Thursday, September 27, 2007

पोलिसांचे खच्चिकरण

तिकडे उत्तर प्रदेशात पोलिसनिवडी बद्दल आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये चाललेला कालगितुरा रंगात आलेला असतानाच इकडे आपल्या आदर्श म्हणवल्या जाणार्य़ा महाराष्ट्रातही खुद्द गृहमंत्रीच पोलिसांच्या मारेकयांना सामिल झाल्याने अधिच मनोधैर्य खचलेल्या पोलिसांचे अनखिनच खच्चिकरण झाले आहे. जीवाचे रान करून नव्हे जीवाची बाजी लावून अतिरेक्यांच्या मुस्क्या बांधनाया धडाडीच्या अनेक अधिकायांचे खच्चिकरण सतत राजकारणी आणि वरिष्ठ करत असतातच. परंतू काल-परवा पर्यंत आपले आबा "पोलिसांनो, तुमची शत्रे फक्त शोभेची नाहीत हे अतिरेक्यांना दाखवून द्या" असे म्हणत पोलिसांचे धैर्य वाढवण्याचे काम करताना आपण पाहत होतो. वाटत होते आता पुन्हा एकदा पोलिस अतिरेक्यांवर बंदुका रोखताना घाबरायचे नाहीत. पण कालच्या घटनेने पोलिसांचीच काय, सामान्य जिद्न्यासू माणसाची सुद्धा मती गुंग झाली असेल.
त्याचे झाले असे की, रमजानचा महिना सुरु झाला. सालाबादप्रमाणे यंदा सुद्धा राजकारण्यांच्या इफ्तार पार्ट्या सुरु झाल्या. त्यात अर्थातच महाराष्ट्रात कॊंग्रेस सर्वात पुढे होते. आता जर सगळी गठ्ठा मते त्यांनाच गेली तर कसे, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या गोटात (आणि पोटात) ही उठला आणि त्याचाच परिणाम म्हणुन आबांनी सुद्धा इफ्तार पार्टी झोडली. आणि ती सुद्धा मुंबईतल्या पाकिस्तानात, थेट भिंवडीत. आबा हे सुद्धा विसरले की हीच ती भिवंडी जिथे त्यांच्या जवानांची (पोलिसांची) दिवसा ढवळ्या कातडी सोलून अन डोळे फोडून हत्या केली होती. हेच ते भिवंडीवाले होते ज्यांना त्यांच्या अतिरेकी कारवायांवर डोळा ठेवणारी पोलिस चौकी नको होती.
आबा, काय हे, कोणत्या तोंडाने त्या जवानांच्या विधवांना तोंड दाखवणार तुम्ही? तुमच्या सुद्धा तोंडाला जवानांचे रक्त लागलेच शेवटी! म्हणणार तरी काय म्हणा, तुम्ही पडले शेवटी मोठ्या दलाली राजकारण्याचे चेले ज्यांनी महाराष्ट्रात जाती-पातीच्या राजकारणाला लहाणाचे मोठे केले. तुमचे साहेबही शेवटी वर्षानुवर्षे नेहरु-गांधींच्या ताटताले मांजर होतेच ना. तेव्हा ते गूण तुमच्यात सुद्धा दिसणारच म्हणा. आम्ही जनताच शेवटी मूर्ख ठरलो. तुमच्या सारख्या राजलारण्यांच्या जातीवाल्यांकडून (खरे तर गिधडांकडून) काही अपेक्षा ठेवल्या.

1 comment:

bhaskarkende said...

या लेखावर उपक्रम या संकेतस्थळावर झालेल्या चर्चेचा दुवा...
http://mr.upakram.org/node/755