Friday, August 15, 2008

रशियाचा धडा

मागच्या आठवड्यात रशियाने एका धडाक्यात जवळ जवळ अख्खा जॉर्जिया पदक्रांत केला. कारण काय तर दक्षिण-ओसेटिया या जॉर्जियाच्या फुटीर भागात जॉर्जियाने पुन्हा आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली होती. त्यात जॉर्जिया पडला अमेरिकेचा मित्रदेश! त्यांचा प्रभाव आपल्या परसदारात वाढू देणे रशियाच्या पचणी पडणारे थोडेच होते! मग काय... शेकडो रशियन रणगाडे निघाले. एक-दोन दिवसात दक्षिण-ओसेटिया व अब्खाजिया हे फुटीर प्रांत रशियाच्या ताब्यात घेऊन जॉर्जियाची राजधानी त्बिलीसीच्या आवारात जाऊन उभे राहिले.

आता पुढे काय?

  • दक्षिण-ओसेटिया व अब्खाजिया हे फुटीर प्रांत रशियाशी जोडले जातील वा स्वतंत्र देश बनतील.

  • जॉर्जियाने नाटो सदस्यत्व घेऊ नये असे बंधन त्यांच्यावर घातले जाऊ शकते.

  • रशियन सैन्यावर केवळ जॉर्जियाच नव्हे तर इतर शेजार राष्ट्रे सुद्धा हल्ला करण्याचा केवळ विचारही करणार नाहीत.


आता श्रीलंकेचे उदाहरण...
श्रीलंकेन सैन्याने तमिळ वाघांच्या बिमोडासाठी निकराची चढाई केली आहे. अगोदर हवाई हल्ला करून नगरीकांना हुसकावने व तमिळ वाघांचा सफाया करत गाव्/शहर कबिज करने हा त्यांचा धडाका चालू आहे.

आणि आता कश्मिर...
कर्फ्यूच्या काळात लाखो लोक (त्यात खरे कश्मिरी किती व पाकचे भाडेकरू किती हा प्रश्न निराळा) पकिस्तानी झेंडे हातात घेऊन ताबारेषा ओलांडून मुजफ्फराबादला निघतात व त्यांना आडवता आडवता पोलिसांना/सैन्याला गोळ्या चालवाव्या लागतात... काही तासाच्या आत भारताने मुस्लिमांचे रक्त सांडले अशा आशयाच्या सचित्र बातम्या बीबीसी, सिएनएन सारख्या आघाडीच्या वृत्तवाहिन्यांवर झळकतात व खुलेआम भारताची बदनामी करतात.

तात्पर्यः
आपल्या नेतृत्वात हा प्रश्न सोडवन्याची इच्छाशक्ती संपली आहे का की ती कधीच नव्हती? जगातल्या दुसर्‍या क्रमांने मोठ्या सैन्याला कश्मिरप्रश्न हाताळता येत नाही यावर कोणाचाच विश्वास बसू शकत नाही.

वेळोवेळी जगातल्या मुत्सद्दी राज्यकर्त्यांनी त्यांचे प्रश्न तत्पुरता राजकीय तोटा सहन करून मोठ्या हिमतीने सोडवले आहेत. रशिया त्यांच्या शेजार देशातील गडबडीला तर श्रीलंका त्यांच्या फुटिरवाद्यांना तसेच हिमतीने हताळत आहेत. हेही तसेच एक उदाहरण. त्यातून भारताचे नेते/मुत्सद्दी (कोणी असतील तर) काही शिकतील का? आपले मिळमिळीत धोरण हा प्रश्न सोडवू शकेल का?

No comments: