Monday, November 17, 2008

कनकालेश्वर - ऐतिहासिक मानबिंदू

औरंग्याने महाराष्ट्रातल्या वास्तव्यात हजारो मंदिरे उध्वस्त केली. त्यातली बरीच मशिदींमध्ये बदलवली गेली, काही नामशेष झाली, काही आजही डगडुगीच्या/जिर्नोद्धाराच्या प्रतिक्षेत आहेत तर थोडी पुन्हा नव्याने उभारी घेऊन उभी राहिली. त्यापैकी एक प्रसिद्ध मंदिर म्हणजे हे कनकालेश्वर...




बीड शहराच्या पूर्वेला बिंदूसरेच्या तिरावर असलेले हे महादेवाचे हजारो वर्षांपूर्वीचे मंदिर पुराणांमध्ये तसेच रामायणातही उल्लेखलेले आहे. काही पुराणांमध्ये परशुरामाने येथे महादेवाची स्थापना केली असा उल्लेख आहे. तर इतिहासकारांच्या मते हे किमान १००० ते १४०० वर्षे जुने असावे. याचे बांघकाम हेमाडपंथी स्वरुपातले आहे... केवळ दगडांवर दगड गुंफून हजारो वर्षे उभे असलेल्या या देवळाने केवळ ऊन, पाऊस, वारा यांचाच नव्हे तर मुसलमानी आक्रमकांच्या पहारी, हातोडे, तोफा, यांचाही सामना केला आहे.

या दुष्काळी/कोरड्या भागातही कोरडे न पडणार्‍या या तळ्याच्या मध्यभागी असलेल्या या देवळात जायला एक छोटा दगडी पूल आहे जो पावसाळ्यात पाण्याखाली असतो. त्यावरुन आत गेलो की हे प्रवेशद्वार दिसते.




अल्लाउद्दीन खिलजीचा मूळचा गुजराथ/राजस्थान या भागातला सेनापती महादेव कपूर ज्याचे धर्मांतर केल्यानंतर मलिक कपूर असे नामकरण करण्यात आले त्याने पहिल्यांदा या देवळावर आक्रमण केले. पुढे औरंग्याच्या कर्दनकाळी सैन्याने या मंदिरावर कमीत कमी २७ वेळा हल्ले केले. त्यात एकून एक सर्व मुर्ती भग्न केल्या गेल्या. हे मंदीर त्या नंतर बहुतेक वेळा हिंदूंसाठी बंदच होते. ते परत हिंदूंच्या हाती यायला १९४८ साल उजडावे लागले.

या देवळाच्या आत सर्व भिंतीवर देवदेवतांच्या सुबक व कोरीव भग्न मूर्ती त्या आक्रमकांच्या क्रौर्याची साक्ष आजही देतात.



गाभ्यार्‍याच्या छताचे मूळ कोरिवकाम सुदैवाने आजही सुरक्षित आहे. ते पाहताना मंत्रमुग्ध व्हायला होते. या देवळाला त्याच्या या श्रीमंतीमुळे/वैभवामुळे कनकालेश्वर हे नाव पडले. (कनक = सोने, सूवर्ण).



या मंदिराचे पुजारी कल्याण महाराज हे प्रसिद्ध समाजसेवक आहेत. त्यांच्या मते हे देऊळ स्वातंत्र्य मिळण्याच्या काळात जर हिंदूंनी मिळवले नसते तर याचेही बाबरी झाले असते. त्यांचे हे म्हणने किती वास्तववादी आहे याची प्रचिती याच शहरातील आणखी एक मंदीर (पद्मावती मंदीर) जे की आज एका विशाल मशिदीमध्ये रुपांतरीत झालेले आहे त्याकडे पाहून येते. तेथे मदरशे म्हणजे आतंकवादी तयार करण्याचे कारखाने मोठ्या प्रमाणात सुरू आहेत तर या कनकालेश्वर मंदिरात अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. जसे की या मागास भागातल्या ग्रामीण व गरीब कुटुंबातल्या लग्न कार्यांसाठी हे देऊळ अगदी वाजवी दराने दिले जाते, वगैरे.



येथे कर माझे दोन्ही जुळती.

जाता-जाता - दहावीच्या परिक्षेच्या काळात देवळाचा हा भाग माझी दिवसभराची अभ्यासाची खोली होता.

बहेर रणरणते ऊन असू देत पण येथे मात्र कसे थंड-थंड वाटे. बरेचदा अभ्यास सोडून मी या तळ्यातल्या रंगिबेरंगी माशांना पहात तर कधी कधी ते सुंदर कोरीव नक्षिकाम तासन तास न्यहाळत बसे.
कनकालेश्वराच्या या तळ्यात एक ते दोन फूट लांबीचे वेगवेगळ्या रंगाचे चमकदार मासे हे बच्चे कंपनीचे विषेश आकर्षण होते. पण या काही वर्षात ते मासे नष्ट झाल्याचे कळते. तसेच या तळ्यात गाळही खूप साचला आहे. लोक या तळ्यात गणपती विसर्जन करतात. तसेच निर्माल्यही फेकतात. ते थांबायला हवे नाहीतर हे तळेच नष्ट व्हायचे.

असे हे आमचे कनकालेश्वर मंदिर... आम्हा बीडकरांचे श्रद्धास्थान, आमच्या पूर्वजांच्या वैभवाचे, लढवय्येपणाचे प्रतिक... सध्या त्या वैभवशाली वारशाच्या वारसदारांकडून योग्य त्या काळजी अभावी एकटेच परिस्थितीशी झुंज देत उभे आहे.

या विषयावर मिसळपाव वर चर्चा चालू आहे. येथे क्लिक केल्यास वाचता येईल.

No comments: