडासात, चपलावर तसेच आंतर्वस्त्रांवर हिंदूंच्या देवदेवतांचे चित्रे काढण्याचा डझनावर घटना घडत असतात. येवढ्यावरच ना थांबता हिंदूंच्या देवदेवतांची नागडी उघडी चित्रे काढणार्‍यांचा सन्मान केला जातो, चित्रपटांतून उघड उघड हिंदूंच्या आबृची लक्तरे वेशीवर टांगली जातात. हिंदूंच्या सहिष्णूतेचा हा गैरफायदा म्हणावा की हिंदूंचा नेभळटपणा?

ही चर्चा उपक्रम वर येथे सुरु केली आहे.

Thursday, November 22, 2007

आंगणातील देवडांगर


बालपणी आईच्या मदतीने लावून वाढवलेल्या झेंडू, सदाफुली, अबोली, मोगरा, शेवंतीच्या फुलांसोबतच वांगी, टोमॆटो यासारख्या मेहनवाल्या भाज्या त्यासोबतच कोहाळा, दुधी भोपळा, दोडका, पारसा दोडका, कारली, देवडांगर, वाल अशा स्वत:च वाढणा-या वेली-भाज्या यांनी आमची परसबाग नटून जायची. त्यात डाळींब, सिताफळ, रामफळ, लिंबोणी, कडूलिंब, सुबाभूळ, उंबर ही झाडे सुद्धा आमच्या विशाल आंगणात दिमाखने डोलत. त्या सगळ्या आठवणींना या चित्राने पुन्हा ताजे केले. हे चित्र आमच्या आंगणात या वर्षी आलेल्या देवडांगराच्या वेलीचे आहे. आता नवीन घर बांघल्यापासून तशी मोठी बाग नाही. पण जमेल तेवढे काम करत माझी आई आम्हा सर्वांच्या आठवणी काढत या बागेत काम करते आहे, पंखात बळ आलेल्या तिच्या लेकरांचं कौतुक करत पण स्वतःच्या एकटेपणाची बोच मनात ठेवत आला दिवस आनंदी करण्याचा प्रयत्न करते आहे असं मला हे डांगर सांगत आहेत.
आमच्या बालपणी हे देवडांगर एका खोलीतली अर्धिअधिक जागा व्यापून टाकत. घरी आलेल्या पाहुण्यांना जाताना आम्ही भाज्या, आणि हे डांगर भेट म्हणून सोबत देत असू. आषाढी कार्तिकी एकादश्या, महाशिवरात्री अशा उपवासांना या देवडांगराच्या फोडी भल्या मोठाल्या फराळतला एक भाग असत. तसेच यांची भाजी सुद्धा मस्त होते. या देवडांगराला चक्की, पांढरा भोपळा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. बोली इंग्रजीत याला "व्हाईट पंपकीन" असे म्हणतात. आमच्या अमेरिकन मित्रांना हा फोटो विलक्षण आवडला कारण त्यांनी आतापर्यंत असा पंपकीन पाहिलेला नाही.
गार पावसातला सुगंध पसरलेला, पहाव तिकडे चोहीकडे पसरलेला हिरवाकंच शालू, सुगीतल्या कामांची शेतक-य़ांची लगबग, त्यातच आनंद द्विगुणीत करुन द्यायला येणारे नागपंचमी, दसरा, दिवाळी यासारखे सण आणि आंगणातल्या बागेत फुललेली आमची बाग. त्या बागेचा अविभाज्य घटक असलेल्या या डांगराने माझ्या आठवणीतला एक कप्पा व्यापून टाकलेला आहे.

Sunday, November 11, 2007

आमची दिवाळी


प्रचंड थंडीतही आम्ही लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची मजा लुटली. ज्या भारतीयांना अमेरिकेत राहून सुद्धा फटाके उडवण्याचे भाग्य मिळते त्या काहीतले आम्ही पण!

पाडव्याचे औक्षण!


आणि मग महाराष्ट्र मंडळाच्या दिवाळी कार्यक्रमात रंगलेली ही संगीत मैफिल. भक्तिगीते, भावगीते ते लावणी असा प्रवास करताना या वाद्यवृंदाने आम्हाला हाडे खिळखिळे होईस्तो नाचवले. आम्ही उत्साही मंडळींनी रंगमंचाच्या बाजूला गणपतीसमोर नाचायला न मिळाल्याची कसर भरून काढली.







Thursday, November 8, 2007

दिवाळीच्या शुभेच्छा!


आपणा सर्वांना आमच्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!


चला बोलू या - भाग २

लेख उपक्रमवर येथे पूर्वप्रसिद्ध...

आयोजकांनी दुसरा मुद्दा उपस्थित केला.
आपली सांस्कृतिक/धार्मिक ओळख आपल्या मुलांनी कशी निर्माण करावी? त्यासाठी आपण मुलांना आपल्या धर्माबद्दल व संस्कृतीबद्दल, केव्हा (कोणत्या वयात), काय व किती सांगावे? मुलांच्या प्रश्नांना (आपण चर्चला का जात नाही?, थ्यांक्सगिविंगला टर्की का करत नाही? वगैरे) उत्तरे कशी द्यावी? मुलांना त्यांच्या मित्रांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायला कसे तयार करावे? अशा घटनांमधून मुलांच्या मनाला कसे जपावे? काय टाळावे व काय टाळायची गरज नाही?

एक तरुण पिता: मला वाटतं धर्म म्हणजे कर्मकांड हे आपण आपल्या मुलांना शिकवायची गरज नाही. त्यांना गरज पडल्यास ते तसे शिकू शकतील. पण त्यांना त्यांच्या जीवनात जेव्हा खूप मोठी अडचण येईल तेव्हा मर्गदर्शनाचा स्त्रोत हा त्यांचे आंतर्मन, त्यांचे जीवनातील अनुभव अन श्रद्धा हेच असते. यातली श्रद्धा फार महत्वाची आहे आणि ती आपल्याला आपल्या धार्मिक संस्कारांतून मिळालेली असते. मग ती श्रद्धा देवावरची असेलच असे नाही. माझं श्रद्धास्थान शिवाजी महाराज आहे. जेव्हा केव्हा मला कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं तेव्हा निर्णय घ्यायला शिवरायांच्या जीवनपटाचा संदर्भ मला उपयोगी पडतो.

तरुण आजीबाई: मला वाटतं धर्म हा तितकासा महत्वाचा भाग नाही. आपण चर्चमध्ये जातो का मंदिरात हा सुद्धा महत्वाचा भाग नाही. (आणि मग त्यांनी त्यांच्या चर्चच्या जाण्यावरचा एक अनुभव सांगितला).

दुसरे तरुण पिता: मला वाटतं आपण चर्चला जाताना जरा जागरुक राहणेक आवश्यक आहे. माझी मुलगी मिशनरी शाळेत जायची. तिच्या शाळेच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आम्ही तिला चर्चमध्ये सुद्धा घेऊन जात असू. तर तितल्या धर्मप्रचारकांना वाटले की आम्ही ख्रिश्चन धर्मच स्विकारायला हवा. ते दर रविवारी आमच्या घरी येऊन आम्हाला धर्मांतराबद्दल बोलत असत. मग आम्हाला एकदा त्यांना कडक भाषेत सांगावे लागले की बाबांनो आम्ही तुमच्या धर्माचा आदर करतो पण आम्हाला आमचा धर्म प्रिय आहे. आम्हाला तुमच्या धर्मात यायची गरज नाही. पण या सगळ्या घडामोडीदरम्यान आमच्या मुलाला धर्माची ओळख झाली.

आयोजक: ही धर्माची ओळख म्हणजे काय? मुलांना आपला धर्म म्हणजे काय हे कसे समजवावे?
एक पालक: धर्माची वेगळी अशी ओळख करुन द्यायची गरज नाही. आपण आपले सण-वार साजरे करावेत. निमित्त साधून मंदिरात जाऊन यावे. तसेच आपल्या आचरणातूनच मुलांना हळू-हळू धर्माबद्दल माहिती करून द्यावी.

आयोजक: पण ही माहिती कधी, कोणत्या वयात द्यावी?
एक पालक: मला वाटते यासाठी वयाची अट नाही. ही एक दैनंदिन जीवनातून शिकन्याची बाब आहे. जसे की मूल खूप लहान असताना त्याला तुम्ही रामकृष्णाच्या गोष्टी सांगू शकता, थोडे मोठे झाल्यावर काही श्लोक शिकवू शकता, तसेच अजून थोडे मोठे झाल्यावर त्याला गंध लावणे, मांसाहार न करने ह्या आपल्या धर्मातल्या गोष्टींची माहिती देऊ शकता.

आयोजक: मांसाहाराचा विषय निघाला आहे. तेव्हा तुम्ही पालक तुमच्या मुलांच्या आहाराबद्दल काय करता किंवा करू इच्छिता?
एक तरूण माता: आम्हाला वाटते आमच्या मुलांने बीफ व पोर्क, विषेशतः बीफ खाऊ नये. पण त्याचे मित्र जर ते सगळे खात असतील त्याला आडवणे आवघड आहे. कारण त्याच्या मित्रांपासून वेगळा पडणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. तर मग आम्ही त्याला म्हटले की तुला खायचे असेल तर खाऊन बघ. पण रेड-मीट आरोग्याला चांगले नसते. तेव्हापासून तो बाहेर असताना स्वतःच रेड-मीट नाही ना हे विचारुन घेऊन मगच खातो.

आणखी एक तरुण पिता: मला वाटतं काही खाल्ल्यामुळे बुडेल इतका आपला धर्म "हलका" नाही. पुर्वी मांस खाल्ले म्हणून आपण आपल्याच लोकांना धर्मबहिष्कृत केले. ते मुसलमान झाले. पुढे ब्रेड पावाच्या तुकड्यांनी आपले बांधव ख्रिस्ती धर्मात गेले. आता तरी आपण हे विचार सोडायला पाहिजेत. बाटतो वगैरे ह्या कल्पना आपण आत्ता नाही सोडल्या तर कधी सोडणार. आपणच सुरुवात करु या त्याची... माझ्या मुलीने कोणताही आहार घेतल्याने तिचा धर्म बुडणार नाही असे मी तिला सांगत असतो.

आणखी एक तरुण पिता: आणि हे करु नका ते करु नका असे सांगितल्याने मुलांना आपल्या धर्माबद्दल नसलेले गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा आपल्या धर्मात चांगल्या गोष्टी करण्यासाठी कसे प्रोत्साहन दिले जाते हे दाखवून दिले पाहिजे. आणि अगोदर चर्चेत म्हटल्याप्रमाणे मुलांना धर्माचा, श्रद्धेचा उपयोग कठीण प्रसंगी मार्ग काढण्यासाठी करता यावा.

आयोजक: (येथे वाढलेल्यांना उद्देशून) तुम्हाला काय वाटते? तुम्हाला धर्माचा/श्रद्धेचा कठीण प्रसंगी फायदा झालाय?
अ.म.त. : मी धर्माचा आदर करतो पण धार्मिक वगैरे नाही. मला अथर्वशिर्ष येते पण जर कधी खरेच कठीण प्रसंग आला तर मी "देवा मला वाचव" असे म्हणत बसणारा नाही. तर त्या वेळी मी सल्ला घेण्यासाठी माझे आई-बाबा अन तुम्ही सगळे जे त्यांच्यामुळे माझ्या जीवनात आलात आणि माझे मित्र बनलात यांच्याशी संपर्क करीन.

अ.म.ती. : हम्म, मी लहानपणापासूनच धार्मिक वगैरे नव्हते. पण माझा भाऊ होता. त्याच्याकडे धर्मावरच्या व्हिडिओ, पुस्तके वगैरे बरेच असत. पण आता मोठा झाल्यावर तो अगदी निधर्मि झालाय. आणि पहायला गेले तर मीच त्याच्या पेक्षा जास्त धार्मिक आहे असे म्हणता येऊ शकेल. पण संकटाच्या वेळी वगैरे मला काही धर्मामुळे फायदा होईल असे वाटत नाही.

आणखी एक तरुण पिता: मला वाटतं आपण धर्माकडुन प्रत्यक्ष फायद्याची अपेक्षा न ठेवता आपल्याजवळ जे जे चांगले आहे ते ते देऊन या समाजाला मदत करावी. जसे की योग, मेडिटेशन, ईतर धर्मांचा आपल्या धर्मात राहून आदर तसेच स्विकार या गोष्टी आपण या समाजाला देऊ शकतो. आणि त्या आवश्यकही आहेत.

आयोजक: बरे आता आपल्या धर्मामुळे या समाजात एकरूप होण्यासाठी आपल्याला काही आडचणी येतात का? त्या कशा सोडवाव्यात?
आणखी एक तरुण माता: आडचणी अशा विषेश वाटत नाहीत. पण मुलांचे प्रश्न मात्र फार खोचक वाटतात. कारण येथे मुले भीड-भाड न ठेवता बोलतात. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांचे समाधान होईल अशा प्रकारे आजच्या काळात लागू होणार्‍या गोष्टींतून धर्म समाऊन द्यावा लागतो. उदाहरणार्थ आपण मंगळसुत्रा, बांगड्या, टिकली का लावतो, आपल्याला येवढे जास्त देव का, वगैरे.

एक शिक्षिका: मला वाटतं आपल्या मुलांना या समाजात एकरूप होऊन वाढता यावे यासाठी आपणही काही गोष्टी पाळायला हव्यात. जसे की मुलांना टिळा/टिकल्या लावून शाळेत पाठवायची गरज नाही. माझ्या वर्गात एक मुलगा भस्माचा टिळा लाऊन यायचा. त्यावरुन त्याला त्याचे मित्र अनेक प्रश्न विचारतच असत, चिडवत असत. अर्थात त्या प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडे नसल्याने व मित्रांच्या चिडवण्याने त्याच्या कोवळ्या मनात धर्माबद्दल गैरसमज तसेच चीड निर्माण झाली नाही तर नवल.

एक माता: आम्ही जसे गणपती, दिवाळी वगैरे आपले सण साजरे करतो तसेच येथील ख्रिसमस, हॅलोवीन सुद्धा साजरे करतो. मी टर्की खात नाही पण मुलांना आणि त्यांच्या बाबांना करुन देते. त्याने मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख राहते तसेच त्यांच्या मित्रांपासून वेगळेपण सुद्धा वाटत नाही.

अशा प्रकारे दोन्ही संस्कृतीचा सूवर्णमध्य साधला जावा असे सर्वच उपस्थितांचे मतैक्य झाले.

आयोजक: बरं कोणाला आपल्या सांस्कृतीक बाबींमुळे जसे की साडी नेसणे, काही अनुभव आले आहेत का?
एक माता: हो, माझ्या मुलाला कदाचित माझ्या साडी नेसून त्याच्या मित्रांसमोर त्याच्यासोबत राहण्या बद्दल नाराजी होती. तसे त्याने बोलून सुद्धा दाखवले. पण मी त्याला म्हटले की माझ्या कपड्यांची बाब ही माझी आहे. कपड्यांनी कधी कोणी लहान-मोठा ठरत नाही. तुला जसे कपडे घालायचेत तसे घाल पण माझ्या कपड्यांची निवड मलाच करु देत. त्यानंतर तो या विषयावर काही बोलला नाही तसेच तो नाराज आहे असे सुद्धा कधी जाणवले नाही.

या भागाचा सारांश काय तर प्रत्येक माता-पिता आपल्या मुलांना आपली संस्कृती जपत इथल्या मुख्य प्रवाहात मिसळता यावे यासाठी धडपडणारे होते. या भागची सांगता आयोजकांतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या प्रतिनिधिने खूप छान केली. मला नक्की शब्द आठवत नाहियेत. त्यांनीच येथे ती प्रतिसादात लिहावी ही त्यांना विनंती.

तळटीप: तरुण पिता/पिता याचा येथे "ज्यांची मुले अजून लहान (बालवयातील आहेत)" असा अर्थ अभिप्रेत आहे. तसाच तरुण आजी-आजोबांचा सुद्धा.

Monday, November 5, 2007

चला बोलू या - भाग १

आज येथे, महाराष्ट्रापासून दहा हजार मैलांवर, अनेक मराठी लोकांना आपापल्या जीवनात कुठे ना कुठे, कधी ना कधी तरी उपयोगात पडेल असा एक अगळा वेगळा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र फाउंडेशन व कनेटिकट महाराष्ट्र मंडळाने "चला बोलू या" नावाच्या एका चर्चा सत्रासाठी येथील सर्व मराठी कुटुंबांच्या जीवनाशी निगडीत विषय निवडला होता, "अमेरिकेतील मराठी म्हणून आपले विचार, अनुभव व आपल्या समोरील प्रश्न".
या चर्चा सत्रात तीन मराठी पिढ्यांचे प्रतिनिधी होते. या तीन पिढ्यात होते आपली मुले येथे अमेरिकेत लहानाची मोठी करणारे अनुभवी पालक, ज्यांची मुले आजून लहान आहेत असे नवीन पालक व तिसरे आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे असे मराठी तरूण/तरुणी जे या पश्चात्य संस्कृतीत वाढले आहेत. यांत अनेक क्षेत्रातले दिग्गज जसे डॉक्टर, सामाज सेवक, शिक्षक, उद्योजक, मानसोपचार तज्ञ, आदिंचा सुद्धा समावेष होता. त्यांनी परदेशस्थ मराठी समाजा समोरील विविध समस्यांवर चर्चा केली तसेच या चर्चेच्या माध्यमातून मौलिक माहितीची देवाण-घेवाण पण केली. कार्यक्रमाच्या सुव्यवस्थित संचलनाने त्याला सर्व उपस्थितांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला व तो अफलातून यशस्वी झाला हे सांगणे नको.
या चर्चा सत्रात चर्चिले गेलेले काही मुद्दे सहसा मराठी वा भारतीय कुटुंबात चर्चिले जात नाहीत ज्यामुळे काही घटनांना कसे सामोरे जावे याची आपाली तयारीच असत नाही. चला तर बघू या काय झाले या कार्यक्रमात.
कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच सर्वांत मूळ प्रश्नाने करण्यात आली.या देशात आपल्या मुलांना मराठी येणे कितपत महत्वाचे आहे? या प्रश्नावर आलेली प्रातिनिधीक मते...
एक अजोबा: येत्या दोन-तीन दशकात मराठीचा वापर खुद्द महाराष्ट्रातच कमी होणार आहे. तर येथे मुलांवर "मराठी बोल, मराठी बोल" अशी बळजबरी का बरे करावी? मला वाटते मराठीचा अट्टाहास आपण सोडला पाहिजे. कारण ती या मुलांची ज्ञान-भाषा नाही, ती यांना वाचता येण्याची शक्यता कमीच आहे ज्यामुळे त्यांना तिची गोडी लागणार नाही आणि गोडी लागली नाही तर ते ती पुढच्या पिढीला कशी देणार? मग जर मराठी आपल्या पुढच्या दोन पिढ्या सुद्धा जगणार नाही, तर मग या मुलांचे "टॉर्चर" का?
दुसरे अजोबा: मी माझ्या नातीला कधीच मराठी बोल म्हणत नाही. ती जी इंग्रजी बोलते तिचे उच्चार भारतातल्या इंग्रजीपेक्षा वेगळे असतात. मग मी तिला ते हळू-हळू मला समजेल असे बोलायला लावतो. त्यांनतर तेच मराठीतून तिला सांगतो. तिला ते उच्चारायला अवडते अन आमचा संवाद मराठी मध्ये सुरु होतो. "टॉर्चर"चा प्रश्नच नाही.
अमेरिकन मराठी तरूण (अ.म.त.): (त्याला "टॉर्चर" बद्दल विचारले गेले तेव्हा) हो, होते "टॉर्चर". पण शाळेत जाणे, अभ्यास करणे, चांगल्या सवयी लावणे, हे सुद्धा "टॉर्चर"च आहे. ते चालते तर मग मराठी बोलण्यालाच का सोडायचे? शाळेत गेल्याचा, अभ्यास केल्याचा व आई वडिलांनी चांगल्या सवयी लावल्याचा फायदा होतो तसाच मराठी येत असल्याचा अभिमान पण वाटतो. आपल्या ईतर मित्रांजवळ नसलेली एक खूबी आपल्यात आहे हे पाहून आनंद वाटतो.
अमेरिकन मराठी तरूणी (अ.म.ती.)ची आई: मुलांना मराठी शिकवण्यासाठी "टॉर्चर"च करायची गरज नाही. काही छोट्या-छोट्या घटनांमधून त्यांच्यात ती शिकवण्याची भावना जागृत केली तर ते आपोआपच शिकतात. माझ्या मुलांना दुकानात मला कोणाबद्दल काही सांगायचे झाल्यास त्या व्यक्तिसमोरच मराठीतून सांगता आल्याने फार गंमत वाटायची (एक गंमतीशीर उदाहरण सांगितले).यावर आणखी एका पालकाने त्यांच्या मुलाचा अनुभव सांगितला. सार्वजनीक ठिकाणी आई-बाबा रागाऊ लागले तर ते इतरांना समजून आपली वेशीवर टांगली जाऊ नये म्हणून हा म्हणायचा, "आई/बाबा, मराठीत, मराठीत".
पण या छोट्या-छोट्या घटनांमधून त्यांची नाळ मराठीसोबत बांधून ठेवण्यात हे पालक यशस्वी झाले. त्यानंतर काहींनी आपल्या मुलांमध्ये मराठी येते हा एक "कॉन्फिडन्स" वाढवण्याचा भाग कसा असू शकतो ते सांगितले. काहींना आपल्या भावना पोचवण्यासाठी आपली मायबोलीच उपयुक्त असल्याचे वाटते तर काहींना भाषा ही त्यात महत्वाची वाटत नाही.
त्यानंतर ऐरणीवर आलेला दुसरा प्रश्न...आपण या समाजाच्या मुख्य प्रवाहात का व कसे सामिल व्हायला हवे? उदाहरणार्थ आपल्या अन्नाच्या सवयींमुळे मुलांना येथे काही सामाजिक त्रास होतात का? आपण या सवयी बदलायला हव्यात का? कशामुळे व कशाप्रकारे?या मुद्याच्या चर्चेला सुरुवात झाली मुलांच्या डब्यांमुळे निर्माण होणार्‍या समस्यांपासून. आपल्या मुलांना भाजी-पोळी/भात वा आणखी काही भारतीय जेवण दिले तर ही मुले त्यांच्या शाळेत जेवताना वेगळे पडतात. आपल्या अन्नाचा सुगंध बाकीच्यांसाठी उग्र असतो त्यामुळे ते आपल्या मुलांना वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात करतात, कधि-कधि नावे पण ठेवतात, चिडवतात. मग आपली मुले डब्यात मराठी/भारतीय जेवण नको म्हणतात. तसेच त्यांच्या मनात आपल्या अन्नाबद्दल, सवयींबद्दल व एकूनच संस्कृतीबद्दल न्यूनगंड निर्माण व्हायला मदत होऊ शकते. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलाला त्यांच्या शाळेत जास्तच वेगळे वाटणार नाही असे जेवण द्यावे, जसे की गुंडाळलेली पोळी-भाजी, चमच्याने खाता येणारे व सुगंध न पसरवणारे पदार्थ, वगैरे. पण यावरच न थांबता अधून मधून आपल्या सणांचे/उत्सवांचे निमित्त साधून अमेरिकन मुलांना जमेल असे पदार्थ (शंकरपाळे, साधी चकली, चुरमुर्‍याचा दाणे नसलेला चिवडा (जेणेकरुन कोणा अलर्जीवाल्याला त्रास होणार नाही), वगैरे) घेऊन शाळेत जावे. त्यांना आपल्या पदार्थांची माहिती करून द्यावा व त्यातून ते आपल्या मुलांस नावे ठेवणार नाहीत असा "ऍक्सेप्टन्स" मिळवावा. अशा प्रयोगशील पालकांनी या गोष्टींचा त्यांच्या मुलांना झालेला फायदा, त्यातून त्यांचा उंचावलेला "कॉन्फिडन्स" यांची काही उदाहरणे सांगितली. त्यातील एक म्हणजे आपल्या एका मराठी मुलाच्या मित्रांना शंकरपाळे एवढे आवडले की तो त्याच्या स्काऊट वगैरेची कमाई करण्यासाठी शंकरपाळे मित्रांना विकत असे!
एकंदरीत काय तर तुम्हाला तुमच्या जेवणाच्या सवयी सोडून द्यायची गरज नाही. तर गरज आहे ती आपल्या व त्यांच्यात सूवर्णमध्य साधन्याची.
क्रमश।पुढील भागात आपण खालील विषयांवरील चर्चेचे अवलोकन करू या. दरम्यान आपण या भागावर आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही विनंती...भाग २:आपली सांस्कृतिक/धार्मिक ओळख आपल्या मुलांनी कशी निर्माण करावी? त्यासाठी आपण मुलांना आपल्या धर्माबद्दल व संस्कृतीबद्दल, केव्हा (कोणत्या वयात), काय व किती सांगावे? मुलांच्या प्रश्नांना (आपण चर्चला का जात नाही?, थ्यांक्सगिव्हिंगला टर्की का करत नाही? वगैरे) उत्तरे कशी द्यावी? मुलांना त्यांच्या मित्रांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायला कसे तयार करावे? अशा घटनांमधून मुलांच्या मनाला कसे जपावे? काय टाळावे व काय टाळायची गरज नाही?भाग ३:आपणास आपल्या भारतातील जवळच्या नातेवाईकांची विषेशत। आई-वडिलांची येथे सतत उणीव भासते. तसेच आपल्या मुलांना त्यांच्या आजी-आजोबांची व ईतर नातेवाईकांची भासत नसेल का? त्यांचे सर्व नातेवाईकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण व्हावेत यासाठी आपण काय करू शकतो?भाग ४:आपल्या मुलांच्या डेटींगच्या प्रकरणात आपला सहभाग काय? मुलांसोबतचे संबंध जपत त्यांना मदत कशी करावी? शाळेत लैंगिक शिक्षण सुरु झाल्यावर आपण त्यांच्याशी काय बोलावे व कसे वागावे?

आणि मुक्या ढाल जिंकतो............

मुक्या नेहमीप्रमाणे त्याच्या दोस्तांसोबत खेळत होता. धुळीने अंग माखून निघाले होते. तिकडून आईच्या हाका सुरू होत्या. संध्याकाळचा काळोख पडायच्या आत खेळ संपवून निघायचे होते. अंगणात शेजारच्या कंपाउंडर काकाच्या रेडिओवर हिंदी बातम्या चालल्या होत्या. नाना-मुकादम त्यांच्याकडे आलेला होता. पायरीच्या एका कोप-यावर बसून डाव्या हातातली तंबाखू उजव्या हाताच्या अंगठ्याने मळत समोरच्या कडुनिंबाच्या उंच शेंड्याला न्याहाळत किलकिले डोळे करून कान रेडिओकडे रोखून धरत खरखरणाऱ्या रेडिओतून आलेले सगळे समजत आहे अशा अविर्भावात नाना काकांच्या हो ला हो मिसळत होता. काकांनी टाळ्या पिटल्या तशा नाना सुद्धा वाहवा करत टाळ्या पिटू लागला. मुक्याला पण काहीतरी विशेष घडले आहे असे वाटले व त्याने कुतूहलाने काकांना विचारले,"काय झाले आहे हो काका?" काका मात्र त्या कार्ट्याला हातानेच शांत राहण्याचा इशारा करून पुन्हा बातम्यांत मग्न झाले. नानाला पृच्छा करण्यात काही अर्थ नाही कारण त्यांना हिंदी समजत नाही हे त्याला ठाऊक होते. तरी पण उगीच ताटकळत उभा राहण्यापेक्षा प्रयत्न केलेले बरे म्हणून मुक्याने नानाला विचारले, "नाना, तुम्ही तरी सांगा काय बातमी आहे ते?"
"तुला रं काय काय करायचंय? जा तिकडं तुझी माय हाका मारायतीय तुला."
"नाना, बातमी काय आहे ते कळले नाही असं म्हणा ना सरळ," बेरक्या मुक्याने नानांच्या मर्मावर घाव घातला तसा नानांचा चेहरा पडला व काकांना खुदकन हसू आले.
"नाना सांगा ना त्याला की आपल्या पी. टी. उषाने सुवर्णपदक जिंकले म्हणून", शेवटी काकांनी नानाला आधार दिला.
"हे सुवर्णपदक काय असते?" पुन्हा मुक्या उत्तरासाठी उतावीळ झाला.
"आपल्या गावच्या जत्रात रामू पहिलवानाला कुस्तीत ढाल मिळाली ना तशीच मिळाली हीला," नानांनी पुन्हा आपली अक्कल पाजळवली होती व काका पुन्हा बातम्यांत हरवले होते.
मुक्या घरी आला खरा पण त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. काकांना या उषाच्या विजयात येवढा आनंद का झाले असेल बुवा? कदाचित त्यांच्या नात्या-गोत्यातली असेल ती. पण तिला रामू पहेलवानासारखी ढाल कशी बरे मिळाली असेल? छे, ती कुस्ती नसेल खेळली, काही तरी दुसरा खेळ असेल. पण काका तर सुवर्ण पदक म्हणाले? खरेच सोन्याचे ताट असेल का ते? काका शहरात राहिलेले एकमेव जाणकार आहेत. त्यांना सगळे माहित असते. पण ते आपल्याला सरळ उत्तर देतील याचा भरोसा नाही... जर ते सोन्याचेच ताट असेल तर ती स्वतः जेवणार का त्यात, कथेतल्या राजकन्येसारखी? का आई-वडिलांना जेवायला देणार ते ताट? जर ती एकटीच त्या ताटात जेवली तर तिचे बहीण भाऊ नाही का भांडणार तिला? अशा कितीतरी विचारात असताना छपराकडे बघत-बघत मुक्याला झोप लागली होती.

गुरुजींनी फळ्यावर लिहून दिलेला उतारा सर्वांनी लिहून घेतला तसा मुक्याने पण घेतला होता. गुरुजी म्हणाले, "परवा आपल्या वर्गात मी उत्कृष्ट वाचन स्पर्धा घेणार आहे. या स्पर्धेत हा उतारा सर्वांनी वाचून दाखवायचा आहे. जो कोणी हा उतारा न अडखळता स्पष्ट व शुद्ध वाचून दाखवील त्याला आपल्या केंद्र शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते बक्षीस मिळणार आहे. बक्षिसाच्या खर्चासाठी सर्वांनी उद्या चार-चार आणे घेऊन यायचे आहेत."
"गुरुजी, बक्षीस काय असणार आहे?" मुक्याने न राहवून विचारले. "ते बक्षीस देतानाच कळेल," गुरुजींनी मुक्याच्या उत्कंठतेत भर घातली होती. सगळी मुले स्पर्धेच्या तयारीला लागली. बिचारा मुक्या मात्र डोळे आल्यामुळे वाचू शकत नव्हता. कसेतरी बाहेर पाहू शकत होता तेही मोठ्या मुश्कीलीने. गुरुजींनी आज त्याला मागे कोपऱ्यात बसायला सांगितले होते व कोणीही त्याच्या जवळ जायचे नाही असे बजावले होते. मधल्या सुट्टीत त्याने गुरुजींच्या वायरच्या पिशवीत हळूच डोकावून पाहिले होते. त्यात जेवणाचा डबा, मोठा पांढरा रुमाल आणि काहीतरी होते. "सुवर्णपदक असेल का? का छोटी ढालच असेल?" मुक्या अंदाज बांधायचा प्रयत्न करत होता. स्पर्धा सुरू झाली. सगळी मुले धडाधड जाऊन वाचून येऊ लागली. शेवटी गुरुजींनी मुक्याला बोलावले. मोठ्या कष्टाने डोळे चोळत मुक्या गेला व डोळ्यांची पर्वा न करता उतारा वाचून आला, अगदी सहजतेने. केंद्रावरून आलेल्या हजारे गुरुजींनी बक्षीस जाहीर केले. मुक्याचे नाव घेताच मुक्याला कोण आनंद झाला. बक्षीस घ्यायला जाताना सगळ्या वर्गाने टाळ्या पिटल्या होत्या. पण बक्षीस मिळाल्यावर मात्र मुक्याचा भ्रमनिरास झाला. फक्त पेन होता तो. शाळा सुटल्यावर शहरातून आणलेला भारीचा पेन पाहण्यात त्याच्या मित्रांनी धन्यता मानली होती तरी मुक्या मात्र संतुष्ट नव्हता.

पुढे मुक्याचे ते गुरुजी बदलून जाऊन नवीन गुरुजी आले. या नव्या गुरुजींना शाळेत रस जरा कमीच असे. त्यामुळे नंतर त्यांच्या गावच्या त्या शाळेत स्पर्धा वगैरे काही झाले नाही. मुक्या मात्र नेहमीप्रमाणे या वर्षी सुद्धा पहिल्या नंबरात पास झाला. आता पुढच्या वर्गासाठी मुक्याच्या दाद्याने त्याला शहरातल्या शाळेत घालायचे ठरवले. त्याचा दाद्या शहरातच कामाला असायचा.मुक्याला घेऊन दाद्या शहरातल्या शाळेत गेला. मुख्याध्यापकांनी त्याची गुणपत्रिका न्याहाळत मुक्याला काही प्रश्न विचारले. महाराष्ट्राची व भारताची राजधानी तसेच जगातला सगळ्यात मोठा देश विचारून झाल्यावर काही भागाकार-गुणाकाराची गणिते करून झाली. एक ओळ लिहायला लावून वाचून घेण्यात आली व मुख्याध्यापक दाद्याकडे वळले."पोरगा हुशार आहे. त्याला विशेष तुकडीत टाकू या. या वर्गात टाकल्यावर संस्कृत शिकायला मिळेल तसेच हा मेरिटच्या अपेक्षित विद्यार्थ्यांचा वर्ग असल्याने शाळा सुटल्यावर सुद्धा क्लास घेतले जातील. तुम्हाला खेड्यातून ये-जा करून जमणार नाही. याला इथेच ठेवावे लागेल. तसेच शाळेचा गणवेश व पायात चप्पल असणे आवश्यक आहे, "त्यांनी मुक्याच्या अनवाणी पायाकडे इशारा करत सुचवले. तसा दाद्यानेही होकार दिला. मुक्यालाही आनंद झाला. शाळे बद्दलचे अनेक विचार, अनेक स्वप्ने पाहत मुक्या घरी आला. मोठ्या शाळेत शिकायला मिळणार. या शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा होत असतील, त्यात भाग घ्यायला मिळणार म्हणजेच ढाल जिंकायची संधी! मुक्या मनातच हुरळून गेला. खेडवळ दिसणाऱ्या मुक्याला सुरुवातीला जेमतेमच मित्र होते. पण त्याच्या खेळीमेळीच्या स्वभावामुळे व हुशारीला पाहून गावातल्या एवढे नसले तरी त्याला बरेच मित्र मिळू लागले. मुक्याच्या अपेक्षेप्रमाणे या शाळेत स्पर्धा होत असत. पण अजून ढाल तर सोडाच शाळेतल्या निवड फेऱ्यांतच तो बाद होत होता. खेडवळ उच्चार आहेत म्हणून वक्तृत्व स्पर्धेतून बाद, सुभाषिते/श्लोक वापरता येत नाहीत म्हणून निबंधात बाद, समान उंचीत अक्षरे येत नाहीत म्हणून हस्ताक्षरातून बाद... बाद, बाद, बाद... इथली मुले घरीच सुभाषिते शिकून येत. मुक्याच्या तर बालाही सुभाषिते येत नव्हती. गावात याच्या बोलण्याचे कौतुक व्हायचे. तसेच याच्या पेक्षा सुंदर अक्षर याच्या गुरुजींचे सुद्धा नव्हते हे त्यांनीच कित्येकदा कबूल केलेले. गावातल्या शाळेत असताना कोणत्याही स्पर्धेत निर्विवाद पहिला असणारा मुक्या मागे पडत असल्यामुळे कधीकधी खचून जायचा. पण पुन्हा त्याला आठवायचा त्याचा दाद्या. गरीब असला तरी वरच्या जातीतला असल्याने मुक्याला वसतिगृहाने प्रवेश नाकारला तेव्हा तो दाद्यासोबतच राहायला गेला होता. मुक्याला अभ्यासात व्यत्यय नको म्हणून दाद्याने कामावरल्या आपल्या सहका-यांना सोडचिठ्ठी देऊन परवडत नसताना सुद्धा स्वतंत्र खोली केली होती. गावी मुक्याच्या घरातल्या एका खोलीत राहणाऱ्या कंपाउंडर काकांचे वर्षात होत नसेल येवढे भाडे मुक्याच्या दाद्याला शहरात एका महिन्यात द्यावे लागायचे. बाकीचेही खर्च खूपच होते. तरीही दाद्या याला शिकवायचेच यावर ठाम असे. आता मुक्याला ढाल व पदकातला फरक समजू लागला होता. त्याने मित्राच्या घरी टीव्हीवर व पेपरात ढाल-पदके मिळवणारे अनेक खेळाडू पाहिले होते. त्यासाठी काय करावे लागते हे सुद्धा माहित झाले होते. खेळात त्याची शाळा मागे होती. त्यांच्या शाळेत मैदानी खेळांच्या स्पर्धेत उतरून तयारी करण्यासाठी मैदान व साहित्य नव्हते. व ते असणाऱ्या महागड्या शाळा मुक्याच्या नव्हे पण त्याच्या दाद्याच्या आवाक्याच्या बाहेर होत्या. पण एके दिवशी त्याला आशेचा किरण दिसला. त्यांच्या शाळेत जिल्हा स्तरीय अडथळ्यांच्या स्पर्धेची सूचना फिरवली गेली. मुक्याने लगेचच संबंधित शिक्षकांशी संपर्क साधला. त्या मराठीच्या शिक्षकांनी त्यांना होती तेवढी माहिती दिली. "मुक्या आज बोलत का नाहीस रं?" दाद्याने रात्री झोपताना मुक्याला विचारले, "दाद्या, मला बूट पाहिजेत. पळायची स्पर्धा आहे."
"किती लागतील?""माझ्या मित्राने स्वस्तातल्या कंपनीचे घेतले दोनशे रुपये मोजून. पण बिनाकंपनीचे घेतले तर ६० रुपयाला मिळतात. मी बघून आलो सुभाष रोडला आज.
"आणि दोघेही डोळे बंद करून झोपल्याचे नाटक करता करता झोपून गेले होते. दुसऱ्या दिवशी मुक्या संध्याकाळी खोलीवर आला तर त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. दाद्या त्याच्यासाठी ते जोडे (शूज) घेऊन आला होता.

स्पर्धेचा रविवार उजाडला. सूचने प्रमाणे मुक्या सकाळी सहालाच जिल्हा परिषद मैदानात पोचला. प्रसन्न वातावरणात श्वान-वराहांच्या व्यतिरिक्त कोणीही इतर प्राणी हजर नव्हते. "हुशारांच्या" वर्गातला असल्याने त्याचा कोणी वर्गमित्र येणे अपेक्षित नव्हतेच. थोड्या वेळाने त्याच्या शाळेतले इतर काही मुले हजर झाली होती. स्पर्धा सातला सुरू होणार होती. पण आठ वाजेपर्यंत कोणीही मैदानावर न फिरकल्याने यांना परत जावे लागले होते. दुसऱ्या दिवशी शाळेत चौकशी केल्यावर कळले की स्पर्धेचे ठिकाण बदलून पोलिसांच्या कवायतीचे मैदान झाले होते. पण मराठीच्या शिक्षकांकडून स्पर्धांची जबाबदारी इतिहासाच्या शिक्षकांवर सोपवण्यात आली असल्याने ही सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली नाही...

