रुतलेल्या सहस्त्र जखमा
मी सांभाळतो उराशी
रुदनाचे सोयर तुटले
मज खंत ना जराशी
आक्रोश ना कदापी
ना द्रोह जीवनाशी
अजुनी सजीव आहे
ना राग हा तुझ्याशी
गाऊ नको वॄथा तू
माझी मलाच गाणी
वांझोट्या स्वप्नांनीही
मानले रिक्त हे पाणी
जा सोड इथेच आता
चल मोह पाश तोडू
झेपेना स्पर्ष हताचा
खपली नकोस काढू
टीप : ही रचना येथे पूर्वप्रसिद्ध केलेली आहे.
Demonetization and Mobile Banking
8 years ago
1 comment:
कवितेबद्दच्या आशयाबद्दल...
एका दुखावलेल्या मनाची व्यथा सांगताना कवीला म्हणायचे आहे की जरी त्याला अनेक जखमा झालेल्या असल्या तरी तो रडत बसलेला नाही वा खंतही करत नाही... (पहिले कडवे)
सगळे त्रास सहन करत मी अद्याप जिवंत आहे हा तुझ्यावर राग नाही असे म्हणताना तो असे दर्शवतो आहे की तिने त्याला असे काही झिडकारले आहे की जणू त्याला मरण हाच योग्य न्याय होईल (दुसरे कडवे).
ते मन पूर्वी स्वप्नाळू होते, अशावादी होते जे अजूनही त्याला आशा/स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. तेव्हा हा त्या मनाला म्हणतो की उगीच ही खोटी आशा आता मला तू दाखवू नको. "व्यथा" हा शब्द व्यर्थ या अर्थाने वापरला आहे (कडवे तिसरे).
जगण्याचे सगळे मोह पाश तोडून मुक्त होण्याचा निर्धार व्यक्त करताना तो आता म्हणत आहे की उगीच सांत्वन करायचा प्रयत्न करु नकोस. त्याने आठवणी जाग्या होऊन दु:खावरची खपली निघाल्यासारखे होते (अंतिम कडवे).
Post a Comment