Thursday, September 11, 2008

आख्खे काश्मीर भारतात!!

आज बीबीसी वाल्यांनी आमचा दिवस आनंदी करायला मदत केली बॉ.... चक्क पाक व्याप्त काश्मीर भारताच्या अख्त्यारीत दाखवून. हे पहा...

From Kashmir on BBC


नाहीतर नेहमी ते काश्मीरचा भूभाग हा असा दाखवतात ज्यात पाकव्याप्त काश्मीराला पाकीस्तान कंन्ट्रोल्ड काश्मीर उल्लेखले जाते.
From Kashmir on BBC


या विषयावर अधिक चर्चा येथे पहा

आपला,
(अखंड-भारतवादी) भास्कर

Wednesday, September 10, 2008

तुरुंग फोडायचा आहे

रोज आठ तास आम्ही तुरुंगात असतो. ५ बाय ५ च्या चौकटीत बसून बाहेरचे तापमान किती आहे ते संगणकावर पाहतो. बायकोचा फोन आला की लेकरांचा आवाज अस्पष्ट ऐकतो. आई-वडिल गावी कसे असतील याचा विचार करतो. किमान पुढच्या वर्षीची दिवाळी तरी भावंडासोबत घालवायची हा विचार करत ५ चा ठोका किती वेळाने पडणार असे म्हणत देवाने दिलेले सुंदर आयुष्य चार दमडीसाठी सडवतो.

हा तुरुंग फोडायचाय. ३६५ पैकी ३६५ दिवस शेतात उघड्या छातीने घाम गाळायचाय पण .... पोराबाळांच्या मुखात दोन घास जातील याची खात्री करून (मराठवाड्यातल्या शेतकर्‍याचे स्वप्न शेवटी!).

एक नाटक बसवायचय... दिनानाथ मध्ये चालवालया नाही पण संध्याकाळी गावच्या चावडीत दाखवायला.

आणी पंतप्रधान बनायचय.... समान नागरी कायदा करायला.

आपला,
(कैदी) भास्कर

http://www.misalpav.com/node/3391#comment-48221

Wednesday, August 27, 2008

ओरिसा - पोप महाशयांचे दु:ख

सध्या ओरीसात जे काही चालले आहे त्याने प्रत्येक भारतीयाला दु:खच होत आहे. तसेच आज पोप महाशयांनी सुद्धा या विषयाबद्दल त्यांची चिंता व्यक्त केली. मला बुवा त्यांची कमाल वाटते.

काही आठवड्यांपूर्वी याच पोप महाशयांनी ऑस्ट्रेलियात जाऊन तेथील मूळ वंशजांची माफी मागितली होती. त्यात त्यांनी "मूळ वंशजांची संस्कृती, धर्म व भाषा यांचा ख्रिश्चनांनी नाश केला" याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. या अगोदर पोप महाशयांनी अशा प्रकारच्या माफी अमेरिकेत व इतरत्र सुद्धा मागितल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला याबद्दल त्यांचा आदरच वाटणार. जर शांतीदूत म्हणजे जर कोणी असेल तर केवळ हेच अशी अनेकांची यामुळे समजूत होणे शक्य आहे!

पण जरा खोलात जाऊन बघितल्यास आपल्या लक्षात येईल की त्यांनी ज्यांची माफी मागितली ते आता ख्रिश्चन धर्मात जवळपास संपूर्णपणे मिसळून गेलेले आहेत. त्यांना त्यांचे धर्म, संस्कृती वा भाषांचे पुनरुज्जीवन करणे केवळ आशक्य आहे. जर पोप यांना खरेच पश्चताप होत असेल तर त्यांनी येथून पुढे असे होऊ नये याची काळजी घेतल्यास जगातले बरेच प्रश्न कमी होतील.

भारतापुरते बोलायचे झाल्यास पोप महाशयांनी खालील गोष्टी कराव्यात जेणे करून त्यांना आजच्या सारखा शोकसंदेश पुन्हा द्यायची वेळ येणार नाही.

१. भारतात मिशनर्‍यांनी धर्मांतरे पूर्ण बंद करावीत जेणेकरून स्थानिक लोकांची त्यांच्या धर्म/संस्कृती पासून नाळ तुटणार नाही.
२. मिशनरी शाळांतून सक्ती असणारे हे नियम पुर्णतः रद्द करावेत जेणेकरुन मुलांची त्यांच्या संस्कृतीशी नाळ ढिली होणार नाही...
मुलींनी टिकली न लावणे, सणावारंना सुटी न घेणे, सक्तीने ख्रिस्मस साजरा करायला लावने, बळजवरीने बायबलवरील "प्रोजेक्ट" करुन घेणे (न केल्यास खूप कमी मार्क देणे वा नापास करणे), डब्यात भारतीय जेवन आणन्यास मज्जाव करणे, वगैरे.
३. सेवाभावी मिशनरी दवाखाण्यातून कसल्याही धार्मिक शपथा वगैरे न घ्यायला लावता रुग्णांची सेवा करणे. (येशु महाराजांची आरती न म्हणनार्‍यास इलाज लागू होत नाही अशा तद्दन फोटारड्या गोष्टी सांगून आदिवासींना न फसवने).
४. भुकंप/पूर वगैरे नैसर्गिक आपत्तींच्या वेळी कोणाच्याही नावात बदल न करता मदत करने.
(सर्वांत महत्वाचे) - ५. आतापर्यंत धर्मांतरीत झालेल्या भारतीयांना त्यांच्या मूळ संस्कृती/धर्मा नुसार पुन्हा जगणे शक्य आहे. त्यांची माफी मागून त्यांना परत आपल्या मूळ धर्मात जायला सांगावे.

वरील मुद्दे २,३,४ सारख्या अनेक बाबी आहेत ज्या स्थानिक हिंदूंना ख्रिश्चनांच्या विरुद्ध भडकवतात. त्यांनी या टाळल्या तरच या दोन धर्मांमध्ये सलोखा निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतू मिशनर्‍यांचे डाव वेगळे आहेत. पुर्वांचलात ख्रिस्ती धर्म मोठा करुन आल्पसंख्यांक हिंदूंना आपल्या इशार्‍यावर नाचवायला सुरु केल्यावर त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी अदिवासी/वनवासी भागातील भारतीयांना आपले "टार्गेट" बनवून धर्मांतरांचा सपाटा चालवला आहे व या मार्गात कोणी स्वामी लक्ष्मानंद सरस्वतीसारखा आलाच तर त्यांचा काटा काढून बाकीच्यांना दहशत बसवून आपले काम फत्ते करण्याचा त्यांचा मानस दिसतो आहे.

आपल्याला पोप यांच्या भुमिकेबद्द्ल काय वाटते?

Tuesday, August 19, 2008

६१ वा स्वातंत्र्यदिन की ६२ वा?

मंडळी, हा आपला ६१ वा स्वातंत्र्यदिन की ६२ वा?

काही वॄत्तपत्रे म्हणतात एक्सष्टावा तर काही बासष्टावा. माझे मत... एकसष्टावा. का?
१५ ऑग. १९४७ ला पहिला स्वातंत्र्यदिन.
१५ ऑग. १९४८ ला दुसरा.
१५ ऑग. १९५८ ला बारावा.
१५ ऑग. १९६८ ला बावीसावा.
.
.
.
१५ ऑग. २००८ ला बासष्टावा.

मग ६१ च घोळ का? समजा आमचा बब्या एक वर्षाचा झाला... तर तो त्याचा पहिला वाढदिवस. दोन वर्षाचा झाला तर दुसरा. मात्र आपला देश ६१ वर्षाचा झाला तर तो त्याचा ६२ वा स्वातंत्र्यदिन, नव्हे का?

Friday, August 15, 2008

रशियाचा धडा

मागच्या आठवड्यात रशियाने एका धडाक्यात जवळ जवळ अख्खा जॉर्जिया पदक्रांत केला. कारण काय तर दक्षिण-ओसेटिया या जॉर्जियाच्या फुटीर भागात जॉर्जियाने पुन्हा आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली होती. त्यात जॉर्जिया पडला अमेरिकेचा मित्रदेश! त्यांचा प्रभाव आपल्या परसदारात वाढू देणे रशियाच्या पचणी पडणारे थोडेच होते! मग काय... शेकडो रशियन रणगाडे निघाले. एक-दोन दिवसात दक्षिण-ओसेटिया व अब्खाजिया हे फुटीर प्रांत रशियाच्या ताब्यात घेऊन जॉर्जियाची राजधानी त्बिलीसीच्या आवारात जाऊन उभे राहिले.

आता पुढे काय?

  • दक्षिण-ओसेटिया व अब्खाजिया हे फुटीर प्रांत रशियाशी जोडले जातील वा स्वतंत्र देश बनतील.

  • जॉर्जियाने नाटो सदस्यत्व घेऊ नये असे बंधन त्यांच्यावर घातले जाऊ शकते.

  • रशियन सैन्यावर केवळ जॉर्जियाच नव्हे तर इतर शेजार राष्ट्रे सुद्धा हल्ला करण्याचा केवळ विचारही करणार नाहीत.


आता श्रीलंकेचे उदाहरण...
श्रीलंकेन सैन्याने तमिळ वाघांच्या बिमोडासाठी निकराची चढाई केली आहे. अगोदर हवाई हल्ला करून नगरीकांना हुसकावने व तमिळ वाघांचा सफाया करत गाव्/शहर कबिज करने हा त्यांचा धडाका चालू आहे.

आणि आता कश्मिर...
कर्फ्यूच्या काळात लाखो लोक (त्यात खरे कश्मिरी किती व पाकचे भाडेकरू किती हा प्रश्न निराळा) पकिस्तानी झेंडे हातात घेऊन ताबारेषा ओलांडून मुजफ्फराबादला निघतात व त्यांना आडवता आडवता पोलिसांना/सैन्याला गोळ्या चालवाव्या लागतात... काही तासाच्या आत भारताने मुस्लिमांचे रक्त सांडले अशा आशयाच्या सचित्र बातम्या बीबीसी, सिएनएन सारख्या आघाडीच्या वृत्तवाहिन्यांवर झळकतात व खुलेआम भारताची बदनामी करतात.

तात्पर्यः
आपल्या नेतृत्वात हा प्रश्न सोडवन्याची इच्छाशक्ती संपली आहे का की ती कधीच नव्हती? जगातल्या दुसर्‍या क्रमांने मोठ्या सैन्याला कश्मिरप्रश्न हाताळता येत नाही यावर कोणाचाच विश्वास बसू शकत नाही.

वेळोवेळी जगातल्या मुत्सद्दी राज्यकर्त्यांनी त्यांचे प्रश्न तत्पुरता राजकीय तोटा सहन करून मोठ्या हिमतीने सोडवले आहेत. रशिया त्यांच्या शेजार देशातील गडबडीला तर श्रीलंका त्यांच्या फुटिरवाद्यांना तसेच हिमतीने हताळत आहेत. हेही तसेच एक उदाहरण. त्यातून भारताचे नेते/मुत्सद्दी (कोणी असतील तर) काही शिकतील का? आपले मिळमिळीत धोरण हा प्रश्न सोडवू शकेल का?