स्पर्धेचा रविवार उजाडला. सूचने प्रमाणे मुक्या सकाळी सहालाच जिल्हा परिषद मैदानात पोचला. प्रसन्न वातावरणात श्वान-वराहांच्या व्यतिरिक्त कोणीही इतर प्राणी हजर नव्हते. "हुशारांच्या" वर्गातला असल्याने त्याचा कोणी वर्गमित्र येणे अपेक्षित नव्हतेच. थोड्या वेळाने त्याच्या शाळेतले इतर काही मुले हजर झाली होती. स्पर्धा सातला सुरू होणार होती. पण आठ वाजेपर्यंत कोणीही मैदानावर न फिरकल्याने यांना परत जावे लागले होते. दुसऱ्या दिवशी शाळेत चौकशी केल्यावर कळले की स्पर्धेचे ठिकाण बदलून पोलिसांच्या कवायतीचे मैदान झाले होते. पण मराठीच्या शिक्षकांकडून स्पर्धांची जबाबदारी इतिहासाच्या शिक्षकांवर सोपवण्यात आली असल्याने ही सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आली नाही...

पुन्हा स्पर्धेचा दिवस उजाडला. मुक्या व त्याची दोस्त मंडळी स्पर्धास्थानावर पोहचली व तिथे आलेल्या बाकी स्पर्धकांना बघून यांना स्वतःवरच हसू येऊ लागले. बाकी जवळपास सगळे स्पर्धक मोठ्या वयाचे व बलदंड शरीराचे होते. त्यांनी मोठ-मोठे ढगळ बनियन व अर्ध्या विजारी घातल्या होत्या व त्यांच्या समोर ही पोरे-टोरे म्हणजे डेव्हिड-गॉलियथच्या कथेतल्या डेव्हिड सारखे वाटू लागले. त्यांच्या सायकली तर मुक्या आणि कंपनीने स्वप्नातही कधी पाहिल्या नव्हत्या अशा दिसण्यातच चपळ होत्या. व्हायचे तेच झाले. स्पर्धा सुरू झाल्यावर एक-दोन मैलाच्या अगोदरच ते स्पर्धक समोर दिसेनासे झाले व या मित्रमंडळाला मग मुक्याच्या रस्त्यात असणाऱ्या शेतात जाऊन बोरे-टहाळ-सिताफळे-हुरडा या रानमेव्याने विजयोत्सव साजरा करून परत येण्याची वेळ आली.

अशा अनेक स्पर्धा झाल्या. पण मुक्याचे ढाल मिळवण्याचे स्वप्न काही केल्या पूर्ण होत नव्हते. एके दिवशी शाळेतून परतताना नेहमी प्रमाणे मुक्या सार्वजनिक वाचनालयात वर्तमानपत्रे वाचत होता. त्याच्या नियमित वाचनाला व पुस्तकांच्या निवडीला पाहून वाचनालयातल्या एका कर्मचाऱ्याला चाणाक्ष मुक्या आवडायचा. त्याने एके दिवशी मुक्याला बातमी दिली,"आपल्या वाचनालयाला पंचाहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आम्ही मोठी सामान्य ज्ञान स्पर्धा घेत आहोत. तुझे वाचन चांगले आहे. तू नक्की भाग घे." मुक्या सोडणार थोडाच होता. शाळेतही काही दिवसांनी ही सूचना फिरवण्यात आली. त्याने आपले नाव नोंदवले. त्याच्या त्या हुशारांच्या वर्गातल्या सर्वांनीच यात भाग घेतला. पहिली फेरी लेखी लेखी परीक्षेची होती. अनेक शहरात अनेक मोठमोठ्या शाळांना परिक्षाकेंद्रे बनवले होते. मुक्या आपल्या केंद्रावर उत्साहाने नेहमीप्रमाणे पोहचला. हजारो विद्यार्थ्यांच्या त्या इवल्याशा समुदायातून उत्साह भरभरून वाहत होता. अनेकजण आपले काही खरे नाही या भावनेने भेदरलेले दिसत होते. मुक्याला असे नव-नवे वातावरण बघायची आता सवयच लागली असल्याने त्याचा चेहरा मात्र शांत होता. परीक्षा झाली. हजारो विद्यार्थी गळाले. मुक्याचे नाव मात्र दुसऱ्या फेरीच्या यादीत होते. तसे त्याच्या वर्गातल्या त्या हुशार मुला-मुलींचे पण होते. आता दुसऱ्या फेरीत वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या विभागात परीक्षा द्यायच्या होत्या. मुक्या पुन्हा सज्ज. त्याच्या वर्गमित्रांची पुन्हा तयारी सुरू झाली. मुक्याला मात्र ही "तयारी" म्हणजे काय ते माहित नव्हते. त्याने वाचनालयातल्या त्या कर्मचाऱ्यास गाठले व तयारीबद्दल विचारले. "या वाचनालयातली सगळी पुस्तके वाच" एवढेच तो म्हणाला!! अवघड वाटणारी दुसरी व तिसरी फेरी सुद्धा मुक्या लीलया पार करून गेला। त्याच्या त्या हुशार वर्गमित्रांतले बरेच रथी महारथी सुद्धा गळाले होते. "याचे काय खरे आहे. चुकून पास झाला आहे तो." अशा अविर्भावात त्याच्याकडे बघितले जाऊ लागले. तेव्हा आता शेवटची चौथी फेरी पार करणे त्याला आवश्यक वाटू लागले होते. शेवटची फेरी मोठमोठ्या विभूतींच्या समोर मंचावर होणार होती.आणि तो दिवस उजाडला। वार्ताहर, छायाचित्रकार यांची गर्दी मंचासमोर होती. मंचावर संयोजक, पाहुणे तसेच परीक्षक येऊन विराजमान झाले. प्रास्ताविक झाले व शेवटच्या फेरीतील स्पर्धकांना मंचावर आमंत्रित करण्यात आले. मुक्याचे नाव घेतले गेले. तसा मुक्या गर्दीतून वाट काढत पुढे सरकू लागला. दाद्या कामावरून सुट्टी घेऊन आज पहिल्यांदा मुक्यासोबत स्पर्धास्थानावर आला होता. मंचावर चढताना दाद्याच्या प्रेमळ हाताची थाप पाठीवर पडली तसा मुक्या पाठमोरा वळला. दाद्याच्या डोळ्यात त्याने प्रचंड आत्मविश्वास चमकलेला पाहिला.शेवटी स्पर्धा सुरू झाली. चार स्पर्धक व एक बक्षीस, असंतुलित समीकरण होते. पहिल्या फेरीत सगळी उत्तरे बरोबर आली तशी मुक्याची गुणतालिका आघाडीवर गेली. पण दुसरी फेरी होती संगीताची. दुसऱ्या व तिसऱ्या परीक्षेच्या वेळी या विषयातले प्रश्न पाहिले असल्याने अंतिम फेरीतही हा विषय येणार हे त्याला माहित होते. संगीतातही प्रकार असतात, राग असतात, चाली असतात हे त्याला अशातच कळले होते. पण प्रश्न आला "हा राग ओळखा"... आणि मुक्या मागे पडला. त्याला आठवली ती पी. टी. उषा. कुठल्या मागास भागातून आलेली म्हणून सुरुवातीला जगाने हिणवलेली. सुरुवातीला प्रस्थापितांच्या मागे पडलेली व नंतर जिंकलेली. स्पर्धे दरम्यान दोन पावले मागे पडताच दुसऱ्याच क्षणाला चार प्रतिस्पर्ध्याच्या पुढे चार पावले जाणारी. मुक्याने क्षणभर डोळे मिटले. त्याला पुन्हा त्याचा दाद्या दिसला, काबाडकष्ट उपसणारा, पळण्यासाठी बूट आणून देणारा, हप्त्यावर सायकल घेऊन देणारा... अन आठवली त्याला दाद्याच्या काबाडकष्टाने खरबरीत झालेल्या हाताची प्रेमळ थाप मंचावर चढताना पडलेली. पुन्हा एकदा अपयश? छे, शक्य नाही हे पचवणे आता...

"आता पुढची व अंतिम फेरी", सूचना झाली तसा मुक्या भानावर आला. या फेरीत सर्वांना एकच प्रश्न विचारला जाणार होता व सर्वांत चांगल्या उत्तराला गुण मिळणार होते. मुक्याने गुणतालिकेकडे नजर टाकली. त्याचे व प्रशांत नावाच्या त्याच्या प्रतिस्पर्ध्याचे गुण सामानच होते ४८०.

प्रश्न आला, "तुमच्या जीवनाचे ध्येय काय?"

प्रशांत शांत व धिरगंभीरपणे उत्तरला, "माझ्या आई-वडिलांना अभिमान वाटवा असा व्यक्ती बनणे।" टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यात मुक्याचीही होती. आता माईक मुक्याच्या हातात आला. सगळे स्तब्ध झाले. काय बोलावे हे मुक्याला कळेना तेव्हा त्याने हे काम त्याच्या अंतरात्म्यावर सोडून दिले व नकळत त्याच्या ओठातून शब्द बाहेर पडले, "परं वैभवं ने तुमे तत् स्वराष्ट्रम्!" टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला, होतच राहिला, कदाचित न संपण्यासाठी!"आणि प्रथम विजेता आहेSS.... मुकुंद पुजारी!!"... पहिल्यांदाच मोठ्या भोंग्यातून आपले नाव ऐकून मुक्याला स्वतःच्या कानावर विश्वास बसेना. मुक्याने एकदाची ढाल जिंकली होती. पाहुणे उठले, आयोजक पुढे झाले, छायाचित्रकार पुढे सरसावले. प्रशांतला पुष्पगुच्छ मिळाला होता. आता मुक्याला पुढे बोलावण्यात आले... मुक्याने पाहुण्यांना चरणस्पर्श करून ढाल स्वीकारली. कॅमेऱ्यांच्या फ्लॅशने एका अनोळखी चेहऱ्याला पहिल्यांदाच उजेडात आणले. माईक पुन्हा मुक्याच्या हातात दिला गेला. त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. अन गहिवरलेल्या गळ्यातून थरथरत्या ओठांच्या मधून शब्द बाहेर पडले,"दाद्या इथे ये..."गर्दीतून वाट काढत डोळे पुसत कुणीतरी कृष तरूण मंचावर जाताना गर्दीने पाहिला. मुक्या पुढे झाला व दाद्या ढाल दाद्याच्या चरणावर ठेवली, "हीची जागा इथे आहे..." टाळ्यांच्या गजरात हे शब्द दाद्याच्या कानावर पडले व त्याने आपल्या या लहानग्या भावाला कडकडून मिठी मारली.

चोरी रे चोरी

कधी काळी मी मनोगत या संकेतस्थळावर बरेच लिहायचो. त्याबद्दल कधीतरी पुन्हा लिहीन. कारण आजचा विषय आहे चोरी. माझ्या एका कथेची चोरी झालीये. "आणि मुक्या ढाल जिंकतो" ही माझी कथा कोणा नितीन नावाच्या मुंबईकराने चोरून त्याच्या अनुदिनीवर टाकलीये. आज अचानक मला ती तेथे पहायला मिळाली आणि आश्चर्य वाटले. जर माझ्या कथा कोणाला हव्या असतील त्या मागून घ्या ना. चोरता कशाला? असो. पण चोरण्याइतपत चांगल्या कथा मी लिहितो तर! आभारी आहे नितीनराव!!

चोरीचा माल हा येथे आहे.

http://maimarathi360.blogspot.com/2007/06/blog-post_1902.html

Thursday, September 27, 2007

पोलिसांचे खच्चिकरण

तिकडे उत्तर प्रदेशात पोलिसनिवडी बद्दल आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये चाललेला कालगितुरा रंगात आलेला असतानाच इकडे आपल्या आदर्श म्हणवल्या जाणार्य़ा महाराष्ट्रातही खुद्द गृहमंत्रीच पोलिसांच्या मारेकयांना सामिल झाल्याने अधिच मनोधैर्य खचलेल्या पोलिसांचे अनखिनच खच्चिकरण झाले आहे. जीवाचे रान करून नव्हे जीवाची बाजी लावून अतिरेक्यांच्या मुस्क्या बांधनाया धडाडीच्या अनेक अधिकायांचे खच्चिकरण सतत राजकारणी आणि वरिष्ठ करत असतातच. परंतू काल-परवा पर्यंत आपले आबा "पोलिसांनो, तुमची शत्रे फक्त शोभेची नाहीत हे अतिरेक्यांना दाखवून द्या" असे म्हणत पोलिसांचे धैर्य वाढवण्याचे काम करताना आपण पाहत होतो. वाटत होते आता पुन्हा एकदा पोलिस अतिरेक्यांवर बंदुका रोखताना घाबरायचे नाहीत. पण कालच्या घटनेने पोलिसांचीच काय, सामान्य जिद्न्यासू माणसाची सुद्धा मती गुंग झाली असेल.
त्याचे झाले असे की, रमजानचा महिना सुरु झाला. सालाबादप्रमाणे यंदा सुद्धा राजकारण्यांच्या इफ्तार पार्ट्या सुरु झाल्या. त्यात अर्थातच महाराष्ट्रात कॊंग्रेस सर्वात पुढे होते. आता जर सगळी गठ्ठा मते त्यांनाच गेली तर कसे, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या गोटात (आणि पोटात) ही उठला आणि त्याचाच परिणाम म्हणुन आबांनी सुद्धा इफ्तार पार्टी झोडली. आणि ती सुद्धा मुंबईतल्या पाकिस्तानात, थेट भिंवडीत. आबा हे सुद्धा विसरले की हीच ती भिवंडी जिथे त्यांच्या जवानांची (पोलिसांची) दिवसा ढवळ्या कातडी सोलून अन डोळे फोडून हत्या केली होती. हेच ते भिवंडीवाले होते ज्यांना त्यांच्या अतिरेकी कारवायांवर डोळा ठेवणारी पोलिस चौकी नको होती.
आबा, काय हे, कोणत्या तोंडाने त्या जवानांच्या विधवांना तोंड दाखवणार तुम्ही? तुमच्या सुद्धा तोंडाला जवानांचे रक्त लागलेच शेवटी! म्हणणार तरी काय म्हणा, तुम्ही पडले शेवटी मोठ्या दलाली राजकारण्याचे चेले ज्यांनी महाराष्ट्रात जाती-पातीच्या राजकारणाला लहाणाचे मोठे केले. तुमचे साहेबही शेवटी वर्षानुवर्षे नेहरु-गांधींच्या ताटताले मांजर होतेच ना. तेव्हा ते गूण तुमच्यात सुद्धा दिसणारच म्हणा. आम्ही जनताच शेवटी मूर्ख ठरलो. तुमच्या सारख्या राजलारण्यांच्या जातीवाल्यांकडून (खरे तर गिधडांकडून) काही अपेक्षा ठेवल्या.

Friday, September 21, 2007

मास्तरांची छडी

मला ना "छडी लागे..." ही म्हण तयार करणारा तो जो कोण आहे ना त्याला एकदा भेटायचय. कोवळ्या हातांवरच नव्हे तर मनावर देखील आघात करुन विद्या कशी प्रदान करणार आणि छडी न मारता का नको ते मला त्याला विचारयचय. आणि त्याच्या ह्या म्हणीमुळे कित्येक विकृत मास्तरांनी कोवळ्या बालमनावर केलेल्या अत्याचारांचा सुद्धा जाब विचारयचाय.
हेच पहा ना, आज गप्पा मारत असताना सौ.ने तिच्या लहाणपणी त्यांना असणाया एका मारकुट्या मास्तराच्या आठवणी सांगितल्या. तो मास्तर (हो, मला गुरुंबद्दल निंतात आदर आहे तरी सुद्धा अशा विकृत माणसाला मी जास्तीत जास्त एकेरीच संबोधू शकतो)... तर तो मास्तर मुलांना म्हणे चूक विधाने सांगून ते चूक आहेत की बरोबर ते विचारायचा. मुलांनी ते चूक आहे असे म्हटले तर "शहाण्या, माझे विधान चूक आहे असे म्हणतोस का" असे म्हणून बदडायचा आणि भितीपोटी बरोबर आहे असे म्हटल्यावर "गाढवा, येवढे येत नाही का" असे म्हणून हात/छडी मोकळी करायचा. या अशा राक्षसाच्या छडीने कसली विद्या मिळणार हो मुलांना?
आमचा असाच एक मास्तर होता. माझ्या वडील आणि अजोबांप्रमाणे मी पण कपाळावर गंधा लावायचो. तो मास्तर मला "टिळ्या"म्हणूनच संबोधायचा व काहीतरी कारण काढून बदडायचा. त्याची तासिका म्हटले की माझ्या पोटात भितीचा गोळा यायचा. पुढे महाविद्यालयीन जीवनात गेल्यावर कळले की तो कम्युनिस्ट विचारधारेचा होता व त्याला हिंदूत्वाच्या कोणत्याही धार्मिक चिन्हांचा राग असायचा. म्हणून मी त्याच्या घरी जायचे ठरवले. घर त्याच्या पत्नीने उघडले आणि काय चमत्कार, तिच्या कपाळावर टिकली अन गळ्यात मंगळसुत्र होते की! अर्था त्या दिवशी तो घरी नसल्याने वाचाला. नाही तर माझ्यातल्या तरुण रक्ताने त्याच्या एक-एक गुद्द्याचा हिशोब घेतला असता तर नवल नव्हते.
तर अशा या रक्षसी मास्तरांना कायद्याने आडवले जात असेल तर स्वागतर्हच नव्हे का? माझा या नवीन कायद्याला पूर्ण पाठिंबा आहे.

Friday, September 14, 2007

भुरका (विडंबन)

मूळ रचना - बहिणाबाई चौधरी
मूळ गीत:
आरे खोप्यामंदि खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलांसाठी तीनं
झोका झाडाले टांगला

विडंबनाची पार्श्वभूमी: आमच्या हीने खमंग (हिच्या हातचा म्हटल्यावर खमंग होणारच म्हणा) फोडणीचा भुरका केला होता. पोटात भुकेने कावळे काव-काव करत होते आणि जीभ हातभर बाहेर येऊन ताटात ताक-भाकरी-भुरका कधी येणार याची वाट पाहात होती. त्यादरम्यान आमच्यातल्या शिघ्रकवीने हे तारे तोडले...

आरे खादाड माणसा
हाणी भूरका चांगला
देखा जीभेसाठी तिने
झाल फोडणी टाकला ॥

तिची उलुशी शेगडी
तिची उलुशी कढई
परी त्याची चव बघ
सर त्याला जगी न्हाई ॥

लाल भूरकीच्या संगं
कुडी लसूण टाकला
फोडणीच्या गंधा मागं
उरी ठसका भरला ॥

आता हाणा कुस्कटूनं
हाटेलीला काय करा
बायकोची कारागिरी
जरा चाख रे भास्करा ॥

(१० ऒग. २००६)

Friday, September 7, 2007

श्रद्धेचा बाजार!

मागच्या काही वर्षांपासून भारतीय, विषेशतः हिंदी, चित्रपट सृष्टीत एक नवीनच ’ट्रेंड’ पहायला मिळत आहे. नायक नायिका परदेशात असतात (किंवा जातात). तिथे त्यांना भावनिक आधार हवा असतो. मग ते नेमके चर्चमध्येच जातात आणि येशुपुढे नतमस्तक होतात आणि पुढे ते संकटांवर मात करतात. तसे पाहिले तर यात काळेबेरे असे काहीच वाटत नाही. पण जरा खोलातून विचार केला तर मात्र पडद्यामागे बरेच काही चालले आहे हे लक्षात आल्यावाचून रहात नाही.
चित्रपट निर्मिती हा एक व्यवसाय आहे व येथे निर्माते-दिग्दर्शक प्रत्येक गोष्ट बारकाईने करत असतात. नायक-नायिकेच्या हातात शितपेयाची बाटली दाखवायची असो (DTPH, TAAL, etc), नयकाच्या कारचे टायर दाखवायचे असो (तरारांपाम), एखादे भोजनालय दाखवायचे असो (चक दे इंडिया मध्ये McDonalds) अथवा नयकांच्या अंगावर एखाद्या कंपनीचे कपडे, जोडे, टोपी वगैरे दखवायची असो, निर्माते दणकावून पैसे उकळत असतात. मग हे निर्माते नायक-नायिकांच्या गळ्यातले मोठ-मोठे क्रॊस (cross) दाखवण्यासाठी तसेच बळे-बळेच ओढून तानून चर्च दाखवण्यासाठी पैसे घेत नसतील का?
उदाहरणे शेकडो देता येतील. मी तसे चित्रपट कमीच पाहतो. पण मागच्य दोन-चार वर्षात चित्रपट पाहिला आहे अन तो जर ऐतिहासिक वगैरे नसेल तर त्यात चर्च दाखवले गेले नाही असे सहसा झालेच नाही. दिलवाले दुल्हनिया मधली सिमरण असो किंवा आजकाल आलेल्या कॆश (CASH) चित्रपटातला अजय देगवणने साकारलेला चोर असो, सगळे हिंदू असून चर्चमध्ये हटकून जातातच. तसेच अनेक चित्रपटांत त्यांचे स्वप्नात गाणे म्हणत-म्हणत चर्चमध्ये लग्नही उरकलेले असते. येवढेच कशाला विकली मालमाल सारख्या चित्रपटातल्या दुर्गम खेड्यात जिथे कोणला धड घरही नसते तिथे सुंदर चर्च, तसेच एक मान्यवर पाद्री सुद्धा असतो! आहे किनई कम्माल!

मी स्वतः अमेरिकेत फिरलो आहे. येथे कायम स्वरुपी वास्तव्यास आलेले अनेक लोक तसेच, व्यावसायिक, विद्यार्थि, कलाकार, यात्रेकरु अशा अनेक हिंदुंना मी भेटलो-बोललो आहे. त्यापैकी कोणीही येथे चर्च मध्ये गेलेले अढळले नाही; अगदी क्वचित कोणितरी हे चर्च अतून असते तरी काय या उत्सुकतेपोटी एखादवेळेस जाऊन आलेले आढळले. मात्र यातील सर्वच जन (हो, सर्वजन) येथे मंदिरात जाऊन आलेले होते, आणि बहुतेक सगळे श्रद्धेनेच!

मग या चित्रपट वाल्यांनाच चर्चेसचा येवढा पुळका कशासाठी?

मला वाटते हा भारतातल्या ख्रिस्ती मिशनयांच्या योजनेचा भाग असावा. त्यांच्या कडे पैसा आहे, त्यांचे ध्येय नक्की आहे (भारतात सर्वात जास्त नव-ख्रिस्ती तयार करणे) तसेच त्यांना मुत्सद्देगिरी सुद्धा चांगली जमते. भारतीय समाज हा भावनाप्रधान असल्याने ते भावना न भडकवता तसेच त्याच भावनांचा गैरफायदा घेऊन धर्मांतरे करीत असतात. चित्रपटांमधून ते त्यांच्या धर्माची ओळख करुन देत असावेत (psycological groundwork). जेणे करून जेव्हा ते प्रत्यक्ष लोकांसमक्ष जातात तेव्हा "हे काय आणखी नवीन!" असा भाव लोकांच्या चेहयावर येऊ नयेव पुढचे काम सोपे व्हावे.

खरे तर या सगळ्या प्रकाराचा सखोल अभ्यास अन चौकशीच झाली पाहिजे.